शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

माण तालुक्यात वनविभागाने झाडे लावली; पाण्याविना कोमेजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:18 IST

पळशी : माण तालुक्यात शासनाच्या वतीने गतवर्षीच्या १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाचा वनविभागाच्या बेफिकीर अधिकाऱ्यांमुळे फज्जा उडाला असून, लागवड केल्यानंतर पिंजरे न बसवल्याने दुसºयांच दिवशीमोकाट जनावरांनी झाडे फस्त केली आहेत.झाडांची लागवड करण्याबरोबर झाडांना पाणी न दिल्याने झाडे जळू लागली असून, आताच शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी ...

पळशी : माण तालुक्यात शासनाच्या वतीने गतवर्षीच्या १३ कोटी वृक्षलागवड कार्यक्रमाचा वनविभागाच्या बेफिकीर अधिकाऱ्यांमुळे फज्जा उडाला असून, लागवड केल्यानंतर पिंजरे न बसवल्याने दुसºयांच दिवशीमोकाट जनावरांनी झाडे फस्त केली आहेत.झाडांची लागवड करण्याबरोबर झाडांना पाणी न दिल्याने झाडे जळू लागली असून, आताच शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणी जनतेमधून होत आहे. वैश्विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत गांभीर्याने घेत राज्य शासनाच्या वतीने विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या उद्दिष्टामध्ये सन २०१८ मध्ये १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, त्यासाठी शासनाने कंबर कसली असली तरी माण तालुक्यात नुकतीच लागवड केलेल्या वृक्षांची झाडे दुसºयाच दिवशी मोकाट जनावरांनी फस्त केली तर जनावरांपासून वाचलेली झाडे पाण्यावाचून जळून चाललीआहेत.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तीनपट अधिक वृक्षलागवडीचे ध्येय ठेवण्यात आले असून, सर्व विभागांचा सहभाग घेण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त स्वयंसेवी संस्था आणि काही नागरिकही पुढे येत असून, जुलै महिन्यात ही वृक्षलागवड मोहीम राज्यात मोठ्या प्रमाणात यश गाठेल, असा विश्वास असतानाच माण तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने २२ ठिकाणी ७५,७१९ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. १ जुलैपासून वृक्षांची वनविभागाने वाजत-गाजत लागवड ही केली आहे. काही ठिकाणी लागवड करताना फोटोसेशन ही अधिकाºयांनी केले; मात्र याच बेफिकीर अधिकाºयांनी अपुरे खड्डे काढणे, जळालेल्या झाडांची लागवड करणे, झाडांना पिंजरे न बसवणे, काही ठिकाणी खड्डेच न काढणे अशा अनेक बेजबाबदार कारणाने ही वृक्षलागवड कार्यक्रम फोल ठरला असल्याचे चित्र दिसत आहे.या प्रकरणाची वन खात्यातील वरिष्ठ अधिकाºयांनी सखल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जनतेमधून जोर धरत आहे.माहिती देण्यास वनक्षेत्रपालांची टाळाटाळ !माणच्या वनक्षेत्रपाल कौशल्या भोसले यांना खड्ड्यांचे आकारमान किती ? एक खड्डा काढण्यासाठी किती खर्च आला? झाडे लागवड करण्यासाठी किती रक्कम? पिंजरा घेण्यासाठी किती रक्कम? अशी माहिती व अन्य माहिती शासन निर्णयाप्रमाणे मागितली असता त्यांनी माझं नवीन पोस्टिंग आहे. मला माहीत नाही. तुम्ही अर्ज द्या, तुम्हाला माहिती घेऊन देते,’ असे सांगितले; परंतु त्यांनीच ही सर्व वृक्षलागवड करून घेतली असून, त्यांना माहीत नसणे याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.