शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

रहिमतपूर सोसायटीत प्रथमच शिवसेनेची शिट्टी

By admin | Updated: February 13, 2015 22:57 IST

तिहेरी लढत : सेनेच्या एंट्रीने निवडणूक रंगणार र

हिमतपूर : कोरेगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या जागृत समजल्या जाणाऱ्या रहिमतपूर विकास सेवा सोसायटी निवडणुकीमध्ये शिवसेना व इतर समविचारी पक्षांनी पहिल्यांदाच ‘शिट्टी’ चिन्ह निश्चत करून राजकीय आखाड्यात उडी मारल्याने निवडणुकीत राष्ट्रवादी की राष्ट्रीय काँग्रेस शिट्टी वाजणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. २७१५ सभासद असलेल्या विकास सेवा सोसायटीवर सध्या राष्ट्रीय काँग्रेसच्या चित्रलेखा माने-कदम, माजी नगराध्यक्ष संपत माने यांचे वर्चस्व आहे. व दुसरा विरोधी गट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांचा आहे. या दोघांमध्ये खरी लढत रंगणार असल्याचे चित्र असले तरी शिवसेनेचे उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे वास्तव्य शहरात असल्यामुळे किरण भोसले, अमर माने यांच्या साथीने या दोन्ही पक्षापुढे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर तिरंगी निवडणूक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऐन निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसप्रणित आघाडीने नुकताच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा ठराव चित्रलेखा माने-कदम यांच्या नावाने केल्याने त्या गंभीरपणाने निवडणुकीकडे पाहू लागल्या आहेत. बैठका होऊ लागल्या आहेत, तर सुनील माने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने या निवडणुकीला महत्त्व आले आहे. त्यांनीही आता नाही तर पुन्हा नाही, असा चंग बांधून कार्यकर्ते चार्ज केले आहेत. नितीन बानुगडे-पाटलांची सुद्धा पहिलीच निवडणूक म्हणून ते व्यूहरचना करून प्रक्रिया पार पाडत आहेत. शहरातील प्रमुख राजकीय पक्षाच्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केल्याचे अर्ज भरण्याच्या दिवशीचे चित्र होते; परंतु नेत्यांनी या तडजोडीला हिरवा कंदील दाखवला नाही. परंतु त्यासाठी कार्यकर्ते धडपडताना दिसत आहेत. पूर्वी माझी नगराध्यक्ष वासुदेव माने हे सोसायटी निवडणुकीचे केंद्रबिंदू राहिले होते. नुकतेच त्यांनी पालकमंत्री विजय शिवतारे यांचे शहरात स्वागत केले होते. त्यांनी त्यांची या निवडणुकीतील भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. त्यांच्या भूमिकेकडे शहरातील लोकांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या भूमिकेचा निवडणूक निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशी लोकांच्यात चर्चा रंगू लागली आहे. (वार्ताहर) दहा वर्षांत आम्ही सत्तेच्या माध्यमातून आमच्या संचालक मंडळाच्या ऐकोप्याने साठ वर्षांची अडचण म्हणजे सर्व सोयीनियुक्त अद्ययावत इमारत उभी केली आहे. व सोसायटी कर्जमुक्त सुद्धा केली आहे अभ्यासू संचालक मंडळ असल्यामुळे इतरांनी आदर्श घ्यावा, असे कामकाज चालू आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण सक्षमपणे निवडणुकीस सामोरे जात आहोत. - चित्रलेखा माने-कदम, काँग्रेस गेली दहा वर्षे विकास सेवा सोसायटीची सत्ता राष्ट्रीय काँग्रेसकडे असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही योजना राबविली गेली नाही. तसेच सोसायटीच्या सचिवाने जो अपहार केला होता, त्याबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहेत. - सुनील माने, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस