शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

भूस्खलनाचा महापूर गावाला गेला चक्क खेटून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:35 IST

सातारा : गावकरी गाढ झोपेत असताना उशाला असलेला अख्खा डोंगर कोसळला अन् भूस्खलनाचा महापूर धडाडत खाली आला. पण गावावर ...

सातारा : गावकरी गाढ झोपेत असताना उशाला असलेला अख्खा डोंगर कोसळला अन् भूस्खलनाचा महापूर धडाडत खाली आला. पण गावावर न येता गावाला अगदी खेटून हा महापूर गावापासून दूरवर गेला. सकाळी झाेपेतून उठल्यानंतर हे विदारक दृश्य पाहून गावकऱ्यांच्या काळजाचा अक्षरश: ठोका चुकला. हा भूस्खलनाचा महापूर गावावर आला असता तर काय झाले असते, या विचारानेच गावकरी अक्षरश: हादरून गेलेत.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये भूस्खलनाच्या घटना यंदा सर्वाधिक घडल्यात. आंबेघर, मीरगाव, ढोकावळे या गावांना भूस्खलनाचा जबर फटका बसलाय. आंबेघरमध्ये १५ जणांचा जीव गेलाय. या घटनांनी समाजमन पुरते हबकून गेले असतानाच पाटण तालुक्यातच आणखी एक मनाला हादरून सोडणारी घटना समोर आली आहे. डोंगराच्या पायथ्याला वसलेल्या व सत्तर घरांचा उंबरठा असलेल्या जुगाईवाडीतील ही घटना आहे. गावकरी गाढ झोपेत असताना पहाटे चारच्या सुमारास

जुगाईवाडीच्या अख्खा डोंगराचे भूस्खलन झाले. दगड, झाडे उन्मळून पडून भूस्खलनाचा महापूर आला. गावाला खेटून हा महापूर गावकऱ्यांची भातशेती उद्‌ध्वस्त करून गावापासून दूरवर निघून गेला. काही गावकरी सकाळी झोपतून उठल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. हे भीषण वास्तव पाहून गावकरी हबकून गेले. आंबेघरची परिस्थिती क्षणात त्यांच्या डोळ्यांसमोर तरळली. हा भूस्खलनाचा महापूर गावावर कोसळला असता तर होत्याचं नव्हतं झालं असतं. असं गावकरीबोलू लागले. या प्रकारानंतर गावकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. नोकरीनिमित्त मुंबई, पुण्याला असलेल्या आपल्या मुलांनाही या भीषण दुर्घटनेची कल्पना दिली. त्या काळरात्री गावावर ओढावलेलं संकट टळल्याने गावकरी आनंदित आहेत. पण काबाडकष्ट करून तयार केलेली भातशेती या भूस्खलनात गायब झाली. त्यामुळे गावकरी चिंताग्रस्तही आहेत.

चाैकट :

आता भविष्याची चिंता..

या दुर्दैवी घटनेने गावकऱ्यांची झोप उडाली आहे. डोंगर पुन्हा कोसळणार तर नाही ना, या विचाराने अनेकजण भयभीत झाले आहेत. प्रशासनाने या गावाचा नुकसानीचा पंचनामा केला आहे. आता भातशेतीची भरपाईसुद्धा मिळेल. पण गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावू लागला आहे. सर्वांना मृत्यूने एखदा हुलकावणी दिली आहे; पण भविष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे, या विचाराने गावकरी चिंताग्रस्त आहेत.

फोटो : ३१ पाटण फोटो