शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

साखरवाडीतील माळरानावर फुलवली फुलशेती!

By admin | Updated: April 2, 2017 16:21 IST

कष्टाचे चिज : ग्रामस्थांच्या श्रमदानातील खड्ड्यात डोलताहेत फुले

आॅनलाईन लोकमतउंब्रज (सातारा), दि. २ : उन्हाच्या झळा सर्वांना जाणवू लागल्या आहेत. ह्यझाडे लावा, झाडे जगवाह्णची साद घातली जात आहे. असे असतानाच कऱ्हाड तालुक्यातील साखरवाडीतील ग्रामस्थांनी सर्वांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे. ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थानच्या एक एकर जमिनीवर शंभरहून अधिक वेगवेगळी झाडे, फुलझाडे लावून जगवली आहेत. साखरवाडी हे कऱ्हाड तालुक्यातील शेवटच्या टोकावरील अवघ्या चारशे लोकसंख्येचे गाव. त्यातील निम्मे लोक उपजीविकेसाठी बाहेर गावी असतात. वनविभागाच्या जाचक अटींमुळे दळणवळणाच्या सुखसोयीपासून लांब राहिलेले हे गाव. पण कायम विधायक कामाच्या पाठीमागे सर्व ताकदीसह एकसंघ राहणारे गाव. ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थानच्या जमिनीत हिरवाई फुलवावी, अशी कल्पना माजी सरपंच शंकर पवार यांना सुचली. त्यांनी ती ग्रामस्थांपुढे मांढली. युवक युवतीसह सर्वांनी साध देण्याचा निर्धार केला. अन् उजाड माळरान हिरवेगार करण्याच्या मोहिमेचा श्रीगणेश केला.साखरवाडीतील सत्तर युवक, तीस युवती, विद्यार्थी, पुरुष, महिला सर्वजण जुलै महिन्यात एकत्र आले. गावासह मुंबई, परगावी असलेल्या ग्रामस्थांनी वर्गणी दिली. ही वर्गणी ४० हजारच्या आसपास जमली. सुरुवात खड्डे काढण्यापासून झाली. खड्डे झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर येथून पिंपळ, वड, आंबा, चिंच, चिकू, लिंब, चंदन, बेल, सीताफळ, फायकस, बोगनवेल, आकाशी, चाफा, बकुळा या फुलझाडाची रोपे आणली. गावकऱ्यांनी एकत्र येऊन ही रोपे खड्यांमध्ये लावली. त्यानंतर सुरुवात झाडे जगवण्याची धडपड सुरु झाली. पाण्याच्या टाकीपासून सर्व क्षेत्रात ठिबक करण्यात आले. चोरे, साखरवाडी राष्ट्रीय पेयजल योजनेचे पाणी या गावाला आले. पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक अडचण आली की पाणी-पाणी करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत. असे प्रकार कायम घडत असतात.यावेळी झरा शोधून पाणी आणावे लागते. पण लहान मुलांसारखी सर्व झाडांची ग्रामस्थ घेत आहेत. झऱ्याचे पाणी प्रथम झाडांना नंतर घरी. अशा प्रकारे ही झाडे जगवण्यात येत आहेत. सद्या कडक उन्हामुळे भयानक परिस्थिती असताना ही झाडे हिरवीगार आहेतच. पण फुलझाडे फुलांनी फुलली असल्यामुळे ग्रामस्थांच्या कष्टाचे चीज झालेल्याचा आनंद चेऱ्यावर दिसतो. ग्रामस्थ आनंदी असून यापुढेही असेच प्रयत्न सुरु ठेऊन हा पूर्ण ओसाड परिसर हिरवागार करणार या मानसिकतेत दिसून येत आहेत.ग्रामदैवत भैरवनाथाच्या दर्शनासाठी देवळात गेल्यावर परिसरातील देवस्थानची उजाड जमीन कायम डोळ्यात खुपत होती. हे माळ ग्रामस्थाच्या सहकायार्तून हिरवेगार करावे, असे डोक्यात आले. कल्पना मांडली. पाठींबा मिळाला. काम सुरू झाले. साखरवाडीतील युवक, युवती, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक सर्वजण मदत करू लागले. बाहेरगावी राहणाऱ्या ग्रामस्थांनीही आर्थिक मदत केली. प्रत्येक झाड जोपसले अन् जगवले. उन्हाच्या झळा सोसून झाडांना पाणी कमी पडू दिले नाही. वेळ प्रसंगी झऱ्यातून, जीपगाडीतून पाणी आणून झाडे जगविली. माळरानात उमललेली फुले पाहून सार्थ झाल्याचा आनंद मिळतो.- शंकर पवार,माजी सरपंच