शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

राज्यात पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंप !

By admin | Updated: January 10, 2016 00:53 IST

चंद्रकांतदादा : म्हसवडमध्ये बंधाऱ्याचे लोकार्पण

म्हसवड : ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून राज्यातील तीस हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा संकल्प आहे. राज्यात विजेचा तुटवडा असून, पाणी असूनही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंपाचे वाटप करण्यात येईल,’ अशी घोषणा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशनतर्फे ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत नूतन बंधाऱ्याचे भूमिपूजन व पुळकोटी येथील गलांडे वस्तीवरील बंधाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष विजय धट, फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सीमा जगताप, मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील, जयेश मोदी, रेखा कुलकर्णी, जवाहर देशमाने उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांना आधुनिक बी-बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कमी पाण्यावर शेती करण्यासाठी मागेल त्याला ठिबक सिंचन, गावोगावी शेतीमाल प्रक्रिया केंद्र, गोदाम, शीतगृह तसेच पणनच्या माध्यमातून शेतीमालाला दर मिळवून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणदेशी फाउंडेशनचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.’ आमदार गोरे म्हणाले, ‘सध्याच्या शासनाने जलयुक्त शिवारच्या नावाखाली कामे सुरू केली आहेत. याची सुरुवात माणच्या मातीतून झाली, याचा अभिमान आहे. माणच्या मातीत रुजलेली संकल्पना सरकारने दुष्काळ निवारणाच्या कार्यात स्वीकारली याचा आनंद वाटतो.’ चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘२०१२ चा भीषण दुष्काळ आपणाला खूपकाही शिकवून गेला. येथील शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ नये. म्हणून पावसाचा थेंबन्थेंब अडवण्याचे ठरविले. त्यासाठी म्हसवड परिसरातील सतरा नाला बंधाऱ्यांतील गाळ काढला. सहा ठिकाणी पाणी साठवण सिमेंट बंधारे बांधले. यामध्ये सुमारे सात ते दहा कोटी लिटर पाणीसाठा झाला.’ यावेळी माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, नितीन दोशी, वसंत मासाळ, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब मासाळ, डॉ. राजेंद्र खाडे, बाळासाहेब मदने, दिलीप तुपे, किशोर सोनवणे, अप्पा पुकळे, ताराबाई साठे, प्रतिभा लोखंडे, रंजना रसाळ, मारुती वीरकर, बबन अब्दागिरे, सुरेश म्हेत्रे, रवींद्र वीरकर, सूरज ढोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)