शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

राज्यात पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंप !

By admin | Updated: January 10, 2016 00:53 IST

चंद्रकांतदादा : म्हसवडमध्ये बंधाऱ्याचे लोकार्पण

म्हसवड : ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून राज्यातील तीस हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा संकल्प आहे. राज्यात विजेचा तुटवडा असून, पाणी असूनही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंपाचे वाटप करण्यात येईल,’ अशी घोषणा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशनतर्फे ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत नूतन बंधाऱ्याचे भूमिपूजन व पुळकोटी येथील गलांडे वस्तीवरील बंधाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष विजय धट, फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सीमा जगताप, मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील, जयेश मोदी, रेखा कुलकर्णी, जवाहर देशमाने उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांना आधुनिक बी-बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कमी पाण्यावर शेती करण्यासाठी मागेल त्याला ठिबक सिंचन, गावोगावी शेतीमाल प्रक्रिया केंद्र, गोदाम, शीतगृह तसेच पणनच्या माध्यमातून शेतीमालाला दर मिळवून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणदेशी फाउंडेशनचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.’ आमदार गोरे म्हणाले, ‘सध्याच्या शासनाने जलयुक्त शिवारच्या नावाखाली कामे सुरू केली आहेत. याची सुरुवात माणच्या मातीतून झाली, याचा अभिमान आहे. माणच्या मातीत रुजलेली संकल्पना सरकारने दुष्काळ निवारणाच्या कार्यात स्वीकारली याचा आनंद वाटतो.’ चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘२०१२ चा भीषण दुष्काळ आपणाला खूपकाही शिकवून गेला. येथील शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ नये. म्हणून पावसाचा थेंबन्थेंब अडवण्याचे ठरविले. त्यासाठी म्हसवड परिसरातील सतरा नाला बंधाऱ्यांतील गाळ काढला. सहा ठिकाणी पाणी साठवण सिमेंट बंधारे बांधले. यामध्ये सुमारे सात ते दहा कोटी लिटर पाणीसाठा झाला.’ यावेळी माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, नितीन दोशी, वसंत मासाळ, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब मासाळ, डॉ. राजेंद्र खाडे, बाळासाहेब मदने, दिलीप तुपे, किशोर सोनवणे, अप्पा पुकळे, ताराबाई साठे, प्रतिभा लोखंडे, रंजना रसाळ, मारुती वीरकर, बबन अब्दागिरे, सुरेश म्हेत्रे, रवींद्र वीरकर, सूरज ढोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)