शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

अपघात चारशे... मृत्यू अडीचशे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST

सातारा : लाॅकडाऊन असताना आणि शिथिल झाल्यानंतरही अपघातांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. गेल्या सात महिन्यांत चारशे अपघात झाले ...

सातारा : लाॅकडाऊन असताना आणि शिथिल झाल्यानंतरही अपघातांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. गेल्या सात महिन्यांत चारशे अपघात झाले असून, त्यामध्ये तब्बल अडीचशे जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. एकीकडे कोरोनाचे तांडव सुरू असताना दुसरीकडे मात्र अपघातांंचे सत्र सुरू असल्याचेच स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाने गेल्या पावणेदोन वर्षांपासून तळ ठोकला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तर दिवसाला कोरोनाचे तब्बल चाळीस बळी जात होते. त्यामुळे सारे प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी एकवटले असतानाच दुसरीकडे मात्र अपघातांचे सत्र सुरू झाले. कोरोना काळात महामार्गावर वाहनांची रहदारी अत्यंत कमी होती. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेले लोक महामार्गावरून प्रवास करताना अत्यंत वेगाने जात होतो. या वेगानेच बऱ्याचजणांचा बळी घेतलाय. कोणाच्या गाडीचे टायर फुटले तर कोणाच्या कारचे नियंत्रण सुटून कार झाडावर आदळली तर काही वाहनांचे समोरासमोर अपघात झाले. यामुळे साहजिकच बळींचे प्रमाण वाढले. हे अपघात केवळ महामार्गावरच नव्हे तर आंतरजिल्हा रस्त्यांवरही झाले आहेत. कोरोनाच्या धांदलीमध्ये अपघातात इतक्या जणांचे बळी जाऊनही अपघाताविषयी कुठेही फारशी वाच्यता झाली नाही. त्याचे कारण म्हणजे लोक कोरोनाच्या दडपणाखाली वावरत आहेत.

सात महिन्यांत अडीचशे लोकांना अपघातात नाहक जीव गमवावा लागतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासन एकीकडे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागतोय. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत ३९ जणांचा मृत्यू झालाय. या काळात अनेकजण नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा फिरण्यासाठी बाहेर पडले होते. यातील बहुतांश अपघात हे रात्रीच्यावेळी झाले आहेत. ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे अपघात झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय. काही ठिकाणी रस्ते चांगले नसल्याचाही अहवाल तयार करण्यात आलाय. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाले आहेत.

चाैकट : सर्वाधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू...

जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत तब्बल २५० जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये १२८ हे दुचाकीस्वार असल्याचे समोर आले आहे. हेल्मेट न घातल्यामुळे दुचाकीस्वारांना आपला प्राण गमवावा लागलाय. तितकेच जखमीही झाले आहेत. जखमींमध्ये २३६ जणांचा समावेश आहे. या दुचाकीस्वारांनी जर हेल्मेट घातले असते तर नक्कीच बळींचे प्रमाण हे अल्प राहिले असते, असे पोलीस सांगताहेत.