शहरं
Join us  
Trending Stories
1
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
2
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
3
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
4
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
5
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
6
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
7
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
8
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
9
Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी
10
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
11
"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट
12
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड
13
मोठा खुलासा! आरसीबीला त्याच दिवशी करायचा होता सत्कार; पोलिसांनी ८ जून तारीख सुचविलेली तरी...
14
Raja Raghuvanshi and Sonam: हनिमूनला गेलेल्या राजा आणि सोनमचा पोलिसांना मिळाला सीसीटीव्ही व्हिडीओ
15
अभिनेते जितेंद्र यांनी विकली मुंबईतील जमीन, तब्बल ८५५ कोटींचा सौदा; नवीन मालक कोण?
16
Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना RCB टीमकडून प्रत्येकी १० लाखांची मदत, त्याशिवाय...
17
महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार
18
Viral : एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी मुलीने बुक केली गाडी, कारण ऐकलंत का?
19
IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा
20
या देशात जन्माला येणार जगातील 50% मुलं, कमी होऊ लागणार भारताची लोकसंख्या; टेन्शन वाढवणारा आहे तज्ज्ञांचा अनुमान

दोन दशकांत प्रथमच आंब्याचे दर स्थिर

By admin | Updated: June 17, 2016 00:47 IST

साताऱ्यातील स्थिती : एप्रिल, मे, जूनमध्ये घसरण नाही; पुढील महिन्यात आंब्याला निरोप

सातारा : झाडांना मोहर बहरला असला तरी पोषक वातावरण नसल्याने मोठ्या प्रमाणात मोहर झडला असल्याने यंदा बाजारात मागणी पेक्षा कमी उत्पादन झाले. त्याचा परिणाम मागील वर्षाच्या कालखंडात प्रथमच अंब्यांचा दर संपूर्ण हंगाम टिकून राहिला असून, पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यातच आंबा बाजारातून निरोप घेईल, असे मत व्यापारी वर्गातून होऊ लागले आहे. कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेशमधून येणारा हापूस, पायरी, केशर आणि तोतापुरी आंब्यांचे यंदा २५ ते ३० टक्केच उत्पादन झाले असल्याने आवक मंदावली आहे. त्यामुळे उपलब्ध आंब्याचे दर संपूर्ण हंगाम स्थिरावला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून हापूस ६०० रुपये ४ डझनची पेटी दर स्थिरावून आहे. तर पायरी, केशर, नीलम, तोतापुरी यांची डझनाचे बॉक्स साधारणत: १५० ते ३०० रुपये विक्रमी जात आहे. यांचेही दर कमी न झाल्याने यंदा गरिबांपासून कोसो दूर आंबा राहिला आहे. सातारा तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेला आंबाही यंदा चांगलाच भाव खाऊन गेला. साडे तीनशे रूपये डझनपासून सुरू झालेला हा दर आता शंभर रूपयांवर येवून थांबला आहे. तालुक्यातील विविध ठिकाणांहून पाटी आणि कॅरेटमध्ये आंबे घेवून ते पोवईनाका, राजवाडा, बॉम्बे रेस्टॉरन्ट, बसस्थानक या शहरातील मोक्याच्या ठिकाणी विकणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस चांगलीच वाढली होती. मुक्कामी गाडीने साताऱ्यात यायचे आणि आंबे विकुन झाले की दहा अकरापर्यंत पुन्हा गावी जाण्याचे या शेतकऱ्यांची दिनचर्या झाली होती. अनेक शेतकऱ्यांनी यंदा आंब्याच्या माध्यमातून लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. यंदा कमी पाऊस, अवकाळी पावसाची कमतरता आणि मोहर लागले, त्यावेळी पोषक वातावरण नसल्याने आंब्याच्या उत्पादनात घट झाली असल्याचे शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी) पेट्यांची जागा बॉक्सने घेतली कोकणमधून येणारा हापूस आंबा हा शक्यतो लाकडी पेटीतून ६ डझन भरून येतो; परंतु यंदा दर वाढल्याने पेटी खरेदीकडे फारसे ग्राहक येत नसल्याचे पाहून कोकणातील शेतकऱ्यांनी यावर उपाययोजना म्हणून १ डझनाचे बॉक्स पॅकिंग करून विक्रीसाठी बाजारात उपलब्ध केले. याला ग्राहकांकडूनही मागणी आहे. मागील वर्षी १५ आॅगस्टपर्यंत आंब्याचा हंगाम सुरू होता; परंतु यंदा आंबा उत्पादनात कमालीची घट झाली असून, मागणीपेक्षा कमी आंबा असल्याने दरही स्थिरावले आहेत. परिणामी यंदा हा हंगाम जुलैच्या पहिल्याच आठवड्यात संपुष्टात येईल, अशी परिस्थिती बाजारपेठेत दिसत आहे. -इरफान बागवान, घाऊक व्यापारी