शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

अपूर्ण योजनांना माजी मंत्रीच जबाबदार

By admin | Updated: May 28, 2015 00:56 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : वाठार स्टेशन येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र

वाठार स्टेशन : ‘वाठार स्टेशन गावचा रखडलेला पाणी प्रश्न सोडवण्याची धमक ही केवळ राष्ट्रवादी नेतृत्वाकडेच असून हा पाणी प्रश्न आम्ही सोडवतो फक्त आम्ही आणलेलं पाणी गावकऱ्यांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांना पाजण्याची भूमिका घ्यावी व या गावाला मिळालेली सभापती पदाची उंची वाढवावी,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी वाठार स्टेशन येथील कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच वसना-वांगणा रखडण्यात माजी मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा घणाणात ही त्यांनी केला.वाठार स्टेशन ता. कोरेगाव येथील कोरेगाव पंचायत समितीचे पहिले सदस्य रघुनाथ जाधव यांच्या नागरी सत्कार सोहळा तसेच जिल्हा बँकेच्या नूतन संचालक मंडळाच्या सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, संचालक नितीन काका पाटील, सभापती रुपाली जाधव, जि. प. सदस्य सतीश धुमाळ, किरण साबळे, रामभाऊ लेंभे, एस. आर. भोईटे, बाळासाहेब सोळस्कर यांची उपस्थिती होती.यावेळी वसना-वांगना पाणी योजनेबाबत बोलताना रामराजे म्हणाले वसना-वांगणा रखडण्यात माजी मुख्यमंत्री जबाबदार आहेत. या योजनेसाठी आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आज या दोन्ही योजना पूर्ण झाल्या असत्या.मुख्यमंत्र्यांनी जिहे-कठापूर योजनेसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे त्यांनी स्वागत करीत केवळ याच योजनेकडे न पाहता वसना वांगणा, टेंभू, ताकारी-म्हैसाळ या सिंचन योजनेला गव्हर्नरच्या आदेशाबाहेर ३७१ कलमाबाहेर काढण्याचे काम करावे.वसना योजनेसाठी काही गावातील लोक अडमूठे धोरण राबवत आहेत. जर पाणी हवचं असेल तर जमिनीच्या माध्यमातून त्याग करण्याची भूमीका घ्यावी लागेल तरच वसनेच पाणी पुढं सरकेल.राज्यातील असणाऱ्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात आता सर्वच पाणी योजना रखडणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पाणीच हवं असेल तर संघर्षाला तयार रहावे लागेल, असे आवाहन यावेळी केले. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, सत्ता नसताना सत्ता मिळवणं हा मोठेपणा आहे. रामराजेंना मिळालेली सभापतीपदाची संधी जिल्ह्याच्या विकासकामांना गतीमान करेल. सहा महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या सरकारकडून यापुढे सर्वसामान्यांच्या आशा धुळीला मिळणार आहेत. मोदी सरकारचे अच्छे दिन आले. परंतु ते परराष्ट्रांना आल्याचे सांगत देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा सांभाळा मग दौरे काढा, असा टोला लगावला. जलयुक्त शिवार ही संकल्पना आमच्या सरकारने राबवली. मात्र आज याचे राजकीय भांडवल होत आहे. केवळ जिहे-कठापूर योजनेकडे लक्ष न देता जिल्ह्यातील रखडलेल्या सर्वच योजनांसाठी निकष लावावा असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.आमदार दीपक चव्हाण म्हणाले, वाठार स्टेशनचा पाणीप्रश्न आम्ही आपले सरकार सत्तेवर असतानाच सोडवला होता. परंतु येथील स्थानिक ग्रामपंचायतीच्या आडमुठी भूमिकेमुळे हा प्रस्ताव माघारी गेला. वाठार स्टेशनचा पाणी प्रश्न आम्हीच सोडवू शकतो यासाठी येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला संधी द्या, असे त्यांनी आवाहन केले.यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब सोळस्कर यांनी मनोगत व्यक्त केली.रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रघुनाथ जाधव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. स्वागत संभाजी यादव यांनी तर आभार पं.स. सदस्य अशोक लेंभे यांनी मानले. कार्यक्रमास अजय कदम, निलेश जगदाळे, शिवाजी पवार, प्रशांत पवार, शहाजी भोईटे, संभाजीराव धुमाळ, सुरेखा पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)सोळस्करांवर रामराजेंची टोलेबाजी‘वसना योजना वेळेत न केल्यास तुमचे सहकारी नेते आत्महत्या करतील,’ असा शाब्दिक टोला शशिकांत शिंदे यांना मारल्यानंतर रामराजे म्हणाले, ‘या भागात लिंबाची सर्व झाडे तोडा म्हणजे ही आत्महत्या रोखता येईल.’ यावर चांगलाच हशा पिकला. रामराजे पुढे म्हणाले, ‘बाळासाहेबांचे शशिकांत शिंदे आद्य गुरु आहेत. मी साईड गुरु आहे. त्यामुळे शिंदे साहेब आता सावध रहा. शिंदेसाहेब... बाळासाहेबांना तुमच्या बंगल्याशेजारी घर बांधून द्या.’ यावर शिंदे म्हणाले, ‘असं झालं तर ते मलाही घराबाहेर काढतील.’ एकूणच रामराजेंच्या भाषणातील बाळासाहेबांच्यावरील टोलेबाजीने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.