शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

दोन दशकांत प्रथमच आंब्याचे दर स्थिर

By admin | Updated: June 17, 2016 00:47 IST

साताऱ्यातील स्थिती : एप्रिल, मे, जूनमध्ये घसरण नाही; पुढील महिन्यात आंब्याला निरोप

सातारा : झाडांना मोहर बहरला असला तरी पोषक वातावरण नसल्याने मोठ्या प्रमाणात मोहर झडला असल्याने यंदा बाजारात मागणी पेक्षा कमी उत्पादन झाले. त्याचा परिणाम मागील वर्षाच्या कालखंडात प्रथमच अंब्यांचा दर संपूर्ण हंगाम टिकून राहिला असून, पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यातच आंबा बाजारातून निरोप घेईल, असे मत व्यापारी वर्गातून होऊ लागले आहे. कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमधून येणारा हापूस, पायरी, केशर आणि तोतापुरी आंब्यांचे यंदा २५ ते ३० टक्केच उत्पादन झाले असल्याने आवक मंदावली आहे. त्यामुळे उपलब्ध आंब्याचे दर संपूर्ण हंगाम स्थिरावला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून हापूस ६०० रुपये ४ डझनची पेटी दर स्थिरावून आहे. तर पायरी, केशर, नीलम, तोतापुरी यांची डझनाचे बॉक्स साधारणत: १५० ते ३०० रुपये विक्रमी जात आहे. यांचेही दर कमी न झाल्याने यंदा गरिबांपासून कोसो दूर आंबा राहिला आहे. सातारा तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेला आंबाही यंदा चांगलाच भाव खाऊन गेला. साडे तीनशे रूपये डझनपासून सुरू झालेला हा दर आता शंभर रूपयांवर येवून थांबला आहे. तालुक्यातील विविध ठिकाणांहून पाटी आणि कॅरेटमध्ये आंबे घेवून ते पोवईनाका, राजवाडा, बॉम्बे रेस्टॉरन्ट, बसस्थानक या शहरातील मोक्याच्या ठिकाणी विकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस चांगलीच वाढली होती. मुक्कामी गाडीने साताऱ्यात यायचे आणि आंबे विकुन झाले की दहा अकरापर्यंत पुन्हा गावी जाण्याचे या शेतकऱ्यांची दिनचर्या झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी यंदा आंब्याच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. यंदा कमी पाऊस, अवकाळी पावसाची कमतरता आणि मोहर लागले, त्यावेळी पोषक वातावरण नसल्याने आंब्याच्या उत्पादनात घट झाली असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) पेट्यांची जागा बॉक्सने घेतली कोकणमधून येणारा हापूस आंबा हा शक्यतो लाकडी पेटीतून ६ डझन भरून येतो; परंतु यंदा दर वाढल्याने पेटी खरेदीकडे फारसे ग्राहक येत नसल्याचे पाहून कोकणातील शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना म्हणून १ डझनाचे बॉक्स पॅकिंग करून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केले. याला ग्राहकांकडूनही मागणी आहे. मागील वर्षी १५ आॅगस्टपर्यंत आंब्याचा हंगाम सुरू होता; परंतु यंदा आंबा उत्पादनात कमालीची घट झाली असून, मागणीपेक्षा कमी आंबा असल्याने दरही स्थिरावले आहेत. परिणामी यंदा हा हंगाम जुलैच्या पहिल्याच आठवड्यात संपुष्टात येईल, अशी परिस्थिती बाजारपेठेत दिसत आहे. -इरफान बागवान, घाऊक व्यापारी