शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

चार हजारांचा चेक; चाळीस हजार वजा!

By admin | Updated: October 27, 2015 00:20 IST

भुर्इंज येथील प्रकार : चूक कोणाची, याबाबत बँक कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवी

भुर्इंज : सुरक्षेची हमी म्हणून लोक राष्ट्रीयीकृत बँकेत आर्थिक व्यवहार करतात; पण आता अशा बँकांमधील व्यवहारही सुरक्षित राहिले नसल्याचे भुईज येथे घडलेल्या प्रकारावरून सिद्ध झाले आहे. येथील कृष्णा पोळ यांनी एका पार्टीला दिलेला चेक बँकेत भरल्यानंतर बँकेने चार हजारांच्या चेकवर तब्बल चाळीस हजार रुपयांची रक्कम पोळ यांच्या खात्यातून वजा केल्याचा प्रकार उघड झाला आहे.याबाबत माहिती अशी की, भुर्इंज येथील कृष्णा संभाजी पोळ ऊर्फ डिसेंट टेलर यांचे येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेत खाते आहे. या खात्यावर त्यांनी बँकेकडून चेकबुक घेतले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी खरेदी व्यवहारापोटी एका कंपनीस ४ हजार ३०५ रुपयांचा चेक दिला. संबंधित कंपनीने तो चेक बँकेत भरल्यानंतर प्रत्यक्षात मात्र पोळ यांच्या खात्यावरून या चेकपोटी बँकेने ४१ हजार ३०५ रुपये वजा केले. ही गोष्ट पोळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम ज्यांना चेक दिला होता त्यांच्याकडे चौकशी केली. तेव्हा संबंधित कंपनीने आपल्याला ४ हजार ३०५ रूपयेच मिळल्याचे सांगितले. पोळ यांनी याबाबत माहिती घेण्यासाठी बँकेच्या भुर्इंज शाखेत संपर्क साधला असता त्यांना दुरुत्तरे देण्यात आली. त्यामुळे ४१ हजारांचाच चेक संबंधित कंपनीला गेल्याचा पोळा यांचा समज झाला. त्यामुळे संबंधित कंपनी आणि पोळ यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर कंपनीने बँकेचे स्टेटमेंट पोळ यांच्या हातात दिले. त्यामध्ये कंपनीस ४ हजार ३०५ रुपये मिळाल्याचे स्पष्ट झाले. या गैरसमजाबद्दल पोळ यांना कंपनीची माफीही मागावी लागली. मात्र, खात्यावरून वजा झालेली जादा रक्कम नेमकी गेली कुठे, या प्रश्नाचे उत्तर काही मिळाले नाही.पोळ यांनी पुन्हा बँक शाखेशी संपर्क साधला. तेव्हाही त्यांना उलटसुलट उत्तरे देण्यात आली. त्यावर पोळ यांनी कंपनीने दिलेले बँकेचे स्टेटमेंट दाखविल्यानंतर बँकेचे कर्मचारीही हडबडले. हा सगळा गडबड घोटाळा झाल्यानंतर पोळ यांच्या खात्यावर वजा झालेली रक्कम जमा झाली.दरम्यान, खात्यावरून वजा झालेली रक्कम दरम्यानच्या काळात कोणाच्या खिशात होती, याचा खुलासा अद्याप झाला नाही. बँकेच्या महिला कर्मचारी यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल सातारा शाखेकडे बोट करून जी काही चौकशी करायची आहे, ती तिथे करा, चुकी त्यांची आहे, असे सांगितले. त्यामुळे यात नेमके दोषी कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.या प्रकाराची चौकशी करून बँकेच्या विश्वासार्हतेला तडा घालविणाऱ्यावर व विनाकारण संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पोळ यांनी केली आहे. (प्रतिनिधी)