शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

वाहनधारकांचा चक्क पोलिसांना चकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली असली, तरी साताऱ्यातील बहुतांश नागरिक व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली असली, तरी साताऱ्यातील बहुतांश नागरिक व वाहनधारकांना याचे कसलेच गांभीर्य नाही. प्रमुख रस्ते व चौकात पोलिसांकडून सुरू असलेली कारवाई टाळण्यासाठी शुक्रवारी वाहनधारक चक्क गल्लीबोळातून प्रवास करताना दिसून आले, तर दुसरीकडे भाजी मंडईत नेहमीप्रमाणेच गर्दी दिसून आली.

राज्य शासनाने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दि.१५ ते ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू केले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय, उद्योग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात गुरुवार, दि.१५ पासून या नियमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, नागरिकांचा संचारबंदीला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी साताऱ्याची बाजारपेठ गजबजून गेली होती. हजारो वाहनधारक रस्त्यावरून फेरफटका मारताना दिसून आले. किराणा दुकानाच्या बाहेर रांगा लागल्या होत्या. भाजी मंडईही गर्दीने तुडुंब भरली होती. कुठेही फिजिकल डिस्टन्सचे पालन झाले नाही. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी देखील बाजारपेठेत गर्दी दिसून आली. मात्र, यामध्ये वाहनधारकांची संख्या लक्षणीय होती.

शहरात विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेक वाहनधारकांनी क्लृप्त्या लढविल्या. प्रमुख रस्त्यावरून ये-जा करण्याऐवजी अनेकांना गल्लीबोळातून प्रवास करणे सोयीचे वाटले. एकीकडे प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवतोड मेहनत घेत आहे. पोलीस प्रशासन अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र, वाहनधारक व नागरिकांचे प्रशासनाला म्हणावे असे सहकार्य मिळत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे.

(पॉइंटर)

१. संचारबंदीची रिक्षाचालकांना सर्वात मोठी झळ बसत आहे. प्रवासी नसल्याने रिक्षाचालकांना दिवसभर ग्राहकांची वाट पाहत बसावे लागत आहे.

२. एसटीसेवेचीही काहीशी अशीच अवस्था आहे. प्रवाशांअभावी एसटीच्या अनेक फेऱ्या दोन दिवसांपासून रद्द करण्यात आल्या आहेत.

३. शहरातील दुकाने सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अनेक दुकानदार रात्री उशिरापर्यंत अर्धे शटर खाली करून दुकान सुरू ठेवत आहेत.

४. शेतकऱ्यांच्या कृषी मालाचा उठाव होत नसल्याने शेतकऱ्यांकडून विविध प्रकारच्या फळे व पालेभाज्यांची चढ्या दराने विक्री केली जात आहे.

५. विविध वस्तूंच्या किमती वाढल्याने याचा ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.

फोटो : जावेद खान