शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

चारशे एकर ऊस तोडीअभावी उभा!

By admin | Updated: February 25, 2015 00:15 IST

खटावमधील शेतकरी हवालदिल : आंदोलनाचा पवित्रा; कारखान्यांची मनमानी सुरू असल्याचा आरोप

खटाव : साखर कारखान्यांची मनमानी तसेच अनेक जाचक अटींमुळे खटावसह परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस जागेवरच वाळू लागला आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. खटाव तसेच परिसरात अद्यापही सुमारे चारशे एकर ऊस जागेवर तोडणी वाचून उभा आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. याला कारण कारखानदार आहेत, असा आरोपही शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. खटावपासून सुमारे वीस किलोमीटरवर कोरेगाव तालुक्यात जरंडेश्वर साखर कारखाना आहे. त्याचबरोबर दुसरीकडेही वीस किलोमीटरवर गोपूजजवळ ग्रीन पॉवर अ‍ॅन्ड शुगर कारखाना आहे. या कारखान्यांनी ऊस बियाणे आणि ठिबक सिंचन, तसेच खते वाटप करून शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रोत्साहित केले होते. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी बागायती क्षेत्रापेक्षा ऊस लागवडीचे क्षेत्र वाढवून उसाची लागण केली. या लागणीस १२ ते १४ महिने होऊनही दोन्ही कारखाने जाणीवपूर्वक रिकव्हरी लागत नाही. प्रोग्राम तयार नाही, अशा काहीही सबबी सांगून ऊस तोडणीस नकार देत आहेत, असे शेतकऱ्यांच्यातून सांगण्यात येत आहे. गोपूज कारखान्याचे अंदाजे या भागात दोनशे ते तीनशे शेअर्सधारक सभासद आहेत. या सभासदांचा ऊस न तोडता कार्यक्षेत्राबाहेरील बिगर सभासदांचा ऊस तोडला जात आहे. सद्य:स्थितीत दुष्काळी भागात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आता आपला ऊस डोळ्यांदेखत वाळून जाताना पाहावे लागत आहे. त्यातच तोडणी कामगारांनी एकरी सात ते दहा हजारांपर्यंत दर वाढवले आहेत. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनीे साखर कारखान्याशी वेळोवळी संपर्क साधला आहे. संबंधितांकडून चुकीची उत्तरे देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. (वार्ताहर)शेतकऱ्यांचे कारखान्याकडे शेअर्स आहेत. त्या शेअर्सधारकांचासुद्धा ऊस तोडला जात नाही. त्याला अनेक कारणे पुढे आणली जात आहेत. शेअर्सधारकांची ही अवस्था असेल तर सर्व सामान्य शेतकऱ्यांची काय गत. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने उसाची लागवड केली आहे. परंतु कारखानदार तसेच ऊसतोड टोळीकडून त्यांची आर्थिक अडचण निर्माण केली जात आहे. त्यामुळे शेतकरी संतापला आहे. आधीच ऊस तोडणीला उशीर झाला असताना कारखाना प्रशासनाकडून काहीही कारणे सांगून शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे, ती थांबवावी; अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल हे निश्चित. - किशोर डंगारे, ऊस उत्पादक शेतकरी बाहेरील उसाची वाहतूक रोखणार...कारखाना प्रशासनाची हीच भूमिका राहिल्यास खटावसह भागातील शेतकरी कोणतीही पूर्व कल्पना न देता रस्त्यावर उतरणार आहेत. या भागातून बाहेरून येणारी उसाची वाहतूक करणारी वाहने रोकण्यात येणार असून, संबंधित प्रशासकीय विभागाने या बाबीकडे गांभीर्याने पाहावे. अन्यथा होणाऱ्या नुकसानास शेतकरी जबाबदार राहणार नाहीत, असा इशारा खटावसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्याचे शेअर्सधारक सभासद यांनी दिला आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे. पाण्याची तीव्र टंचाई असतानाही ऊस जोमाने वाढवून उभा केला आहे. परंतु कारखान्यांकडून तो वेळेत न तोडण्यामुळे जागेवरच त्याचे वजन घटत आहे. तर पाणी टंचाईमुळे काही भागातील ऊस वाळून जाऊ लागला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंत्तातूर झाला आहे. - राजेंद्र करळे , शेतकरी खटाव