शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

मदतीच्या प्रतीक्षेत पाच हजार शेतकरी

By admin | Updated: March 24, 2015 00:18 IST

अवकाळी पाऊस : नुकसानबाधित शेतकऱ्यांची अवस्था बिकट

सातारा : अवकाळी पावासाने शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी पुरते हवालदिल झाले असताना सरकारकडून काही मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. पण अद्याप शासनाने एक छदामही न दिल्याने शेतकऱ्यांची पुरती कोंडी होऊन बसली आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यांप्रमाणेच सातारा जिल्हयातही अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. गतवर्षी मे महिन्यापासून शेतकरी उभ्या पिकाचे नुकसान होताना पाहतो आहे. जिल्ह्यातील अनेक भागात फळबागा केल्या जातात. पाण्याची कमतरता असतानाही शेतकरीवर्ग कमी पाण्यावर पिके आणतात. पण ऐन उत्पन्न मिळण्याच्या वेळेत अवकाळी पाऊस घात करत आहे. गतवर्षी मे, नोव्हेंबर व डिसेंबर तर यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पावसाने धुडगूस घातला. काही ठिकाणी गारांचा गच पडल्याने पिकांचे नुकसान झाले. द्राक्षबागा तर उन्मळून पडल्या. डाळिंब, आंब्यांचेही मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांनाही या पावसाचा तडाखा बसला. शेतकऱ्यांनी शेतात कापून टाकलेली पिकेही वाया गेली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा पाच हजारांच्यावर गेला आहे. तर हजारो हेक्टर जमीनीवरील पिकांचे झालेले नुकसान भविष्यात अन्न टंचाईचे कारण ठरणार आहे. जिल्हा प्रशासन पंचनाम्यांचे कागद तयार करुन शासन दरबारी पाठवित असले तरी शासन दया दाखवायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यातच ५0 टक्क्यांच्यावर नुकसान झाले तरच नुकसान भरपाई देण्याचा नियम असल्याने अनेक शेतकरी भरपाईचा दावाही करु शकले नाहीत. भांडवल गुंतवून पिके काढायची मात्र त्याला संरक्षणच मिळत नसेल तर काय गरज आहे प्रयोग करायची?, अशी प्रतिक्रिया आता शेतकरी व्यक्त करु लागले आहेत. उद्योगांच्या भरभराटीसाठी सरकार पॅकेज जाहीर करते, मग शेतीत नुकसान झाले तर शासनाला त्याचे काही देणे-घेणे नाही काय? असा सवालही विचारला जात आहे. (प्रतिनिधी)मदतीचे मिळतायत संकेतअवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई देण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे. मे २0१४ पासून शेतकरी गारपिटीतील नुकसानीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्राच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी विदर्भ मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. अवकाळी पाऊस वारंवार शेतातल्या पिकांचे नुकसान करतो. उभ्या पिकांसोबतच काढून ठेवलेल्या पिकांचेही मोठे नुकसान होते. मागील महिन्यात झालेल्या पावसामध्ये कापणी करुन ठेवलेल्या ज्वारी, गहू या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. पीक उचलण्याआधीच तो कोसळत असतो. मात्र शासन त्याची नुकसान भरपाई देत नाही, हा नियम बदलावा. - विश्वास बाबर, शेतकरी