शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

अपघात चारशे... मृत्यू अडीचशे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST

सातारा : लाॅकडाऊन असताना आणि शिथिल झाल्यानंतरही अपघातांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. गेल्या सात महिन्यांत चारशे अपघात झाले ...

सातारा : लाॅकडाऊन असताना आणि शिथिल झाल्यानंतरही अपघातांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. गेल्या सात महिन्यांत चारशे अपघात झाले असून, त्यामध्ये तब्बल अडीचशे जणांना आपला प्राण गमवावा लागलाय. एकीकडे कोरोनाचे तांडव सुरू असताना दुसरीकडे मात्र अपघातांंचे सत्र सुरू असल्याचेच स्पष्ट होत आहे.

जिल्ह्यात कोरोनाने गेल्या पावणेदोन वर्षांपासून तळ ठोकला आहे. एप्रिल आणि मे महिन्यात तर दिवसाला कोरोनाचे तब्बल चाळीस बळी जात होते. त्यामुळे सारे प्रशासन कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी एकवटले असतानाच दुसरीकडे मात्र अपघातांचे सत्र सुरू झाले. कोरोना काळात महामार्गावर वाहनांची रहदारी अत्यंत कमी होती. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडलेले लोक महामार्गावरून प्रवास करताना अत्यंत वेगाने जात होतो. या वेगानेच बऱ्याचजणांचा बळी घेतलाय. कोणाच्या गाडीचे टायर फुटले तर कोणाच्या कारचे नियंत्रण सुटून कार झाडावर आदळली तर काही वाहनांचे समोरासमोर अपघात झाले. यामुळे साहजिकच बळींचे प्रमाण वाढले. हे अपघात केवळ महामार्गावरच नव्हे तर आंतरजिल्हा रस्त्यांवरही झाले आहेत. कोरोनाच्या धांदलीमध्ये अपघातात इतक्या जणांचे बळी जाऊनही अपघाताविषयी कुठेही फारशी वाच्यता झाली नाही. त्याचे कारण म्हणजे लोक कोरोनाच्या दडपणाखाली वावरत आहेत.

सात महिन्यांत अडीचशे लोकांना अपघातात नाहक जीव गमवावा लागतो, ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासन एकीकडे अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र अपघातात नागरिकांना जीव गमवावा लागतोय. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत ३९ जणांचा मृत्यू झालाय. या काळात अनेकजण नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा फिरण्यासाठी बाहेर पडले होते. यातील बहुतांश अपघात हे रात्रीच्यावेळी झाले आहेत. ताणतणाव आणि अपुरी झोप यामुळे अपघात झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढलाय. काही ठिकाणी रस्ते चांगले नसल्याचाही अहवाल तयार करण्यात आलाय. पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे हे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहनचालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाले आहेत.

चाैकट : सर्वाधिक दुचाकीस्वारांचा मृत्यू...

जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत तब्बल २५० जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये १२८ हे दुचाकीस्वार असल्याचे समोर आले आहे. हेल्मेट न घातल्यामुळे दुचाकीस्वारांना आपला प्राण गमवावा लागलाय. तितकेच जखमीही झाले आहेत. जखमींमध्ये २३६ जणांचा समावेश आहे. या दुचाकीस्वारांनी जर हेल्मेट घातले असते तर नक्कीच बळींचे प्रमाण हे अल्प राहिले असते, असे पोलीस सांगताहेत.