शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपूल खुजा... वाहतुकीची दुर्दशा

By admin | Updated: December 17, 2015 22:55 IST

खोळंबा नित्याचाच : महामार्गाखाली अडकतात वाहने

खंडाळा : दळवणवळणाच्या सोयींसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम हाती घेतले असले तरी या महामार्गाच्या घडणीतच असलेल्या त्रुटींमुळे महामार्ग अडचणींचा ठरत आहे. या मार्गाच्या रुंदीकरणापूर्वी त्यातील समस्यांवर मार्ग काढावा अशीच माफक अपेक्षा नागरिकांची आहे. पुणे ते सातारा राष्ट्रीय महामार्गावर पारगाव-खंडाळा या ठिकाणी सध्या असणारा उड्डाणपूल हा अरुंद आणि कमी उंचीचा असल्याने वाहतुकीला अडचण ठरत आहे. केवळ तात्पुरता विचार करून खंडाळ्याचा हा उड्डाणपूलच वाहतुकीची खरी डोकेदुखी बनली आहे.खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या असवली, अजनूज, वाण्याचीवाडी, पवारवाडी, अंबारवाडी, कण्हेरी, जवळे, कवठे, अतिट, लोहोम यांसह चौदा गावांना खंडाळ्यातील या महामार्गावरील उड्डाणपुलाखालून जावे लागते. वास्तविक हा पूल अतिशय कमी उंचीचा आहे. त्याखालून मोठे कंटेनर, उसाच्या ट्रॉली, ट्रक जाऊ शकत नाहीत. तर पुलाखालून जाणारा रस्ता अरुंद असल्याने एसटी बस, ट्रक यांना वळणही घेता येत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. सध्या ऊसतोडणीची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे उसाच्या गाड्यांची वाहतूक सातत्याने सुरू असते. त्याला या पुलाखाली मोठी अडचण होते.खंडाळा तालुक्यात वाढत्या औद्योगिकीकरणाचे सध्या चार टप्पे विकसित होत आहेत. शासनाच्या आराखड्याप्रमाणे तालुक्यात लहान मोठ्या सहाशे कंपन्यांचे जाळे पसरणार आहे. या कंपन्यांचे दररोज शेकडो ट्रक कंटेनर यांची ये-जा राहाणार आहे. मात्र, त्यासाठी मोठा पूल अस्तित्वात नाही. आजही कारखान्यांमध्ये येणारी अनेक कंटेनर, वाहने या पुलाखाली बसत नाहीत. मग भविष्यात या वाहतुकीला पर्याय काय? असा गहण प्रश्न उभा आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी हायवे प्रशासनाने कोणती दुरदृष्टी ठेवून उड्डाणपुलाची निर्मिती केली. यासाठी खर्च झालेले कोट्यावधी रुपये जनतेच्या माथी मारले जात आहेत. मात्र लोकांना गरजेपुरत्या सुविधाही पुरविल्या जात नाहीत. ही खरी शोकांतिका आहे.खंडाळ्यात नव्याने साखर कारखाना उभारणी अंतिम टप्यात आहे. कारखाना सुरू झाल्यावर रोज शेकडो ऊस वाहतूक गाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे खंडाळा-पारगाव येथे नव्याने २५ बाय ४५ बाय २५ बाय मीटर लांबीचा व ५.५ मीटर रुंदीचा मोठा उड्डाणपूल बांधावा ही नागरिकांची मागणी रास्त आहे. त्यासाठी जमिनीचा भूसंपादनात कोणाचीही अडचणीची भूमिका नाही. लोकांनी भूसंपादनाला विरोध केला नव्हता. मात्र, महामार्गावर चांगला सर्वसुविधांयुक्त उड्डाणपूल व्हायला हवा याकडे प्रशासनाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. नव्या औद्योगिकीकरणाने कंपन्यांची रेलचेल होणार आहे. त्यांच्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी दळणवळण सुरळीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी महामार्गावर मोठा उड्डाणपूल असणे गरजेचे आहे. महामार्ग प्रशासनाने भविष्याचा विचार करून तातडीने उड्डाणपुलाला मंजुरी द्यावी.-शैलेश गाढवे, अध्यक्ष औद्योगिक सेल खंडाळा तालुका