शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

दहा गुंठ्यांत तब्बल पाच लाखांचं आलं शेतामध्येच चर्चासत्र : अंगापूरच्या संजय महाराज यांचा अनोखा प्रयोग

By admin | Updated: May 10, 2014 23:40 IST

सातारा : लहरी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात असल्याची ओरड होत असतानाच अंगापूर वंदन येथील शेतकरी संजय महाराज यांनी अनोखा प्रयोग

सातारा : लहरी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात असल्याची ओरड होत असतानाच अंगापूर वंदन येथील शेतकरी संजय महाराज यांनी अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी ठिंबक सिंचनच्या साह्याने अवघ्या दहा गुंठ्यांत तब्बल पाच लाखांचे आले पिकाचे उत्पादन घेतले आहे. अंगापूर वंदन येथील तरुण शेतकर्‍याने घेतलेल्या अनोख्या उपक्रमाबद्दल जिल्ह्यात चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या शेतात नुकताच शेतकरी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात आले पीक यासंदर्भात चर्चासत्र घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कणसे म्हणाले, ‘तरुण शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे गरजेचे आहे. माती परीक्षण, खते व औषधांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन व योग्यवेळी पाणी व तणाची काळजी घेतल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो.’ संजय महाराज म्हणाले, ‘मी तीनशे किलोच्या आल्याच्या बियाण्याचे दहा गुंठे क्षेत्रात तुषार सिंचनपद्धतीने पाणी दिले. त्यासाठी मशागत, शेणखत, रासायनिक खत व औषधांचा योग्यवेळी वापर केल्याने दहा गुंठे क्षेत्रात १४ गाड्या म्हणजेच सात हजार किलो आले पिकाचे उत्पादन घेतले. यातून सुमारे पाच लाखांचे उत्पन्न मिळाले.’ यावेळी शिवाजीराव कणसे, सरपंच अण्णा शेळके, शेखर कणसे, अध्यक्ष बापूराव कणसे, जितेंद्र कणसे, बाळू पहिलवान, मंगेश कणसे, प्रमोद पहिलवान, विजय मिस्त्री, प्रदीप पाटील, अप्पा कणसे, राजू कणसे, भानुदास पहिलवान आदी उपस्थित होते. सुभाष जाधव, यांनी सूत्रसंचालन केले. बी. एस. कणसे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)