शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांप्रति दाखवलेल्या भूतदयेनं बिघडवली अन्नसाखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:39 IST

सातारा : भटक्या श्वानांप्रमाणे भूतदया दाखवून गवा, मोर, वानर आदी वन्यप्राण्यांना खाऊ घालण्याच्या प्रकारामुळे नैसर्गिक अन्नसाखळी बिघडत असल्याचे स्पष्ट ...

सातारा : भटक्या श्वानांप्रमाणे भूतदया दाखवून गवा, मोर, वानर आदी वन्यप्राण्यांना खाऊ घालण्याच्या प्रकारामुळे नैसर्गिक अन्नसाखळी बिघडत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयतं मिळत असल्यामुळे नैसर्गिक पद्धतीने अन्न शोधण्याची कला हे प्राणी विसरू लागल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

गत सप्ताहात महाबळेश्वरच्या रांजणवाडी येथील इब्राहिम महंमद पटेल गव्याला पाव खाऊ घालत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. वन्यजीव अधिनियमानुसार या प्रकरणी त्यांना नोटीस बजावल्यानंतर वन्यप्राण्यांना खाऊ घालणं हा गुन्हा असल्याचं स्पष्ट झालं. गव्यासह वानर, मोर, चिमणी यांनाही खाऊ घालणं हा वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा आहे. या प्रकारे वन्यजीवांना खाऊ घालणारे सर्वच लोक वनविभागाच्या रडारवर आहेत.

वन्यक्षेत्राच्या लगत असणाऱ्या शहरी भागांमध्ये भूतदयेच्या नावाखाली प्राण्यांना खाऊ घालणं, त्यांच्यासाठी पाणी ठेवणं, त्यांना तयार घरटी तयार करून देण्याचं अनोखं फॅड सध्या बाजारात विक्रीसाठी सज्ज आहे. निसर्गाने प्रत्येकाच्या अन्नाची सोय त्यांच्या अधिवासात केली आहे. मानवाने त्यांना आयतं अन्न उपलब्ध करून दिल्याने त्याचा विपरीत परिणाम पहायला मिळू लागला आहे.

चौकट :

मंदिरांमध्ये वानरांकडून संरक्षणाची येतेय वेळ!

आपल्याकडील अनेक देवस्थाने डोंगरात आहेत. येथे मोठ्या प्रमाणावर वानरांचे वास्तव्य असते. प्रारंभी माणसांची चाहूल लागली की दूर पळणारी वानरं आता माणसांच्या हातातील पिशवी बघून त्यांच्या पाठीमागे लागत आहेत. अन्न मिळविण्याच्या उद्देशाने वानरांनी मानवाला जखमी केल्याचे प्रकारही घडले आहेत. जंगलात मिळणाऱ्या खाद्यावर जगणारे वानर आता मानवासारखं आइस्क्रीम, वेफर्स, गोळा आदी पदार्थ खाऊ लागले आहेत.

कोट :

नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या वन्यजीवांच्या खाण्याची सोय निसर्गाने केली आहे. त्यामुळे मानवाने त्यांना खायला घालण्याची आवश्यकता नाही. हे प्रकार केल्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्षाला आमंत्रण मिळते. अन्न शोधण्याच्या नैसर्गिक सवयींही पुढच्या पिढ्यांमध्ये लुप्त होत आहेत.

- सुनील भोईटे, पर्यावरण तज्ज्ञ, सातारा

चौकट :

वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२मध्ये कलम ९ अंतर्गत वन्यप्राण्यांना खायला घालणं म्हणजे शिकारीच्या उद्देशाने त्यांना आमिष दाखवणं असं गृहीत धरलं गेलं आहे. हे शिकारी इतकंच गंभीर असल्याने मोर आणि गवा यांना खाद्य देणाऱ्यांना ३ ते ७ वर्षांपर्यंतची तर वानराला खाऊ घालणाऱ्यांना तीन वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

- सचिन डोंबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भरारी पथक, सातारा

अन्न शोधण्याची नैसर्गिक सवयही हद्दपार!

अन्नसाखळीत जिवाबरोबरच त्याचा अधिवास आणि त्यातही त्याच्या खाण्याची व्यवस्था निसर्गाने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी जो वन्यजीव आढळतो त्याच्या खाद्याची उपलब्धता तिथेच केलेली असते. वाढता मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात आले. याचे पापक्षालन म्हणून मुक्या प्राण्यांना खाऊ घालण्याचं फॅड वाढलं. परिणामी नैसर्गिक पद्धतीने अन्न शोधण्याची वन्यजीवांची सवय लुप्त होऊ लागली आहे. हे त्यांच्या अखंड प्रजातीसाठी आणि पर्यायाने निसर्ग साखळीला धोक्याचं आहे.