शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

पहिले शहीद अपशिंगेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 23:20 IST

प्रगती जाधव- पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील २५४ जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावातील मुगुटराव भोसले यांना १५ मार्च १९४१ रोजी देशसेवा बजावताना वीरमरण आहे. देशासाठी हुतात्मा झालेले ते पहिले सातारकर आहेत.सातारा जिल्ह्याला शूरांची मोठी परंपरा आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे ...

प्रगती जाधव- पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील २५४ जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावातील मुगुटराव भोसले यांना १५ मार्च १९४१ रोजी देशसेवा बजावताना वीरमरण आहे. देशासाठी हुतात्मा झालेले ते पहिले सातारकर आहेत.सातारा जिल्ह्याला शूरांची मोठी परंपरा आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावात प्रत्येक घरात एक सैनिक जन्माला येतो. लहानपणापासूनच गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फौजेत जाण्याचे बाळकडू दिले जाते. पणजोबांचा वारसा तिसरी पिढी फौजेत दाखल होऊन चालविला जातो, अशी शेकडो घरं मिलिटरी अपशिंगेमध्ये आढळतात. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक सैनिक अपशिंगे गावाने दिल्यामुळे या गावाला मिलिटरी अपशिंगे असे नाव पडले आहे. गावात ठिकठिकाणी तरुणांसाठी प्रेरणास्थाने म्हणून फौजेत शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने येथे जतन करण्यात आल्या आहेत.देशासाठी जिल्ह्यातून पहिले बलिदान दिले ते मुगुटराव भोसले यांनी. त्यानंतर साताऱ्यातील तुकाराम सीताराम मोरे यांना २८ जुलै १९४१ रोजी, कोरेगाव तालुक्यातील बोबडेवाडी येथील मारुती जाधव यांना २२ मे १९४४, सातारा तालुक्यातील सोनगाव येथील खाशाबा जाधव यांना १६ जून १९४४, सातारा तालुक्यातील निगडी येथील अंतू देवकर यांना ११ मार्च १९४५, सातारा तालुक्यातील भरतगाववाडी येथील रघुनाथ जाधव यांना २८ आॅक्टोबर १९४५, खटाव तालुक्यातील अनपटवाडी येथील राजाराम घाडगे यांना २९ आॅक्टोबर १९४५ आणि खटाव तालुक्यातील कुरोली येथील महादेव फडतरे यांना १ जून १९४७ रोजी यांना वीरमरण आले.देशसेवा बजावताना दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना वीरमरण पत्करणारे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कर्नल संतोष महाडिक यांच्या नावाची नोंद आहे. शहिदांमध्ये शिपाई, हवालदार यांच्यासह लान्स नाईक आणि नाईक या पदावरील जवानांचा समावेश आहे. अद्यापही जिल्ह्यातील जवानांची संख्या वाढत गेली.सर्वाधिक शहीद सातारा तालुक्यातील...सातारा जिल्ह्यात सर्वाधिक शहीद सातारा तालुक्यातील आहेत. यातही मिलिटरी अपशिंगे येथील शहिदांची संख्या मोठी आहे. सातारा तालुक्यात ९२, कोरेगाव तालुक्यात ३०, वाई तालुक्यात ९, पाटण तालुक्यात १७, खटाव तालुक्यात ३९, कºहाड तालुक्यात २३, फलटण तालुक्यात ६, माण तालुक्यात ११, खंडाळा तालुक्यात ९ तर जावळी तालुक्यात २ जवान शहीद झाले आहेत. शहीद होणाºयांमध्ये शिपाई पदावरील जवानांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात माजी सैनिकांची संख्या २६ हजारांच्या घरात आहे. तर सेवेत कार्यरत असणाºया जवानांची संख्या अर्ध्या लाखाच्या सुमारास आहे. यातही मिलिटरी अपशिंगे आघाडीवर आहे.जिलेबी वाटून आंनदोत्सवसातारा जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी मोठ्या प्रमाणावर जिलेबीची खरेदी केली जाते. परस्परांना भेटून जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम सर्वत्र जोरकसपणे सुरू असतो. देश स्वतंत्र झाला म्हणून अनेकांनी साताºयातील मुख्य चौकात मोफत जिलेबी वाटून हा आनंद साजरा केला. त्यानंतर गेली ७० वर्षे सातारकर परस्परांना जिलेबी देतात.