शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पुढची पंचवीस वर्ष सत्तेत जाण्याचे विसरा

By admin | Updated: June 1, 2015 00:15 IST

फलटण सभा : गिरीश बापट यांची काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका

फलटण : काँग्रेसची घोटाळ्याची काळी पाप जनतेला कळली म्हणुन जनतेने लाथ मारून त्यांना सत्तेतून हाकलून दिले आहे. एका वर्षात मोदी सरकारची गाडी कोणत्या दिशेने ध्येय धोरणे घेऊन पुढे चालली आहे. हे लोकांना समजले आहे. एका वर्षात एक रुपययांचा भ्रष्टाचाराचा आरोपही सध्याच्या सरकारवर नाही. त्यामुळे पुढची पंचवीस वर्ष सत्तेत जाण्याचे विसरा, असा घणाघात हल्ला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी केला.मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जनकल्याण पर्व मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत गजानन चौकात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार दिलीप येळगावकर, दत्ताजी थोरात, अनुप सुर्यवंशी, जिल्हाउपाध्यक्ष अनुप शहा, शहराध्यक्ष दादासाहेब चोरमले, रत्नप्रभा हिंगे, नयना भगत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.बापट म्हणाले, या देशातील जनतेने भारतीय जनता कौल दिला. आमचे सरकार सत्तेत आले. सरकार बदल्यावर लोकांची अपेक्षा असते काय मिळाले. आम्ही सत्तेत येताना सांगितले होते. अच्छे दिन आयेंगे. हा देश कृषीप्रधान देश आहे. या देशाचा खरा स्वामी शेतकरी आहे. म्हणून शेतकरी जगला तर शेतकऱ्याला भाव मिळाला. आत्महत्या थांबल्या पाहिजेत, यासाठी जे. जे. लागेल ते ते देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. शेतकरी अनेक नैसर्गिक आपत्तीना तोंड देत असतो. कधी पाणी नाही म्हणून कधी अवकाळी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मागे सरकार खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मागील सरकारने शेतकऱ्यांसाठी नुसत्या घोषणा केल्या. आम्ही ज्यावेळी राज्यात सत्तेवर आलो. अनेक आव्हाने उभी होती. पण शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन गारपीट असेल, अवकाळी असेल, वादळी असेल त्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आमच्या सरकारने तातडीने मदत केली.काँग्रेस सरकारने या देशात कोळसा सुद्धा खायचा सोडला नाही. १२ लाख कोटीचा घोटाळा त्यांनी करून स्वत:चे तोंड काळे केले. या खाणीचा मोदी सरकारने ई टेंडरिंग करून लिलाव केले व केंद्र सरकारच्या तिजोरीत दोन लाख कोटी जमा झाले. विरोधक विचारतात की काळा पैसा आणण्याचे काय झाले. परदेशातील पैशाची माहिती घेण्यासाठी कायदा करावा लागतो. (प्रतिनिधी)फलटणमध्ये येऊन रामराजेंचे कौतुकसिंचनाच्या बाबती बोलतान बापट म्हणाले,जलसंपदाचे काम रामराजे पाहत होते. पण सज्जन रामराजेंकडील खाते अजीत पवारांनी काढून घेतले. खाते रामराजेंकडे होते तरी,जलसंपदा मधील जल रामराजेंकडे.....संपदा अजीत पवारांकडे.. कृष्णा खोऱ्यातील कृष्णा रामराजेंकडे.....खोरे अजित पवारांकडे असे म्हणताच सभा स्थळी एकच हशा पिकला. फलटणमध्ये येऊन रामराजेंचेवर टीका न करता एक प्रकारे कौतुकच करून बापट यांनी त्यांच्याशी असलेले आपले मैत्रीचे संबध जपल्याची चर्चा सभा स्थळी होती