शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

शवविच्छेदन नसेल तर आर्थिक मदत विसरा!

By admin | Updated: August 7, 2016 01:04 IST

नैसर्गिक आपत्ती : जिल्ह्यात ४ मृतांच्या नातेवाइकांना १६ लाखांची मदत

सातारा : चालू वर्षीच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीने मृत्युमुखी पडलेल्या ४ मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना जिल्हा प्रशासनाने १६ लाखांची मदत केली आहे. एका व्यक्तीच्या कुटुंबीयांनी मृताचे शवविच्छेदन करण्यास विरोध केल्याने मदत मिळू शकलेली नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमध्ये आर्थिक मदत मिळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून केला जाणारा पंचनामा व शवविच्छेदन अहवाल या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत.नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई दिली जाते. पुरात वाहून गेलेली व्यक्ती, विजेचा धक्का लागून मृत्यू, वीज अंगावर पडून मृत्यू, दरड कोसळून मृत्यू आदी घटनांमध्ये ही मदत दिली जाते. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाइकांना ४ लाख रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. चांभारवाडी, ता. फलटण येथील सोमनाथ उत्तम चतूर यांचा दि. ३ जून २०१६ रोजी वीज पडून मृत्यू झाला होता. रामवाडी, ता. जावली येथील अशोक विठ्ठल पाडळे यांचाही वीज पडून दि. ८ जून २०१६ रोजी मृत्यू झाला. ऐनाकवाडी, गोकूळ तर्फ हेळवाक, ता. पाटण येथील लक्ष्मण शंकर कदम यांचाही दि. १० जुलै २०१६ रोजी ओढ्याच्या पुलात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. नांदगाव, ता. कऱ्हाड येथील बाबासो कोंडिबा मकानदार यांचा दि. १३ जुलै रोजी दक्षिण मांड नदीच्या पुरात वाहून जाऊन मृत्यू झाला होता. या सर्वांना जिल्हा प्रशासनातर्फे प्रत्येकी ४ लाख अशी एकूण १६ लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. दरम्यान, अंबवडे (ता. खटाव) येथील निखिल संभाजी पवार यांचा दि. ७ जून २०१६ रोजी अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. मात्र, त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदनच झाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांना ही आर्थिक मदत मिळू शकलेली नाही. तसेच विजापूर, कर्नाटक येथील लक्ष्मण कापू राठोड यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कर्नाटक राज्यातील असल्याने संबंधित राज्यामार्फत मदत मिळण्यासाठी हे प्रकरण तहसीलदारांकडे पाठविण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये जिल्ह्यातील सहा जनावरे दगावली. त्यापैकी दुधाळ जनावरांना प्रत्येकी ३० हजार रुपये अशी मदत करण्यात आली आहे. मृत जनावरांच्या मालकांना दीड लाख रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आली आहे. १७० घरांची पडझड झाली. एक झोपडी व ११ जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले. पूर्णत: पडझड झालेल्या २ घरांपैकी एक घर मदतीसाठी पात्र ठरले आहे. अंशत: पडझड झालेल्या पक्क्या ६१ घरांपैकी ४४ घरे मदतीस पात्र ठरली आहेत. अंशत: पडझड झालेल्या १६९ कच्च्या घरांपैकी ७१ घरे मदतीला पात्र ठरली आहे. बांधकाम विभागातर्फे संबंधित नुकसानीची तपासणी केली जात आहे. पात्र ठरलेल्यांपैकी आणखी काहीजण अपात्र ठरण्याची शक्यता आहे. चालू पावसाळ्यात सार्वजनिक मालमत्तेचे ९७ लाखांचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)प्रेत सापडले नसल्याने मदत प्रलंबितलिंब, ता. सातारा येथील कृष्णा नदी पुलावरून रवींद्र भरत जाधव (रा. गोवे व जिहे, ता. सातारा) येथील रघुनाथ महादू जाधव हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. वेंगळे, ता. महाबळेश्वर येथील शंकर भिवा संकपाळ यांचा ओढ्याच्या पुरात बुडून मृत्यू झाला. पोलिस पंचनामा व शवविच्छेदन अहवाल जिल्हा प्रशासनाला अद्याप प्राप्त झालेला नाही.२० कुटुंबे स्थलांतरित..फलटण तालुक्यातील जाधववाडी (साठे) या गावातील नीरा नदी काठावरील एकूण २० कुटुंबांतील ५८ व्यक्तींचे पुराच्या पाण्यामुळे इतरत्र सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.