शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
6
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
7
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
8
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
10
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
11
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
12
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
14
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
15
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
16
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
17
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
18
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
19
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

उड्डाणपूल खुजा... वाहतुकीची दुर्दशा

By admin | Updated: December 17, 2015 22:55 IST

खोळंबा नित्याचाच : महामार्गाखाली अडकतात वाहने

खंडाळा : दळवणवळणाच्या सोयींसाठी राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम हाती घेतले असले तरी या महामार्गाच्या घडणीतच असलेल्या त्रुटींमुळे महामार्ग अडचणींचा ठरत आहे. या मार्गाच्या रुंदीकरणापूर्वी त्यातील समस्यांवर मार्ग काढावा अशीच माफक अपेक्षा नागरिकांची आहे. पुणे ते सातारा राष्ट्रीय महामार्गावर पारगाव-खंडाळा या ठिकाणी सध्या असणारा उड्डाणपूल हा अरुंद आणि कमी उंचीचा असल्याने वाहतुकीला अडचण ठरत आहे. केवळ तात्पुरता विचार करून खंडाळ्याचा हा उड्डाणपूलच वाहतुकीची खरी डोकेदुखी बनली आहे.खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या असवली, अजनूज, वाण्याचीवाडी, पवारवाडी, अंबारवाडी, कण्हेरी, जवळे, कवठे, अतिट, लोहोम यांसह चौदा गावांना खंडाळ्यातील या महामार्गावरील उड्डाणपुलाखालून जावे लागते. वास्तविक हा पूल अतिशय कमी उंचीचा आहे. त्याखालून मोठे कंटेनर, उसाच्या ट्रॉली, ट्रक जाऊ शकत नाहीत. तर पुलाखालून जाणारा रस्ता अरुंद असल्याने एसटी बस, ट्रक यांना वळणही घेता येत नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असते. सध्या ऊसतोडणीची कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे उसाच्या गाड्यांची वाहतूक सातत्याने सुरू असते. त्याला या पुलाखाली मोठी अडचण होते.खंडाळा तालुक्यात वाढत्या औद्योगिकीकरणाचे सध्या चार टप्पे विकसित होत आहेत. शासनाच्या आराखड्याप्रमाणे तालुक्यात लहान मोठ्या सहाशे कंपन्यांचे जाळे पसरणार आहे. या कंपन्यांचे दररोज शेकडो ट्रक कंटेनर यांची ये-जा राहाणार आहे. मात्र, त्यासाठी मोठा पूल अस्तित्वात नाही. आजही कारखान्यांमध्ये येणारी अनेक कंटेनर, वाहने या पुलाखाली बसत नाहीत. मग भविष्यात या वाहतुकीला पर्याय काय? असा गहण प्रश्न उभा आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणावेळी हायवे प्रशासनाने कोणती दुरदृष्टी ठेवून उड्डाणपुलाची निर्मिती केली. यासाठी खर्च झालेले कोट्यावधी रुपये जनतेच्या माथी मारले जात आहेत. मात्र लोकांना गरजेपुरत्या सुविधाही पुरविल्या जात नाहीत. ही खरी शोकांतिका आहे.खंडाळ्यात नव्याने साखर कारखाना उभारणी अंतिम टप्यात आहे. कारखाना सुरू झाल्यावर रोज शेकडो ऊस वाहतूक गाड्यांचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे खंडाळा-पारगाव येथे नव्याने २५ बाय ४५ बाय २५ बाय मीटर लांबीचा व ५.५ मीटर रुंदीचा मोठा उड्डाणपूल बांधावा ही नागरिकांची मागणी रास्त आहे. त्यासाठी जमिनीचा भूसंपादनात कोणाचीही अडचणीची भूमिका नाही. लोकांनी भूसंपादनाला विरोध केला नव्हता. मात्र, महामार्गावर चांगला सर्वसुविधांयुक्त उड्डाणपूल व्हायला हवा याकडे प्रशासनाने लक्ष पुरविणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. नव्या औद्योगिकीकरणाने कंपन्यांची रेलचेल होणार आहे. त्यांच्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी दळणवळण सुरळीत होणे गरजेचे आहे. त्यासाठी महामार्गावर मोठा उड्डाणपूल असणे गरजेचे आहे. महामार्ग प्रशासनाने भविष्याचा विचार करून तातडीने उड्डाणपुलाला मंजुरी द्यावी.-शैलेश गाढवे, अध्यक्ष औद्योगिक सेल खंडाळा तालुका