शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

चाळीस टक्के निधी पडून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:28 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ग्रामीण जीवन्नोनत्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी फिरता निधी म्हणून ७९ ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामीण जीवन्नोनत्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी फिरता निधी म्हणून ७९ लाख रुपये मंजूर असून, आतापर्यंत फक्त ६० टक्केच रक्कम खर्च झाली आहे. त्यातच आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने बाकी असताना उर्वरित ३१ लाख ३५ हजार रुपये खर्च करण्याचे आव्हान संबंधित यंत्रणेपुढे राहणार आहे. त्यामुळे ही उद्दिष्टपूर्ती करताना दमछाकच होणार आहे.शहराबरोबरच ग्रामीण भागात महिलांचे बचत गट निर्माण होत आहेत. या गटाच्या माध्यमातून एकत्र येत महिला रोजगार निर्माण करत आहेत. या रोजगारातून महिला स्वावलंबीही बनत आहेत, त्यामुळे या बचत गटातील महिलांना आर्थिक सहकार्य करण्याच्या दृष्टीने शासनस्तरावरून विविध उपाययोजना करण्यात येत असतात. त्यापैकीच एक म्हणजे बचत गटासाठी फिरता निधी.केंद्र शासनाच्या ग्रामीण जीवन्नोनत्ती अभियानांतर्गत महिला बचत गटांसाठी फिरता निधी देण्यात येतो, त्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून काम चालते. हा विभाग जिल्ह्यातील महिलांच्या गटाला प्रस्तावानुसार जास्तीत जास्त १५ हजार रुपयांपर्यंत फिरता निधी देतो. सातारा जिल्ह्यातही या विभागाच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो बचत गटांना निधी प्राप्त झाला आहे. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी ७९ लाख २० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.एप्रिल २०१८ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. या वर्षासाठी सुमारे ७९ लाखांचा निधी मंजूर असून, त्यातून जिल्ह्यातील ५२८ महिला बचत गटांना फिरता निधी देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत त्यातील फक्त ३१९ गटांनाच फिरता निधी देण्यात आला असून, उर्वरित २०९ गटांना निधी देण्याचे काम बाकी आहे. म्हणजेच आतापर्यंत फक्त ४७ लाख ८५ हजारांचा निधी खर्ची करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. उर्वरित ३१ लाखांचा निधी दोन महिन्यांत खर्च करावा लागणार आहे. कारण आर्थिक वर्ष संपण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक राहिला आहे. त्यातच जिल्ह्यातील अनेक बचत गटांनी फिरत्या निधीसाठी अर्ज केले असून, त्यांचे प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे आले आहेत.असा निधी मिळतो...बचत गटांना फिरता निधी मिळतो. त्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे पाठवावे लागतात. गट स्थापन झाल्यानंतर तीन महिन्यांनीच हा निधी देता येतो. महिला बचत गटांना अधिकाधिक १५ हजारांपर्यंत निधी देण्यात येतो. यामध्ये तीन गट असून, अ गटासाठी १५ हजार, ब साठी १२ तर क गटासाठी १० हजार रुपये मिळतात. सातारा जिल्ह्णातील जवळपास सर्वच गट हे अ मध्येच आहेत. तर फिरत्या निधीची पुढील तीन महिन्यांत गटाअंतर्गतच परतफेड होते. त्यानंतर बँकेमार्फत एक लाखांपर्यंतचे कर्ज मिळते.