शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

वणवा रोखण्यासाठी वन विभागाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

कऱ्हाड तालुक्यातील कोळे बिट हे नऊशे हेक्टर वनक्षेत्र असलेले सर्वात मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जाते; तर सामाजिक वनिकरणाचे सुमारे ...

कऱ्हाड तालुक्यातील कोळे बिट हे नऊशे हेक्टर वनक्षेत्र असलेले सर्वात मोठे क्षेत्र म्हणून ओळखले जाते; तर सामाजिक वनिकरणाचे सुमारे तीनशे ते चारशे हेक्टर क्षेत्र आहे. या वनक्षेत्रात घनदाट झाडी व डोंगरक्षेत्र मोठे असल्याने वन्यप्राण्यांची संख्याही मोठी आहे. ससा, बिबट्या, रानडुक्कर, काळवीट आदी प्राण्यांसह सरपटणाऱ्या विविध जातीच्या प्राण्यांची या विभागात मोठी संख्या आहे. डोंगर पायथ्याला बारमाही पाणीसाठा असलेला वानरवाडी पाझर तलाव असल्याने पशु-पक्ष्यांची मोठी संख्या आहे.

सध्या सर्वत्र गवत कापणी सुरू झाली आहे. वनक्षेत्रालगत अनेक शेतकऱ्यांच्या गायरान तसेच चालू जमिनी आहेत. शेताकडील बांधावरचे, तर गायरानातील गवत कापणी केल्यानंतर साचलेला पालापाचोळा शेतकऱ्यांकडून पेटवला जातो. त्यावेळी अनेकदा योग्य ती काळजी न घेतल्याने वनक्षेत्राला वणवा लागून वनसंपत्तीचे मोठे नुकसान होते. त्यामुळे वणवा लागू नये, यासाठी नोटीसद्वारे जनजागृती केली जात आहे.

- चौकट

... तर दंडासह तुरुंगवासाची शिक्षा

जंगलक्षेत्र व रोपवन परिसर हद्दीलगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी बांध पेटवताना वन विभागाला त्याबाबतची माहिती द्यावी. माहिती न दिल्यास अथवा सावधगिरीच्या उपाययोजना न करता बांध पेटविल्यास भारतीय वनअधिनियम कायद्यानुसार एक वर्ष कैद व दोन हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा संबंधिताला भोगाव्या लागतील, असा इशाराही नोटीसद्वारे देण्यात आला आहे.

- चौकट

वन विभागाने केले आवाहन

१) बांध पेटवताना आग विझल्याशिवाय मालकी क्षेत्र सोडून जाऊ नये.

२) जंगलक्षेत्रास वणवा लागल्यास वन कर्मचाऱ्यांना मदत करा.

३) वणवा लावणाऱ्याचे नाव कळवावे.

४) आगीपासून जंगलसंपत्तीचे संरक्षण करावे