शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

पिंपरीच्या पाच सदस्यांनाही दणका

By admin | Updated: September 11, 2015 23:44 IST

निवडणूक खर्च न दिल्याने केले अपात्र : अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला कोरेगाव तालुक्यातील दुसरा निकाल

सातारा : कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निकाल ताजा असतानाच अपर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी गुरुवारी याच तालुक्यातील पिंपरी ग्रामपंचायतीच्या पाच सदस्यांना अपात्र ठरविण्याचा दुसरा निकाल दिला आहे. निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळली आहे.नारायण गोपाळा पवार, बळवंत उत्तम पवार, विमल विष्णू पवार, लता नितीन पवार, उषा संजय सोनावले (सर्व रा. पिंपरी, ता. कोरेगाव) अशी अपात्र ठरविलेल्या निवडणूक सदस्यांची नावे आहेत. याप्रकरणी विष्णुदास माधवराव कणसे यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे याचिका सादर केली होती. या प्रकरणाची वेगवेगळ्या तारखांना सुनावणीही झाली. दोन्ही बाजूंचे लेखी म्हणणे घेण्यात आले. याचिकाकर्ते विष्णुदास कणसे यांच्या म्हणण्यानुसार पिंपरी ग्रामपंचायतीची निवडणूक २४ मार्च २०१४ रोजी झाली होती. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ ख (१) अन्वये निवडणुकीनंतर ३० दिवसांच्या आत सदस्यांनी निवडणूक खर्च देणे बंधनकारक असताना, तो दिला नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात यावे.सुनावणीदरम्यान अपात्र ठरलेल्या पाच सदस्यांनी आपण निवडणूक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी सपाटे यांच्याकडे निवडणूक खर्चाचा तपशील सादर केल्याचे लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले. याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचीही साक्ष घेण्यात आली होती. या पाचही सदस्यांनी खर्चाची विवरणपत्रे वेळेत सादर केल्याचे त्यांच्या साक्षीत म्हटले होते; परंतु या विवरणपत्रावर निवडणूक निर्णय अधिकारी यांची दाखल तारीख नाही तसेच अपात्र सदस्यांपैकी कुणीही त्याची पोहोचही सुनावणीदरम्यान सादर केली नाही. त्यामुळे संबंधितांनी विहित वेळेत निवडणूक खर्च दिला नसल्याच्या निष्कर्षाप्रत आल्यानंतर अपर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी पाच सदस्यांना अपात्र ठरविण्याचा निकाल दिला आहे. तसेच या सदस्यांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढता येणार नाही, असे या दिलेल्या आदेशात म्हटले आहे. याचिकाकर्ते विष्णुदास कणसे यांच्या वतीने अ‍ॅड. पुरुषोत्तम बारसावडे, अ‍ॅड. अधिराज माने, अ‍ॅड. अभिजित माने, अ‍ॅड. भय्यासाहेब जगदाळे, अ‍ॅड. सतीश कदम, अ‍ॅड. उमेश निकम यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी) तक्रारीनंतरच कारवाईविरोधकांनी तक्रार अर्ज दाखल केल्यानंतर मगच संबंधित उमेदवारांवर कारवाई होते. ज्याच्याविरोधात तक्रार होत नाही, तो तक्रार होईपर्यंत ‘सेफ’ असतो. जिल्ह्यातील ७११ ग्रामपंचायतींची निवडणूक ४ आॅगस्टला पार पडली. त्यानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक लढलेल्या विजेत्या व पराभूत अशा सर्व उमेदवारांनी निवडणुकीच्या खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे. प्रशासनाच्या पातळीवर मात्र हा खर्च मिळविण्यासाठी जोरदार धावाधाव सुरू आहे. खर्च मिळविण्यासाठी धावाधावग्रामपंचायत निवडणुकीला महिना उलटून गेला असला तरी निवडणूक लढलेल्या बहुतांश उमेदवारांनी आपला निवडणूक खर्च दिला नसल्याने तो मागविण्याची धावाधाव तालुका पातळीवर सुरू आहे.कोरेगाव तालुक्यातील जांब खुर्द या ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांनी निवडणूक खर्च दिला नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्याचा निकाल अपर जिल्हाधिकाऱ्यांनी नुकताच दिला आहे, या पार्श्वभूमीवर महिन्यानंतर अनेक ग्रामपंचायतींचे सदस्य जागे झाल्याचे समोर येत आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागात अद्यापही निवडणूक झालेल्या ७११ ग्रामपंचायतींपैकी सर्वच ग्रामपंचायतींचा निवडणूक खर्च प्राप्त झालेला नाही. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार निवडणूक झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे खर्चाचा तपशील द्यावा लागतो; मात्र खर्चाचा तपशील वेळेत सादर करण्याबाबत अद्यापही पुरेशी जागृती निर्माण झाली नसल्याचेच समोर येत आहे.