शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

आगाशिवच्या पायथ्याला बिबट्याच्या डरकाळीची दहशत कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:29 IST

मलकापूर : बिबट्याचा हल्ला होण्याच्या व दिसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बछड्यासह बिबट्याच्या कळपाचे शेतकऱ्यांना दर्शन ...

मलकापूर : बिबट्याचा हल्ला होण्याच्या व दिसण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बछड्यासह बिबट्याच्या कळपाचे शेतकऱ्यांना दर्शन झाले होते. दोन दिवसांपूर्वीच विंग शिवारात पाळीव प्राण्यांवर बिबट्याने हल्ला केला, तर डोंगरावर शुक्रवारी सकाळी फिरायला गेलेल्यांनाही बिबट्याचे दर्शन झाले. आगाशिव डोंगराच्या पायथ्याला पाळीव प्राण्यांवर हल्ले व दर्शन होत असल्यामुळे या भागात बिबट्याच्या डरकाळीची दहशत कायम आहे.

आगाशिव डोंगराभोवतीच्या गावात अनेकवेळा बिबट्याने प्राणी ठार केले आहेत. गेल्या काही महिन्यात चचेगाव, आगाशिवनगर, जखिणवाडी, धोंडेवाडी, नांदलापूर शिवारात शेतातील वस्तीवरील शेळ्या ठार केल्या आहेत. काहीवेळा तर रानातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करत पाच-पाच शेळ्या ठार केल्या आहेत. त्यामुळे या परिसरात किमान महिन्यातून एकदा किंवा दोनदा बिबट्याचा हल्ला होण्याचे समिकरणच झाले आहे. आगाशिव डोंगर पायथ्याला मुनावळे गावालगत चार शेळ्या फस्त केल्या होत्या. हा हल्ला एका बिबट्याचा नसून, बिबट्यांच्या कळपाचा असावा, असा अंदाज वन विभागाने घटनास्थळी भेट दिल्यानंतर वर्तवला होता. या अंदाजाप्रमाणे साधारणतः एक वर्षाच्या दोन बछड्यांसह मादी बिबट्याला पाहिल्याचे काही शेतकऱ्यांनी त्यावेळीही सांगितले होते. त्यामुळे या परिसरात बिबट्याच्या कळपाचा वावर आहे, हे सिध्द होत आहे.

त्याच पध्दतीने काही दिवसांपूर्वी नांदलापूरसह कापीलमळा परिसरात दोन बछड्यांसह बिबट्याचा वावर होता. तसेच परिसरातील काही शेतकऱ्यांना या कळपाचे दर्शनही झाले आहे. पंधरा दिवसांपूर्वी जखिणवाडीत कृष्णानगर येथील राजेंद्र मोहिते यांची शेळी बिबट्याने ठार केली तर चचेगाव येथील टाके वस्तीनजीक ढेब वस्तीवर भिकाजी पवार यांच्या शेडात एक शेळी ठार केली. भरवस्तीत पाळीव प्राण्यांवर हल्ला झाल्यामुळे चचेगावात खळबळ उडाली होती. दोन दिवसांपूर्वीच विंग, सुतारकी शिवारात पाळीव प्राण्यांवर हल्ला केला तर शुक्रवारी डोंगरावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्यांनाही बिबट्याचे वीस फुटावरून दर्शन झाले. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे या परिसरातील शेतकरी रानात जाण्यासाठी धजावत नाहीत. डोंगरालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचा कळपानेच वावर आहे, हे या घटनांवरून स्पष्ट होत आहे. वरचेवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे डोंगरालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने बिबट्याची दहशत कायम आहे.

चौकट

तक्रार केल्यास नुकसानभरपाई

‘बिबट्या सतत स्थलांतरित होणारा प्राणी आहे. तो स्वतःच्या उंचीपेक्षा कमी उंचीच्या प्राण्यांवरच हल्ला करतो. पाळीव प्राण्यावर हल्ला झाल्यास तक्रार नोंदवावी, त्यामुळे झालेले नुकसान वन विभागाकडून मिळेल. तसेच शेतात काम करणाऱ्यांनी लहान मुलांना शेतात घेऊन जाऊ नये. बिबट्याची छेडछाड केली तरच तो हल्ला करतो. शेतकऱ्यांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खबरदारी घ्यावी,’ असे आवाहन वनपाल ए. पी. सवाखंडे यांनी केले आहे.