शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसांत पाचजणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:07 IST

वेळे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका संपायचे नावच घेत नाही. सलग पाच दिवसांमध्ये पाच अपघात झाले असून यामध्ये ...

वेळे : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका संपायचे नावच घेत नाही. सलग पाच दिवसांमध्ये पाच अपघात झाले असून यामध्ये पाचजणांचा मृत्यू झाला आहे. सातारा लेनवर असलेल्या तीव्र उतारावर पुढे चालणाऱ्या मालट्रकला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत म्हसवे येथील २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेल्या २३ वर्षीय युवकास किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली याबाबतची माहिती अशी की, म्हसवे येथील रहिवासी असलेले अक्षय सदाशिव शिर्के (२५) व त्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेला गणेश उर्फ नंदू विनायक शिर्के (२३, दोघेही रा. आसवली, ता. खंडाळा) येथील कंपनीमध्ये नोकरीस होते. ते बुधवार, दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा ते सकाळी साडेसहा अशी ड्युटीवर होते. गुरुवार, दि. २८ रोजी सकाळी ड्युटी संपवून अक्षय शिर्केच्या दुचाकीवरून (एम.एच. ११ बीडब्ल्यू ०८३७) म्हसवेकडे निघाले होते. त्यांची दुचाकी पुणे-सातारा या महामार्गावरून सकाळी सव्वा आठच्या सुमारास खंबाटकी घाट चढून वेळे हद्दीत घाट रस्त्याच्या तीव्र उतारावर आली असता पुढे जाणाऱ्या वाहनाने कदाचित अचानकपणे ब्रेक लावल्याने दुचाकीस्वार वाहनावर आदळला. यामध्ये या झालेल्या भीषण अपघातात चालक अक्षय शिर्के याच्या डोक्यातील हेल्मेटचे तुकडे होऊन त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अतिरक्तस्त्रावामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला गणेश उर्फ नंदू शिर्के हा किरकोळ जखमी झाला. या अपघाताची माहिती भुईंज पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत मुंगसे, विजय अवघडे, मंदार शिंदे आणी पोलीस चालक किर्दक या सर्वाना मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला.

तत्पूर्वी सातारा-पुणे महामार्गावरील आनेवाडी टोलनाका येथे झालेल्या भीषण अपघातात वसंत मारुती गोरे ( ७२, रा. आनेवाडी, ता. जावली) हे महामार्ग ओलांडत असताना चारचाकी वाहनाने जोराची धडक दिली. यातच त्यांचा मृत्यू झाला होता तर ज्ञानेश्वर बाजीराव शिवथरे (७५, रा. कळंबे ता. वाई) हे शनिवार २३ रोजी भुईंज आठवडा बाजारातून पत्नीसह भाजीपाला खरेदी करून दोघेही आपल्या दुचाकीवरून कळंबे या गावाकडे जात असताना भुईंज येथील कृष्णा नदीच्या पुलावर पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या या अपघातात ज्ञानेश्वर शिवथरे यांचा जागीच मृत्यू झाला. वाई येथील कृष्णा नदीवर असलेल्या भद्रेश्वर पुलाच्या मध्यभागी ग्रीटने भरलेल्या डंपरने दुचाकीवर पुढे जात असलेल्या कमल सुरेश सोनावणे रा. ओझर्डे ता. वाई यांना धडक देऊन रस्त्यावर पडल्यावर ५० फूट फरफटत नेले. यामध्ये त्यांचाही मृत्यू झाला.