शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

कोरेगाव बाजार समितीचा गड राष्ट्रवादीला अवघड

By admin | Updated: July 29, 2015 21:53 IST

निवडणूक : विभागवार तिकीट वाटपात अन्याय झाल्याची कार्यकर्त्यांची भावना

कोरेगाव : शेती उत्पन्न बाजार समितीवर पूर्ण ताकदीनिशी सत्तेवर येण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न दिवसेंदिवस अवघड होत चालले असल्याचे दिसू लागले आहे. तीन विधानसभा मतदारसंघांत विभागलेल्या या तालुक्यातील विभागवार तिकीट वाटपात झालेला अन्याय आणि नाराजांची वाढती संख्या पक्षासाठी डोकेदुखी ठरली आहे. उत्तर भागाला दिलेले प्राधान्य हे पक्षासाठी नुकसानकारक ठरणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. कोरेगाव तालुका हा कोरेगाव, फलटण राखीव व कऱ्हाड उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागला जात आहे. जिल्हा परिषदेसाठी कोरेगाव, कुमठे, एकंबे, वाठार किरोली, सातारारोड, वाठार स्टेशन व पिंपोडे बुद्रुक असे सात गट असून, या गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विविध संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली जात असल्याचा आजवरचा पक्षाचा अनुभव होता. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील खत्री यांच्या चर्चेतून उमेदवारीबाबत निर्णय घेतले जात होते. मात्र, बाजार समितीसाठी जिल्हा परिषद गट निकष हा पायदळी तुडविण्यात आल्याने विभागीय समीकरणे चुकली आणि इच्छुकांची वाढती संख्या थोपविण्यात आलेले अपयश हे पक्षासाठी नुकसानकारक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पणन मतदारसंघातून तानाजीराव शिंदे (चौधरवाडी) यांची बिनविरोध निवड झाली आहे. ते पिंपोडे बुद्रुक जिल्हा परिषद गटातील आहेत. याच गटातील बाळासाहेब सोळस्कर-पाटील (सोळशी), बाळासाहेब भोईटे (सर्कलवाडी), गुलाबराव जगताप (रणदुल्लाबाद), जयेंद्र लेंभे (पिंपोडे बुद्रुक) यांना संधी देण्यात आली आहे.तसेच वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटामध्ये अजय कदम, शांताराम दोरके, तुळशीदास वेळेकर व शकिला पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन गटांत १९ पैकी ९ उमेदवार आहेत. उर्वरित जिल्हा परिषद गटांमध्ये कोरेगाव गटात प्रीतम शहा, संजय बर्गे व प्रताप कुमुकले-निकम हे तिघे, एकंबे गटात विष्णुपंत कणसे व बबन मदने हे दोघे, वाठार किरोली गटात काकासाहेब गायकवाड, संतोष जगताप व कुसूम कदम या तिघांना तर कुमठे गटात विठ्ठल पवार व सातारारोड गटात दत्तात्रय कदम या प्रत्येकी एकाला संधी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)काँग्रेसचा नेटका प्रचार काँग्रेस पक्षाने बाजार समिती निवडणुकीकडे चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी विभागवार समसमान प्रतिनिधीत्व दिले आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याबरोबरच त्यांनी पक्ष संघटन विचारात घेऊन प्रचारास सुरुवात केली आहे. त्यांचे नेटके नियोजन व प्रचार चांगलाच फायद्यात ठरणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीतील सुंदोपसंदी त्यांना आयतीच फलदायी ठरण्याची शक्यता आहे.