शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मदतीच्या प्रतीक्षेत पाच हजार शेतकरी

By admin | Updated: March 24, 2015 00:18 IST

अवकाळी पाऊस : नुकसानबाधित शेतकऱ्यांची अवस्था बिकट

सातारा : अवकाळी पावासाने शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी पुरते हवालदिल झाले असताना सरकारकडून काही मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. पण अद्याप शासनाने एक छदामही न दिल्याने शेतकऱ्यांची पुरती कोंडी होऊन बसली आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यांप्रमाणेच सातारा जिल्हयातही अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. गतवर्षी मे महिन्यापासून शेतकरी उभ्या पिकाचे नुकसान होताना पाहतो आहे. जिल्ह्यातील अनेक भागात फळबागा केल्या जातात. पाण्याची कमतरता असतानाही शेतकरीवर्ग कमी पाण्यावर पिके आणतात. पण ऐन उत्पन्न मिळण्याच्या वेळेत अवकाळी पाऊस घात करत आहे. गतवर्षी मे, नोव्हेंबर व डिसेंबर तर यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पावसाने धुडगूस घातला. काही ठिकाणी गारांचा गच पडल्याने पिकांचे नुकसान झाले. द्राक्षबागा तर उन्मळून पडल्या. डाळिंब, आंब्यांचेही मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांनाही या पावसाचा तडाखा बसला. शेतकऱ्यांनी शेतात कापून टाकलेली पिकेही वाया गेली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा पाच हजारांच्यावर गेला आहे. तर हजारो हेक्टर जमीनीवरील पिकांचे झालेले नुकसान भविष्यात अन्न टंचाईचे कारण ठरणार आहे. जिल्हा प्रशासन पंचनाम्यांचे कागद तयार करुन शासन दरबारी पाठवित असले तरी शासन दया दाखवायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यातच ५0 टक्क्यांच्यावर नुकसान झाले तरच नुकसान भरपाई देण्याचा नियम असल्याने अनेक शेतकरी भरपाईचा दावाही करु शकले नाहीत. भांडवल गुंतवून पिके काढायची मात्र त्याला संरक्षणच मिळत नसेल तर काय गरज आहे प्रयोग करायची?, अशी प्रतिक्रिया आता शेतकरी व्यक्त करु लागले आहेत. उद्योगांच्या भरभराटीसाठी सरकार पॅकेज जाहीर करते, मग शेतीत नुकसान झाले तर शासनाला त्याचे काही देणे-घेणे नाही काय? असा सवालही विचारला जात आहे. (प्रतिनिधी)मदतीचे मिळतायत संकेतअवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई देण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे. मे २0१४ पासून शेतकरी गारपिटीतील नुकसानीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्राच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी विदर्भ मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. अवकाळी पाऊस वारंवार शेतातल्या पिकांचे नुकसान करतो. उभ्या पिकांसोबतच काढून ठेवलेल्या पिकांचेही मोठे नुकसान होते. मागील महिन्यात झालेल्या पावसामध्ये कापणी करुन ठेवलेल्या ज्वारी, गहू या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. पीक उचलण्याआधीच तो कोसळत असतो. मात्र शासन त्याची नुकसान भरपाई देत नाही, हा नियम बदलावा. - विश्वास बाबर, शेतकरी