शहरं
Join us  
Trending Stories
1
"नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
2
"भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
3
“नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
4
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
5
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
6
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
7
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
8
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
9
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
10
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
11
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
12
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
13
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
14
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
15
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
16
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
17
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
19
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
20
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...

मदतीच्या प्रतीक्षेत पाच हजार शेतकरी

By admin | Updated: March 24, 2015 00:18 IST

अवकाळी पाऊस : नुकसानबाधित शेतकऱ्यांची अवस्था बिकट

सातारा : अवकाळी पावासाने शेतातील उभ्या पिकांचे प्रचंड मोठे नुकसान करुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकरी पुरते हवालदिल झाले असताना सरकारकडून काही मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. पण अद्याप शासनाने एक छदामही न दिल्याने शेतकऱ्यांची पुरती कोंडी होऊन बसली आहे. राज्यातील इतर काही जिल्ह्यांप्रमाणेच सातारा जिल्हयातही अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. गतवर्षी मे महिन्यापासून शेतकरी उभ्या पिकाचे नुकसान होताना पाहतो आहे. जिल्ह्यातील अनेक भागात फळबागा केल्या जातात. पाण्याची कमतरता असतानाही शेतकरीवर्ग कमी पाण्यावर पिके आणतात. पण ऐन उत्पन्न मिळण्याच्या वेळेत अवकाळी पाऊस घात करत आहे. गतवर्षी मे, नोव्हेंबर व डिसेंबर तर यंदा फेब्रुवारी, मार्च महिन्यात अवकाळी पावसाने धुडगूस घातला. काही ठिकाणी गारांचा गच पडल्याने पिकांचे नुकसान झाले. द्राक्षबागा तर उन्मळून पडल्या. डाळिंब, आंब्यांचेही मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा या हंगामी पिकांनाही या पावसाचा तडाखा बसला. शेतकऱ्यांनी शेतात कापून टाकलेली पिकेही वाया गेली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा पाच हजारांच्यावर गेला आहे. तर हजारो हेक्टर जमीनीवरील पिकांचे झालेले नुकसान भविष्यात अन्न टंचाईचे कारण ठरणार आहे. जिल्हा प्रशासन पंचनाम्यांचे कागद तयार करुन शासन दरबारी पाठवित असले तरी शासन दया दाखवायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यातच ५0 टक्क्यांच्यावर नुकसान झाले तरच नुकसान भरपाई देण्याचा नियम असल्याने अनेक शेतकरी भरपाईचा दावाही करु शकले नाहीत. भांडवल गुंतवून पिके काढायची मात्र त्याला संरक्षणच मिळत नसेल तर काय गरज आहे प्रयोग करायची?, अशी प्रतिक्रिया आता शेतकरी व्यक्त करु लागले आहेत. उद्योगांच्या भरभराटीसाठी सरकार पॅकेज जाहीर करते, मग शेतीत नुकसान झाले तर शासनाला त्याचे काही देणे-घेणे नाही काय? असा सवालही विचारला जात आहे. (प्रतिनिधी)मदतीचे मिळतायत संकेतअवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये भरपाई देण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे. मे २0१४ पासून शेतकरी गारपिटीतील नुकसानीच्या प्रतीक्षेत आहेत. केंद्राच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी विदर्भ मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट दिल्यानंतर भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. अवकाळी पाऊस वारंवार शेतातल्या पिकांचे नुकसान करतो. उभ्या पिकांसोबतच काढून ठेवलेल्या पिकांचेही मोठे नुकसान होते. मागील महिन्यात झालेल्या पावसामध्ये कापणी करुन ठेवलेल्या ज्वारी, गहू या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. पीक उचलण्याआधीच तो कोसळत असतो. मात्र शासन त्याची नुकसान भरपाई देत नाही, हा नियम बदलावा. - विश्वास बाबर, शेतकरी