शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीस वर्षांनंतर फुटला कूपनलिकांना पाझर!

By admin | Updated: August 19, 2015 22:14 IST

‘जलयुक्त शिवार’चे फलित : कोरेगावच्या तालुक्याच्या दुष्काळी भागात जलक्रांती

वाठार स्टेशन : दुष्काळाशी कायम संघर्ष करणारया कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील पिंपोडे बुदु्रक गावानजीक वसना नदीवरील पुरातन ब्रिटिशकालीन पाझर तलावाचे खोलीकरण व पुनर्भरण करण्यासाठी शासनाच्या जलयुक्त शिवारमधून दुरस्ती केल्यानंतर आता या तलावात मुबलक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे चाळीस वर्षांनंतर गावातील कूपनलिकांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. १९७२ पासून उत्तर कोरेगाव तालुक्याला दुष्काळ व निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. पिंपोडे बुद्रुक गावाच्या पश्चिमेस वसना नदीवर ब्रिटिशकालीन तलाव अस्तित्वात आहे. गेल्या ४० वर्षांपासून हे धरण गाळाने भरल्याने धरणात पाणीसाठा राहत नाही, तसेच दरवाजे तुटल्याने येणारे पाणी वाहून जात होते. मात्र शासनाने नुकतेच जलयुक्त शिवार योजनेतून या तलावातील गाळ काढल्यामुळे पाणीपातळी वाढली आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, तहसीलदार अर्चना तांबे, राष्ट्रीय जनकल्याण समितीचे विजयराव पंडित, सरपंच मच्छिंद्र केंजळे, जनार्दन निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पिसाळ, पंचायत समिती सदस्य अशोक लेंभे, विकास खुस्पे, बाळासाहेब कदम या ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. सुमारे चारशे मीटर लांब व ५० फूट रुंद तसेच १० ते १२ फूट खोलिकरण असे सुमारे चार महिने या तलावाचे काम सुरु होते. जून महिन्यात मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने हा तलाव ओसंडून वाहू लागला. परिणामी तलावाच्या काठावरील विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी वाढली आहे. बंद असलेल्या कूपनलिका पाणीसाठ्यामुळे पुन्हा सुरु झाल्या. गावातल्या हातपंपांनाही पाझर फुटला. सध्या या तलावाचे काही प्रमाणात काम अपूर्ण राहिले असून हे काम पूर्ण करण्यासाठी आता या तलावातील पाणीसाठा कमी होण्याची वाट पहावी लागणार आहे. या तलावाचे राहिलेले काम पूर्ण झाल्यास पाणीसाठ्यात अजून वाढ होणार आहे.कायम दुष्काळी भाग अशी छाप असलेल्या या गावात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने जलक्रांतीच झाली असुन दुष्काळी भागाला नवसंजवनीच मिळाली आहे. (वार्ताहर) मुलं घेतायत डुंबण्याचा आनंदचाळीस वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणीसाठा झाल्याने आज हा पाझर तलाव सर्वांचेच आकर्षण बनला आहे. एवढेच नाही तर या पाझर तलावात मनसोक्त डुंबण्याचा आनंद लुटण्यासाठी अनेक गावांतून मुले दररोज येऊ लागली आहेत. सोळशी ते पळशी या वसना नदीच्या उगमस्थानाच्या पट्ट्यात जागोजागी पाणी अडविण्याचे काम झाल्यास या भागाची परिस्थिती निश्चित बदलू शकते. या योजनेत जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेऊन ही चळवळ यशस्वी करावी.- सतीश धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य