शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अपूर्ण योजनांना माजी मंत्रीच जबाबदार

By admin | Updated: May 28, 2015 00:56 IST

रामराजे नाईक-निंबाळकर : वाठार स्टेशन येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र

वाठार स्टेशन : ‘वाठार स्टेशन गावचा रखडलेला पाणी प्रश्न सोडवण्याची धमक ही केवळ राष्ट्रवादी नेतृत्वाकडेच असून हा पाणी प्रश्न आम्ही सोडवतो फक्त आम्ही आणलेलं पाणी गावकऱ्यांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांना पाजण्याची भूमिका घ्यावी व या गावाला मिळालेली सभापती पदाची उंची वाढवावी,’ असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी वाठार स्टेशन येथील कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच वसना-वांगणा रखडण्यात माजी मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा घणाणात ही त्यांनी केला.वाठार स्टेशन ता. कोरेगाव येथील कोरेगाव पंचायत समितीचे पहिले सदस्य रघुनाथ जाधव यांच्या नागरी सत्कार सोहळा तसेच जिल्हा बँकेच्या नूतन संचालक मंडळाच्या सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे चेअरमन आ. शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, संचालक नितीन काका पाटील, सभापती रुपाली जाधव, जि. प. सदस्य सतीश धुमाळ, किरण साबळे, रामभाऊ लेंभे, एस. आर. भोईटे, बाळासाहेब सोळस्कर यांची उपस्थिती होती.यावेळी वसना-वांगना पाणी योजनेबाबत बोलताना रामराजे म्हणाले वसना-वांगणा रखडण्यात माजी मुख्यमंत्री जबाबदार आहेत. या योजनेसाठी आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आज या दोन्ही योजना पूर्ण झाल्या असत्या.मुख्यमंत्र्यांनी जिहे-कठापूर योजनेसाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे त्यांनी स्वागत करीत केवळ याच योजनेकडे न पाहता वसना वांगणा, टेंभू, ताकारी-म्हैसाळ या सिंचन योजनेला गव्हर्नरच्या आदेशाबाहेर ३७१ कलमाबाहेर काढण्याचे काम करावे.वसना योजनेसाठी काही गावातील लोक अडमूठे धोरण राबवत आहेत. जर पाणी हवचं असेल तर जमिनीच्या माध्यमातून त्याग करण्याची भूमीका घ्यावी लागेल तरच वसनेच पाणी पुढं सरकेल.राज्यातील असणाऱ्या सरकारच्या पाच वर्षांच्या काळात आता सर्वच पाणी योजना रखडणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला पाणीच हवं असेल तर संघर्षाला तयार रहावे लागेल, असे आवाहन यावेळी केले. आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, सत्ता नसताना सत्ता मिळवणं हा मोठेपणा आहे. रामराजेंना मिळालेली सभापतीपदाची संधी जिल्ह्याच्या विकासकामांना गतीमान करेल. सहा महिन्यापूर्वी सत्तेवर आलेल्या सरकारकडून यापुढे सर्वसामान्यांच्या आशा धुळीला मिळणार आहेत. मोदी सरकारचे अच्छे दिन आले. परंतु ते परराष्ट्रांना आल्याचे सांगत देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा सांभाळा मग दौरे काढा, असा टोला लगावला. जलयुक्त शिवार ही संकल्पना आमच्या सरकारने राबवली. मात्र आज याचे राजकीय भांडवल होत आहे. केवळ जिहे-कठापूर योजनेकडे लक्ष न देता जिल्ह्यातील रखडलेल्या सर्वच योजनांसाठी निकष लावावा असे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.आमदार दीपक चव्हाण म्हणाले, वाठार स्टेशनचा पाणीप्रश्न आम्ही आपले सरकार सत्तेवर असतानाच सोडवला होता. परंतु येथील स्थानिक ग्रामपंचायतीच्या आडमुठी भूमिकेमुळे हा प्रस्ताव माघारी गेला. वाठार स्टेशनचा पाणी प्रश्न आम्हीच सोडवू शकतो यासाठी येणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला संधी द्या, असे त्यांनी आवाहन केले.यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले, बाळासाहेब सोळस्कर यांनी मनोगत व्यक्त केली.रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रघुनाथ जाधव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. स्वागत संभाजी यादव यांनी तर आभार पं.स. सदस्य अशोक लेंभे यांनी मानले. कार्यक्रमास अजय कदम, निलेश जगदाळे, शिवाजी पवार, प्रशांत पवार, शहाजी भोईटे, संभाजीराव धुमाळ, सुरेखा पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)सोळस्करांवर रामराजेंची टोलेबाजी‘वसना योजना वेळेत न केल्यास तुमचे सहकारी नेते आत्महत्या करतील,’ असा शाब्दिक टोला शशिकांत शिंदे यांना मारल्यानंतर रामराजे म्हणाले, ‘या भागात लिंबाची सर्व झाडे तोडा म्हणजे ही आत्महत्या रोखता येईल.’ यावर चांगलाच हशा पिकला. रामराजे पुढे म्हणाले, ‘बाळासाहेबांचे शशिकांत शिंदे आद्य गुरु आहेत. मी साईड गुरु आहे. त्यामुळे शिंदे साहेब आता सावध रहा. शिंदेसाहेब... बाळासाहेबांना तुमच्या बंगल्याशेजारी घर बांधून द्या.’ यावर शिंदे म्हणाले, ‘असं झालं तर ते मलाही घराबाहेर काढतील.’ एकूणच रामराजेंच्या भाषणातील बाळासाहेबांच्यावरील टोलेबाजीने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.