शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
3
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
4
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
5
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
6
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
7
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
8
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
9
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
10
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
11
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
12
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
13
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
14
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
15
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
16
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
17
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
18
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
19
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
20
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!

जलसंधारणाच्या कामासाठी चार गावे एकत्र...

By admin | Updated: January 16, 2016 00:25 IST

माण तालुका : प्रभाकर देशमुख यांच्याकडून पाहणी; दिवडी येथे गुढ्या उभारून स्वागत

म्हसवड : ‘लोकसहभागातून महाराष्ट्राला आदर्श ठरेल, असं जलसंधारणाचं काम चार गावांनी एकत्रित येऊन केले आहे. त्या कामाचे कौतुक करायला मी आलो आहे,’ असे प्रतिपादन जलसंधारण व रोजगार हमी योजनेचे सचिव प्रभाकर देशमुख यांनी केले. दरम्यान, दिवडी येथील ग्रामस्थांनी गुढ्या उभारून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दिवडी, ता. माण येथे चार गाव जलयुक्त शिवार पाहणी दौऱ्यादरम्यान ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, पुण्याचे सहसंचालक मृदू संधारण ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, ‘रोहयो’चे उपजिल्हाधिकारी पराग सोमण, कार्यकारी अभियंता डी. वाय. कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, उपविभागीय कृषी अधिकारी कृष्णकांत धुमाळ, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सीमा जगताप, उपविभागीय अभियंता दीपक गायकवाड, तालुका कृषी अधिकारी राजेश जानकर उपस्थित होते.सचिव देशमुख म्हणाले,‘लोकसहभाग वाढवून पाणलोटाची कामे करावीत. खोल सलग समतल चरांमुळे परिसरातील सर्व विहिरी जिवंत होतात. कोणीतरी येऊन गाव जलयुक्त करील असे होत नाही. तर ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे हे सर्व शक्य होते. सयाजी शिंदे यांच्या मदतीमुळे विविध कामे आकारास आली आहेत. तुमचं कुटुंब उभं करा, गाव उभं करा मग बाकीचं बघा. गावातील प्रत्येक कामात माझं काम म्हणून लक्ष द्या. गावाच्या विकासासाठी एकत्रित येऊन इर्जिक घाला.’जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी चार गाव जलयुक्त शिवार अभियान आराखड्याचे वाचन करून ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच विविध मुद्द्यांचा आढावा घेत त्यांनी तत्काळ निर्णय घेतले. तसेच या चारही गावांतून कमीत कमी पाचशे मजूर उपलब्ध व्हावेत व त्यांच्या माध्यमातून रोजगार हमीची जास्तीत जास्त कामे व्हावीत,अशी अपेक्षा व्यक्त केली. सुभाष घाडगे-महाराज, चांगदेव सूर्यवंशी, गोडसेवाडीचे अप्पासाहेब कदम, दिवडीचे आनंदराव शिर्के, श्रीरंग जाधव यांनी ग्रामस्थांच्या वतीने मनोगते व्यक्त केली. (प्रतिनिधी)कृषी विभागामार्फत विविध कामांना प्रारंभपांढरवाडी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कृषी विभागामार्फत ५० हजार रोपांची रोपवाटिका, विहीर, पाझर तलावातील गाळ काढणे आदी कामांची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. गोडसेवाडी येथे लोकसहभागातून करण्यात आलेली खोल सलग समतल चर, पांढरवाडी येथील पाणंद रस्ता, काळेवाडी येथील नाला बांध दुरुस्ती, गाळ काढणे, खोल सलग समतल चर, दिवडी येथील ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण आदी कामांची पाहणी करण्यात आली.