शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

साठ गावांसाठी पाच पोलीस पाटील!

By admin | Updated: September 6, 2015 20:37 IST

ढेबेवाडी विभागातील स्थिती : रहिवासी दाखला मिळविण्यासाठी युवकांची धडपड

ढेबेवाडी : साठ गावे, दोनशे वाड्या वस्त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या ढेबेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत एक लाखांवर लोकसंख्येसाठी केवळ पाच पोलीस पाटील कार्यरत आहेत. पोलीस पाटलांची सुमारे पन्नास पदे रिक्त असल्याने शासकीय कामी आवश्यक असणारा पोलीस पाटलांचा रहिवासी दाखला सामान्यांना मिळत नाही. परिणामी, नोकर भरतीत इच्छुकांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, कागदपत्रांतील पोलीस पाटलांच्या रहिवासी दाखल्याची अट रद्द करा, अथवा पर्यायी व्यवस्था करा, अशी मागणी होत आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात काळगाव आणि मंद्रुळकोळे असे दोन जिल्हा परिषद गट आहेत. धरणग्रस्त, पूरग्रस्त, दुष्काळग्रस्त आणि आपत्तीग्रस्त अशा नैसर्गिक संकटांनी गुरफटलेल्या येथील जनतेला नेहमीच विविध अडचणींचा सामना करावा लागतो. धरणग्रस्त, डोंगरी आणि भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना आता शासकीय नोकरीतही शासनाने आरक्षण जाहीर केल्याने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच इच्छुक नोकरीसाठी धावाधाव करतानाचे चित्र आहे. शासकीय नोकरीसाठी संबंधितांच्या शैक्षणिक पात्रतेसह सरपंच, गावकामगार तलाठी, पोलीस पाटील आदींचे रहिवासी दाखले आवश्यक केले आहेत. ढेबेवाडी विभागातील इच्छुकांना सरपंच, तलाठी यांचे दाखले उपलब्ध होत आहेत. मात्र गावे साठ आणि पोलीस पाटील पाच अशी अवस्था असल्याने पोलीस पाटलांचा रहिवासी दाखला मिळविताना मोठी कसरत होऊ लागली आहे. दरम्यान, पोलिसांचा खबऱ्या म्हणून ओळख असलेला गावोगावचा पोलीस पाटीलच पोलिसांपासून दुरावल्याने पोलिसांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या काढणे गावापासून वाल्मिकी पठारावरील कसणी-धनगरवाड्यापर्यंत सुमारे चाळीस किलोमीटर अंतरात एकही पोलीस पाटील कार्यरत नाही. परिणामी, पोलिसांचा या गावांशी संपर्कच तुटल्याने पोलिसांचीही मोठी दमछाक होत आहे. मुळातच लोकसंख्येच्या प्रमाणात अत्यल्प पोलीस कर्मचारी आणि त्यातच पोलीस पाटलांची सुमारे ५० पदे रिक्त असल्याने गावोगावी संपर्क साधताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर) वरिष्ठांकडे पाठपुरावा...याबाबत पाटण प्रांत कार्यालयाशी संपर्क साधला असता, या वस्तुस्थितीचे समर्थन केले. तसेच पोलीस पाटलांच्या रिक्त पदाबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा चालू असून, लवकरच या पदांचा जाहीरनामा प्रसिद्ध करून कार्यवाहीची प्रक्रिया पूर्ण होईल, असेही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. .कुणीतरी दाखले द्यावे ! या विभागात आता तरुणांमध्ये पोलीस आणि सैन्यदलाचे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अ‍ॅकॅडमीचीही साथ त्यांना मिळाल्याने तरुणांची पावले पोलीस-सैन्यदलाकडे वळू लागली आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची गोळाबेरीज करताना दमछाक होऊ लागली असतानाच पोलीस पाटलांचा रहिवासी दाखला मिळत नसल्याने तरुणांमध्ये नाराजी पसरली आहे.