शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले सज्जनगड परिसर बनतोय मद्यपींचा अड्डा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:39 IST

परळी : सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा म्हणून सज्जनगड हा किल्ला ओळखला जातो. आजदेखील इतिहासाच्या पाऊलखुणा याठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, ...

परळी : सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा म्हणून सज्जनगड हा किल्ला ओळखला जातो. आजदेखील इतिहासाच्या पाऊलखुणा याठिकाणी पाहायला मिळतात. मात्र, शहरातील दररोजच्या आयुष्याला कंटाळून निसर्गाच्या सानिध्यात पार्टी करण्याच्या मानसिकतेमुळे सज्जनगड परिसर (पायरी मार्ग) मद्यपींचा अड्डाच बनत आहे. त्यामुळे राजरोसपणे वावरही वाढत चालला आहे. पोलिसांनी सज्जनगडसारख्या पवित्र अशा ठिकाणी मद्यप्राशन केले जाणार नाही, याची दक्षता घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परळी खोऱ्यातील दुर्गप्रेमींमधून होत आहे.

परळी खोऱ्यातील निसर्ग संपदेमुळे शहरातील रटाळ आयुष्य जगणारे नागरिक हे या भागात फिरण्यास तसेच पार्टीच्या नियोजनानेच दाखल होत असतात. मात्र, निसर्गाचा आनंद घेत असताना ऐतिहासिक जागेचे भानही विसरत असल्याने मद्यपींचा धिंगाणा स्थानिकांना डोकेदुखी ठरत आहे. तसेच पोलिसांनी उरमोडी धरण परिसर, सज्जनगड पायरी मार्ग अशा ठिकाणी गस्त घालून ऐतिहासिक वास्तूची अवहेलना होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती परळी खोऱ्यातील दुर्गप्रेमी तसेच स्थानिक नागरिक करत आहेत. सज्जनगडावर स्थानिकांसह संपूर्ण राज्यातून येणाऱ्या भाविक-भक्तांसह पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या परिसरात मद्यपान करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मार्गावर तसेच परिसरातील अनेक निवांत ठिकाणी बाटल्यांच्या खच पाहायला मिळत आहे. काहीजण यथेच्छ दारू ढोसून परत निघताना बाटल्या तशाच सोडून न जाता फोडत आहेत, त्याचा त्रास इतरांना होऊ शकतो, याचे भानही या मद्यपींना नाही. अशा घटनांमुळे एखाद्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे पोलिसांनी सज्जनगडासह परिसरातील वातावरण दूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.

(चौकट..)

पार्टी बहाद्दरांमुळे पायरी मार्ग परिसरात बाटल्यांचा खच

सज्जनगड पायरी मार्ग हा तसा कमी वर्दळीचा अन् निवांत, त्यामुळे मित्रमंडळी गोळा करून शहरातून मद्य घेऊन या परिसरात पार्टी करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मद्यप्राशन करून बाटल्या इतरत्र टाकणे तसेच खाण्यासाठी आणलेल्या खाद्यपदार्थांचे कागदही तसेच टाकले जात असल्याने परिसरात बाटल्या अन् कचरा दिसून येत आहे.

१८परळी

किल्ले सज्जनगड (ता. सातारा) परिसरात मद्यपींचा वावर वाढल्याने अनेक ठिकाणी बाटल्यांचा खच पडलेला पाहायला मिळत आहे. (छाया : अक्षय सोनटक्के)