शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाºया शेतकºयांचा मोर्चा , म्हसवड तलाठी कार्यालय; महसूल प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:31 IST

म्हसवड : सातारा-म्हसवड-टेंभुर्णी महामार्ग क्रमांक ५४८ सी या राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाºया शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी मासाळवाडी परिसरातील शेकडो शेतकºयांनी

ठळक मुद्देशेकडो शेतकºयांचा सहभागशेतकºयांच्या जमिनीवर व संबंधित रस्त्यावर येऊनच करण्यात याव्यात

म्हसवड : सातारा-म्हसवड-टेंभुर्णी महामार्ग क्रमांक ५४८ सी या राष्ट्रीय महामार्गात बाधित होणाºया शेतकºयांना न्याय मिळवून देण्यासाठी मासाळवाडी परिसरातील शेकडो शेतकºयांनी येथील तलाठी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन महसूल प्रशासनाला दिले. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत रस्त्याचे काम होऊ देणार नसल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

भूसंपादन कायद्याच्या विसंगतपणे शेतकºयांवर अन्याय करणाºया प्रशासनाच्या विरोधात सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्ग शेतकरी संघर्ष समिती म्हसवडच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोर्चा सातारा-पंढरपूर रस्त्यावरून बसस्थानक चौक, महात्मा फुले चौक ते तलाठी कार्यालयावर काढून आंदोलनकर्त्यांनी महसूल प्रशासनाला निवेदन दिले. यानिवेदनात विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये जुना म्हसवड-टेंभुर्णी रस्ता ज्या लांबी रुंदीचा आहे व ज्या पद्धतीने जुन्या नकाशात आहे त्याच पद्धतीने करण्यात यावा. जे नवीन महामार्गालगत सर्व्हे क्रमांकाची येत आहेत त्या संपूर्ण सर्व्हे क्रमांकाची मोजणी करून महामार्गासाठी लागणारे क्षेत्र शेतकºयांच्या समक्ष अधिग्रहण करण्यात यावे. जेवढे क्षेत्र अधिग्रहण झाले आहे त्या संपूर्ण क्षेत्राचा आर्थिक मोबदला संपादित शेतकºयांला रस्त्याचे काम होण्यापूर्वी मिळावा.

ज्या क्षेत्रामध्ये बागायत, विहिरी, झाडेझुडपे इतर माहिती खातरजमा करून आर्थिक मोबदला देण्यात यावा. इथून पुढे आम्ही शेतकरी विनाकारण शासन दरबारी हेलपाटे मारणार नाही. ज्या कारवाया करायच्यात त्या शेतकºयांच्या जमिनीवर व संबंधित रस्त्यावर येऊनच करण्यात याव्यात. या मागण्या मान्य झाल्याशिवाय महामार्गाच्या कामाला सुरुवात करण्यात येऊ नये.

या मोर्चात डॉ. प्रमोद गावडे, डॉ. वसंत मासाळ, बबनशेठ विरकर, अप्पासाहेब पुकळे, नगराध्यक्ष तुषार विरकर, नितीन दोशी, अखिल काझी, बाळासाहेब काळे, बाळासाहेब मासाळ, लुनेश विरकर, भगवानराव पिसे, अजिनाथ केवटे यांच्यासह शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी निषेध करून यापुढे प्रशासनाने शेतकºयांना मोबदला न देता महामार्गाचे काम सुरू ठेवल्यास गंभीर परिणाम होतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.