शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

फुकटचे कनेक्शन एकदाच ‘पाजणार पाणी’!

By admin | Updated: December 10, 2015 01:02 IST

दीड वर्षांचे बिल भरताना पडणार बोजा : साताऱ्यातील नवीन नळकनेक्शन अनधिकृतच; दंडाचा आकडा कदाचित मोठा

सातारा : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगर पालिका यांच्या मार्फत नव्याने दिलेल्या नळ कनेक्शनची ग्राहकांनी पूर्तता नकेल्याने ही कनेक्शन्स अजूनही अनधिकृत मानली जात असून, जलवाहिन्यांच्या सर्व्हेनंतर नवीन घेणाऱ्याकनेक्शनलधारकाला एकत्र दंडासहित बिल भरावे लागणार आहे. गेल्या दीड वर्षांचे बिल नागरिकांना एकदमच द्यावे लागणार असल्याने सर्वसामान्यांना कर्ज काढूनच हे बिल भरावे लागणार आहे. शहरातील रस्ते डांबरीकरण करण्यापूर्वी जलवाहिनी टाकून कलेक्शन  दिली गेली होती. त्यावेळी काही मेहरबानांच्या मेहरबानीमुळे मागेल त्याला कनेक्शन देण्यात आले होते.तसेजीवनप्राधिकरणतर्फे एक अर्जदेखील नागरिकांना देण्यात आला होता. परंतु नळकनेक्शन जोडल्याने हे अर्ज धूळखात पडून राहिले. त्यामुळे ज्यांनी नळकनेक्शन जोडली आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जीवन प्राधिकरणकडे कागदपत्रांची पूर्तता केली नाही. या लोकांनाही बिले अद्याप दिली नसल्याचे प्राधिकरण कार्यालयाकडून सांगण्यात आले.नगर पालिकेकडून शहरात सुमारे १३ हजार अधिकृत नळकनेक्शन जोडली गेली आहेत. या काही कनेक्शनला मीटर बसविण्यात आले आहेत तर तर कनेक्शनला अजूनही मीटर बसविण्यात आले नाहीत. पालिका आणि जीवनप्राधिकरणामध्ये पाणी आकाराबाबत निर्णय झाला नसल्याचेलले जात आहे.जीवनप्राधिकरणमार्फत सदर बझार, गोडोली, उत्तेकरनगर, देशमुख कॉलनी, करंजे, राधिका रोड, शिवराज पेट्रोलपंप या आदी भागात नवीन नळकनेक्शन दिली गेली आहेत. तसेच मीटरही बसविण्यात आले आहेत. परंतु अनेकांना ग्राहक नंबरच मिळाला नसल्याचे पुढे आले आहे. जीवनप्राधिकरणमार्फत सर्व भागात मीटरपद्धतीनेच पाणी आकार घेण्यात येणार असल्याने नव्याने घेतलेल्या कनेक्शन ग्राहकाला कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.अनेक नागरिकांनी अद्याप बिले का आली नाहीत, याची विचारपूस केली. मात्र त्यांना जीवनप्राधिकरणकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. जीवनप्राधिकरणमार्फत सध्या शहरात सर्वच टाक्यांचा सर्वे सुरू असून, कोणत्या टाकीत किती पाणीपुरवठा केला जातो, याचा ताळमेळ घालून या अनधिकृत नळकनेक्शनधारकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)असे दिले जाते कनेक्शन नव्याने कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकाला सिटीर्व्हेचा उतारा द्यावा लागतो. त्यानंतर पालिकेने नाहरकत दाखला तसेच शंभर रुपयांच्या स्टँपवर प्रतिज्ञापत्र व मीटरची अनामत रक्कम भरूनच ग्राहकांना नंबर दिला जातो. त्यानंतर बिल येण्यास सुरुवात होते.कागदपत्राअभावी कनेक्शन अनधिकृतनव्याने रस्ता उखडू नये यासाठी मागेल त्याला नवीन कनेक्शन देण्यात आले. काही मेहरबानांनी अशी कनेक्शन देण्यासाठी भाग पाडल्याचे बोलले जात आहे. मात्र कादपत्रांची पूर्तता झाली नसल्याने ही कनेक्शन पुन्हा तोडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.एकाच घराला दोन-तीन कनेक्शनशहरातील अनेक ठिकाणी एकाच घराला दोन ते तीन नळकनेक्शन दिली गेली आहेत. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करताना अशा लोकांची डोकेदुखी वाढणार आहे.शहरात १३ हजारांहून अधिक अधिकृत नळकनेक्शन आहेत. ज्यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेतली आहेत, त्याविषयी पालिका आणि जीवनप्राधिकरणमार्फत सर्वे सुरू आहे. हा सर्वे पूर्ण झाल्यानंतरच कारवाई संदर्भात वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील.- संदीप सावंत, पाणी पुरवठा विभाग, सातारा पालिका