शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंप !

By admin | Updated: January 10, 2016 00:53 IST

चंद्रकांतदादा : म्हसवडमध्ये बंधाऱ्याचे लोकार्पण

म्हसवड : ‘जलयुक्त शिवार’च्या माध्यमातून राज्यातील तीस हजार गावे टंचाईमुक्त करण्याचा संकल्प आहे. राज्यात विजेचा तुटवडा असून, पाणी असूनही शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील सुमारे पाच लाख शेतकऱ्यांना सौरपंपाचे वाटप करण्यात येईल,’ अशी घोषणा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. म्हसवड येथे माणदेशी फाउंडेशनतर्फे ‘जलयुक्त शिवार’अंतर्गत नूतन बंधाऱ्याचे भूमिपूजन व पुळकोटी येथील गलांडे वस्तीवरील बंधाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष विजय धट, फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, जिल्हा उपनिबंधक डॉ. महेश कदम, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, गटविकास अधिकारी सीमा जगताप, मुख्याधिकारी पल्लवी भोरे-पाटील, जयेश मोदी, रेखा कुलकर्णी, जवाहर देशमाने उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले, ‘शेतकऱ्यांना आधुनिक बी-बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कमी पाण्यावर शेती करण्यासाठी मागेल त्याला ठिबक सिंचन, गावोगावी शेतीमाल प्रक्रिया केंद्र, गोदाम, शीतगृह तसेच पणनच्या माध्यमातून शेतीमालाला दर मिळवून दिला जाणार आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणदेशी फाउंडेशनचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.’ आमदार गोरे म्हणाले, ‘सध्याच्या शासनाने जलयुक्त शिवारच्या नावाखाली कामे सुरू केली आहेत. याची सुरुवात माणच्या मातीतून झाली, याचा अभिमान आहे. माणच्या मातीत रुजलेली संकल्पना सरकारने दुष्काळ निवारणाच्या कार्यात स्वीकारली याचा आनंद वाटतो.’ चेतना सिन्हा म्हणाल्या, ‘२०१२ चा भीषण दुष्काळ आपणाला खूपकाही शिकवून गेला. येथील शेतकऱ्यांवर अशी वेळ येऊ नये. म्हणून पावसाचा थेंबन्थेंब अडवण्याचे ठरविले. त्यासाठी म्हसवड परिसरातील सतरा नाला बंधाऱ्यांतील गाळ काढला. सहा ठिकाणी पाणी साठवण सिमेंट बंधारे बांधले. यामध्ये सुमारे सात ते दहा कोटी लिटर पाणीसाठा झाला.’ यावेळी माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, नितीन दोशी, वसंत मासाळ, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब मासाळ, डॉ. राजेंद्र खाडे, बाळासाहेब मदने, दिलीप तुपे, किशोर सोनवणे, अप्पा पुकळे, ताराबाई साठे, प्रतिभा लोखंडे, रंजना रसाळ, मारुती वीरकर, बबन अब्दागिरे, सुरेश म्हेत्रे, रवींद्र वीरकर, सूरज ढोले उपस्थित होते. (प्रतिनिधी)