शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

शवविच्छेदन नसेल तर आर्थिक मदत विसरा!

By admin | Updated: August 7, 2016 01:04 IST

नैसर्गिक आपत्ती : जिल्ह्यात ४ मृतांच्या नातेवाइकांना १६ लाखांची मदत

सातारा : चालू वर्षीच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने मृत्युमुखी पडलेल्या ४ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने १६ लाखांची मदत केली आहे. एका व्यक्तीच्या कुटुंबीयांनी मृताचे शवविच्छेदन करण्यास विरोध केल्याने मदत मिळू शकलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमध्ये आर्थिक मदत मिळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून केला जाणारा पंचनामा व शवविच्छेदन अहवाल या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत.नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते. पुरात वाहून गेलेली व्यक्ती, विजेचा धक्का लागून मृत्यू, वीज अंगावर पडून मृत्यू, दरड कोसळून मृत्यू आदी घटनांमध्ये ही मदत दिली जाते. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. चांभारवाडी, ता. फलटण येथील सोमनाथ उत्तम चतूर यांचा दि. ३ जून २०१६ रोजी वीज पडून मृत्यू झाला होता. रामवाडी, ता. जावली येथील अशोक विठ्ठल पाडळे यांचाही वीज पडून दि. ८ जून २०१६ रोजी मृत्यू झाला. ऐनाकवाडी, गोकूळ तर्फ हेळवाक, ता. पाटण येथील लक्ष्मण शंकर कदम यांचाही दि. १० जुलै २०१६ रोजी ओढ्याच्या पुलात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. नांदगाव, ता. कऱ्हाड येथील बाबासो कोंडिबा मकानदार यांचा दि. १३ जुलै रोजी दक्षिण मांड नदीच्या पुरात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. या सर्वांना जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येकी ४ लाख अशी एकूण १६ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. दरम्यान, अंबवडे (ता. खटाव) येथील निखिल संभाजी पवार यांचा दि. ७ जून २०१६ रोजी अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदनच झाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत मिळू शकलेली नाही. तसेच विजापूर, कर्नाटक येथील लक्ष्मण कापू राठोड यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कर्नाटक राज्यातील असल्याने संबंधित राज्यामार्फत मदत मिळण्यासाठी हे प्रकरण तहसीलदारांकडे पाठविण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील सहा जनावरे दगावली. त्यापैकी दुधाळ जनावरांना प्रत्येकी ३० हजार रुपये अशी मदत करण्यात आली आहे. मृत जनावरांच्या मालकांना दीड लाख रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आली आहे. १७० घरांची पडझड झाली. एक झोपडी व ११ जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले. पूर्णत: पडझड झालेल्या २ घरांपैकी एक घर मदतीसाठी पात्र ठरले आहे. अंशत: पडझड झालेल्या पक्क्या ६१ घरांपैकी ४४ घरे मदतीस पात्र ठरली आहेत. अंशत: पडझड झालेल्या १६९ कच्च्या घरांपैकी ७१ घरे मदतीला पात्र ठरली आहे. बांधकाम विभागातर्फे संबंधित नुकसानीची तपासणी केली जात आहे. पात्र ठरलेल्यांपैकी आणखी काहीजण अपात्र ठरण्याची शक्यता आहे. चालू पावसाळ्यात सार्वजनिक मालमत्तेचे ९७ लाखांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)प्रेत सापडले नसल्याने मदत प्रलंबितलिंब, ता. सातारा येथील कृष्णा नदी पुलावरून रवींद्र भरत जाधव (रा. गोवे व जिहे, ता. सातारा) येथील रघुनाथ महादू जाधव हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. वेंगळे, ता. महाबळेश्वर येथील शंकर भिवा संकपाळ यांचा ओढ्याच्या पुरात बुडून मृत्यू झाला. पोलिस पंचनामा व शवविच्छेदन अहवाल जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेला नाही.२० कुटुंबे स्थलांतरित..फलटण तालुक्यातील जाधववाडी (साठे) या गावातील नीरा नदी काठावरील एकूण २० कुटुंबांतील ५८ व्यक्तींचे पुराच्या पाण्यामुळे इतरत्र सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.