शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

आशिया खंडात प्रथमच लिथली आर्च पद्धतीने पूल अभियंत्यांची उपस्थिती : कोरेगावात स्टील विरहित पुलाची निर्मिती; तीळगंगा नदीवर उभारणीचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:21 IST

कोरेगाव : मजबूत व देखभाल विरहित तंत्रज्ञान असलेल्या लिथली आर्च पद्धतीने मोठ्या प्रमाणावर पुलांची निर्मिती केली जाते. आशिया खंडात त्याच्या वापराचा निर्णय झाला असून

कोरेगाव : मजबूत व देखभाल विरहित तंत्रज्ञान असलेल्या लिथली आर्च पद्धतीने मोठ्या प्रमाणावर पुलांची निर्मिती केली जाते. आशिया खंडात त्याच्या वापराचा निर्णय झाला असून, पहिला मान कोरेगाव तालुक्याला मिळाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला बुधवारी पश्चिम महाराष्टÑातील उच्चपदस्थ अभियंत्यांनी भेट देऊन पाहणी केली. हे तंत्र आत्मसात करण्यासाठी सकाळपासून शेकडो अभियंते कोरेगावात होते.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कोरेगाव शहरात केदारेश्वर मंदिरानजीक तीळगंगा नदीवर नव्याने दोन पुलांची उभारणी केली जात आहे. या पुलाच्या कामासाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील अंतर्गत दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा पूल मजबूत होणे गरजेचे असल्याने येथे चांगले तंत्रज्ञान वापरले जावे, यासाठी आमदार शिंदे हे प्रयत्नशील होते. अधीक्षक अभियंत्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून वरिष्ठांशी चर्चा केली आणि त्यातून युरोपसह जगातील अन्य खंडांमध्ये लोकप्रिय असलेल्या लिथली आर्च पद्धतीचा वापर करण्यावर एकमत झाले आणि त्यास परवानगी घेण्यात आली. कोरेगावातील पुलाचे काम नागपूरच्या कंपनीकडून असल्याने त्यांच्याशी समन्वय साधून या पद्धतीचा वापर करण्यास सुरुवात झाली. पुलाचे काम निम्मे झाले असून, पाच जिल्ह्यांच्या उच्चपदस्थ अभियंत्यांनी या कामास भेट दिली.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, सहायक मुख्य अभियंता जे. डी. कुलकर्णी, अधीक्षक अभियंता संभाजी माने, सदाशिव साळुंके, राजेश पाटील, कार्यकारी अभियंता लक्ष्मण वाघमोडे, संजय सोनावणे, उपअभियंता राहुल अहिरे, कनिष्ठ अभियंता राजेंद्र नवाळे यांच्यासह कार्यकारी अभियंता, उपअभियंता उपस्थित होते. आर्च इन्फ्रा या ठेकेदार कंपनीचे चेतन पवार व राजू शहाडे यांनी अभियंत्यांना या तंत्रज्ञानाची माहिती दिली.लिथली आर्च पद्धतीला १२० वर्षांचे आयुर्मानकोरेगावात वापर करण्यात येत असलेल्या लिथली आर्च पद्धतीला सुमारे १२० वर्षांचे आयुर्मान आहे. कोणत्याही प्रकारचे स्टील न वापरता हा पूल बांधला जात असून, त्याला भविष्यकाळात देखभाल दुरुस्तीची आवश्यकता राहत नाही. या पुलाचे काम म्हणजे माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण आहे, अशी प्रतिक्रिया उपअभियंता राहुल अहिरे यांनी दिली. 

कोरेगाव मतदारसंघातील जनतेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरून दर्जेदार विकासकामे करण्याचे अभिवचन मी दिले आहे. पालकमंत्रिपदावर असताना शहरातील केदारेश्वर मंदिरानजीक नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेतला होता, तशी त्यास मान्यता देण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने लिथली आर्च पद्धतीचा वापर केल्याने, हे काम दर्जेदार होणार आहे. या विभागाला मी धन्यवाद देतो.- शशिकांत शिंदे, आमदार