शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दहा गुंठ्यांत तब्बल पाच लाखांचं आलं शेतामध्येच चर्चासत्र : अंगापूरच्या संजय महाराज यांचा अनोखा प्रयोग

By admin | Updated: May 10, 2014 23:40 IST

सातारा : लहरी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात असल्याची ओरड होत असतानाच अंगापूर वंदन येथील शेतकरी संजय महाराज यांनी अनोखा प्रयोग

सातारा : लहरी पावसामुळे शेती व्यवसाय धोक्यात असल्याची ओरड होत असतानाच अंगापूर वंदन येथील शेतकरी संजय महाराज यांनी अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांनी ठिंबक सिंचनच्या साह्याने अवघ्या दहा गुंठ्यांत तब्बल पाच लाखांचे आले पिकाचे उत्पादन घेतले आहे. अंगापूर वंदन येथील तरुण शेतकर्‍याने घेतलेल्या अनोख्या उपक्रमाबद्दल जिल्ह्यात चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या शेतात नुकताच शेतकरी मेळावा घेतला होता. या मेळाव्यात आले पीक यासंदर्भात चर्चासत्र घेण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कणसे म्हणाले, ‘तरुण शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे गरजेचे आहे. माती परीक्षण, खते व औषधांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन व योग्यवेळी पाणी व तणाची काळजी घेतल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो.’ संजय महाराज म्हणाले, ‘मी तीनशे किलोच्या आल्याच्या बियाण्याचे दहा गुंठे क्षेत्रात तुषार सिंचनपद्धतीने पाणी दिले. त्यासाठी मशागत, शेणखत, रासायनिक खत व औषधांचा योग्यवेळी वापर केल्याने दहा गुंठे क्षेत्रात १४ गाड्या म्हणजेच सात हजार किलो आले पिकाचे उत्पादन घेतले. यातून सुमारे पाच लाखांचे उत्पन्न मिळाले.’ यावेळी शिवाजीराव कणसे, सरपंच अण्णा शेळके, शेखर कणसे, अध्यक्ष बापूराव कणसे, जितेंद्र कणसे, बाळू पहिलवान, मंगेश कणसे, प्रमोद पहिलवान, विजय मिस्त्री, प्रदीप पाटील, अप्पा कणसे, राजू कणसे, भानुदास पहिलवान आदी उपस्थित होते. सुभाष जाधव, यांनी सूत्रसंचालन केले. बी. एस. कणसे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)