शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

वाहनधारकांचा चक्क पोलिसांना चकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली असली, तरी साताऱ्यातील बहुतांश नागरिक व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली असली, तरी साताऱ्यातील बहुतांश नागरिक व वाहनधारकांना याचे कसलेच गांभीर्य नाही. प्रमुख रस्ते व चौकात पोलिसांकडून सुरू असलेली कारवाई टाळण्यासाठी शुक्रवारी वाहनधारक चक्क गल्लीबोळातून प्रवास करताना दिसून आले, तर दुसरीकडे भाजी मंडईत नेहमीप्रमाणेच गर्दी दिसून आली.

राज्य शासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दि.१५ ते ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, उद्योग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात गुरुवार, दि.१५ पासून या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, नागरिकांचा संचारबंदीला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी साताऱ्याची बाजारपेठ गजबजून गेली होती. हजारो वाहनधारक रस्त्यावरून फेरफटका मारताना दिसून आले. किराणा दुकानाच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. भाजी मंडईही गर्दीने तुडुंब भरली होती. कुठेही फिजिकल डिस्टन्सचे पालन झाले नाही. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील बाजारपेठेत गर्दी दिसून आली. मात्र, यामध्ये वाहनधारकांची संख्या लक्षणीय होती.

शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेक वाहनधारकांनी क्लृप्त्या लढविल्या. प्रमुख रस्त्यावरून ये-जा करण्याऐवजी अनेकांना गल्लीबोळातून प्रवास करणे सोयीचे वाटले. एकीकडे प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवतोड मेहनत घेत आहे. पोलीस प्रशासन अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र, वाहनधारक व नागरिकांचे प्रशासनाला म्हणावे असे सहकार्य मिळत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे.

(पॉइंटर)

१. संचारबंदीची रिक्षाचालकांना सर्वात मोठी झळ बसत आहे. प्रवासी नसल्याने रिक्षाचालकांना दिवसभर ग्राहकांची वाट पाहत बसावे लागत आहे.

२. एसटीसेवेचीही काहीशी अशीच अवस्था आहे. प्रवाशांअभावी एसटीच्या अनेक फेऱ्या दोन दिवसांपासून रद्द करण्यात आल्या आहेत.

३. शहरातील दुकाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक दुकानदार रात्री उशिरापर्यंत अर्धे शटर खाली करून दुकान सुरू ठेवत आहेत.

४. शेतकऱ्यांच्या कृषी मालाचा उठाव होत नसल्याने शेतकऱ्यांकडून विविध प्रकारच्या फळे व पालेभाज्यांची चढ्या दराने विक्री केली जात आहे.

५. विविध वस्तूंच्या किमती वाढल्याने याचा ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.

फोटो : जावेद खान