शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाºया शेतकºयांचा मोर्चा , म्हसवड तलाठी कार्यालय; महसूल प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:31 IST

म्हसवड : सातारा-म्हसवड-टेंभुर्णी महामार्ग क्रमांक ५४८ सी या राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाºया शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी मासाळवाडी परिसरातील शेकडो शेतकºयांनी

ठळक मुद्देशेकडो शेतकºयांचा सहभागशेतकºयांच्या जमिनीवर व संबंधित रस्त्यावर येऊनच करण्यात याव्यात

म्हसवड : सातारा-म्हसवड-टेंभुर्णी महामार्ग क्रमांक ५४८ सी या राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाºया शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी मासाळवाडी परिसरातील शेकडो शेतकºयांनी येथील तलाठी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन महसूल प्रशासनाला दिले. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत रस्त्याचे काम होऊ देणार नसल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

भूसंपादन कायद्याच्या विसंगतपणे शेतकºयांवर अन्याय करणाºया प्रशासनाच्या विरोधात सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग शेतकरी संघर्ष समिती म्हसवडच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चा सातारा-पंढरपूर रस्त्यावरून बसस्थानक चौक, महात्मा फुले चौक ते तलाठी कार्यालयावर काढून आंदोलनकर्त्यांनी महसूल प्रशासनाला निवेदन दिले. यानिवेदनात विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये जुना म्हसवड-टेंभुर्णी रस्ता ज्या लांबी रुंदीचा आहे व ज्या पद्धतीने जुन्या नकाशात आहे त्याच पद्धतीने करण्यात यावा. जे नवीन महामार्गालगत सर्व्हे क्रमांकाची येत आहेत त्या संपूर्ण सर्व्हे क्रमांकाची मोजणी करून महामार्गासाठी लागणारे क्षेत्र शेतकºयांच्या समक्ष अधिग्रहण करण्यात यावे. जेवढे क्षेत्र अधिग्रहण झाले आहे त्या संपूर्ण क्षेत्राचा आर्थिक मोबदला संपादित शेतकºयांला रस्त्याचे काम होण्यापूर्वी मिळावा.

ज्या क्षेत्रामध्ये बागायत, विहिरी, झाडेझुडपे इतर माहिती खातरजमा करून आर्थिक मोबदला देण्यात यावा. इथून पुढे आम्ही शेतकरी विनाकारण शासन दरबारी हेलपाटे मारणार नाही. ज्या कारवाया करायच्यात त्या शेतकºयांच्या जमिनीवर व संबंधित रस्त्यावर येऊनच करण्यात याव्यात. या मागण्या मान्य झाल्याशिवाय महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येऊ नये.

या मोर्चात डॉ. प्रमोद गावडे, डॉ. वसंत मासाळ, बबनशेठ विरकर, अप्पासाहेब पुकळे, नगराध्यक्ष तुषार विरकर, नितीन दोशी, अखिल काझी, बाळासाहेब काळे, बाळासाहेब मासाळ, लुनेश विरकर, भगवानराव पिसे, अजिनाथ केवटे यांच्यासह शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी निषेध करून यापुढे प्रशासनाने शेतकºयांना मोबदला न देता महामार्गाचे काम सुरू ठेवल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.