शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सवयभानचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:44 IST

सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत होती. मात्र, साधारणत: एक महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या शंभर ते ...

सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत होती. मात्र, साधारणत: एक महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या शंभर ते चारशेच्या घरात आहेत, तर मृतांचा आकडा खूपच खाली आला आहे; पण यामुळे कोरोना संपला असे म्हणता येणार नाही. तरीही अनेक सातारकर मास्कचा वापर करत नाहीत. गेल्या वर्षी कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हा सामाजिक कार्यातून एक गाडी मास्कचा वापर करण्याबाबत सवयभानची आठवण करून दिली जात होती; पण आता नागरिकांना सवयभानचा विसर पडला आहे.

००००

साताऱ्यातील रस्ते रात्री उशिरापर्यंत गजबजलेले

सातारा : कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन अनेक प्रकारे नियोजन करत आहे. रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली होती. गेल्या वर्षी गणेशोत्सवात पूर्णपणे संचारबंदी लागू केली होती. यंदा मात्र कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झालेले असल्याने सातारकर बिनधास्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना नव्हता तेव्हा ज्या पद्धतीने लोकांची दिवसभर गर्दी असायची, त्याच पद्धतीने आताही साताऱ्यातील रस्ते पूर्णपणे गजबजलेले असतात. राजवाडा परिसरातील खाद्यपदार्थांचे गाडे, आइस्क्रीम विक्रीच्या गाड्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली दिसत आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोसायट्यांमध्ये गरज

सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यातील असंख्य वसाहतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मात्र, रखवालदार नाही. त्यामुळे कोणी आले तर विचारणा होत नाही; पण काही सोसायटीत कसलीही खबरदारी घेतली गेलेली नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेस काही नागरिकांचा वावर वाढला आहे. अशांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे, तर ज्या सोसायट्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, अशा ठिकाणाहून पेट्रोल, डिझेलची चोरी वाढत आहे.

रस्त्यावर वाहनतळ

सातारा : साताऱ्यापासून करंजे परिसरातील रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे अनेकदा वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे संबंधितांनी योग्य त्या ठिकाणी वाहने उभी करावीत, अशी मागणी होत आहे.

चौकात पुन्हा गर्दी

सातारा : कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांतून बिनधास्तपणा वाढला आहे; पण त्याचवेळी दररोज सायंकाळी अकरा वाजून गेले तरी असंख्य सातारकर चौकामध्ये आइस्क्रीम खाण्यासाठी गर्दी करत असतात. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.