शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पहिले शहीद अपशिंगेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 23:20 IST

प्रगती जाधव- पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील २५४ जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावातील मुगुटराव भोसले यांना १५ मार्च १९४१ रोजी देशसेवा बजावताना वीरमरण आहे. देशासाठी हुतात्मा झालेले ते पहिले सातारकर आहेत.सातारा जिल्ह्याला शूरांची मोठी परंपरा आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे ...

प्रगती जाधव- पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील २५४ जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावातील मुगुटराव भोसले यांना १५ मार्च १९४१ रोजी देशसेवा बजावताना वीरमरण आहे. देशासाठी हुतात्मा झालेले ते पहिले सातारकर आहेत.सातारा जिल्ह्याला शूरांची मोठी परंपरा आहे. सातारा तालुक्यातील अपशिंगे या गावात प्रत्येक घरात एक सैनिक जन्माला येतो. लहानपणापासूनच गावातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना फौजेत जाण्याचे बाळकडू दिले जाते. पणजोबांचा वारसा तिसरी पिढी फौजेत दाखल होऊन चालविला जातो, अशी शेकडो घरं मिलिटरी अपशिंगेमध्ये आढळतात. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक सैनिक अपशिंगे गावाने दिल्यामुळे या गावाला मिलिटरी अपशिंगे असे नाव पडले आहे. गावात ठिकठिकाणी तरुणांसाठी प्रेरणास्थाने म्हणून फौजेत शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने येथे जतन करण्यात आल्या आहेत.देशासाठी जिल्ह्यातून पहिले बलिदान दिले ते मुगुटराव भोसले यांनी. त्यानंतर साताऱ्यातील तुकाराम सीताराम मोरे यांना २८ जुलै १९४१ रोजी, कोरेगाव तालुक्यातील बोबडेवाडी येथील मारुती जाधव यांना २२ मे १९४४, सातारा तालुक्यातील सोनगाव येथील खाशाबा जाधव यांना १६ जून १९४४, सातारा तालुक्यातील निगडी येथील अंतू देवकर यांना ११ मार्च १९४५, सातारा तालुक्यातील भरतगाववाडी येथील रघुनाथ जाधव यांना २८ आॅक्टोबर १९४५, खटाव तालुक्यातील अनपटवाडी येथील राजाराम घाडगे यांना २९ आॅक्टोबर १९४५ आणि खटाव तालुक्यातील कुरोली येथील महादेव फडतरे यांना १ जून १९४७ रोजी यांना वीरमरण आले.देशसेवा बजावताना दहशतवाद्यांना कंठस्नान घालताना वीरमरण पत्करणारे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कर्नल संतोष महाडिक यांच्या नावाची नोंद आहे. शहिदांमध्ये शिपाई, हवालदार यांच्यासह लान्स नाईक आणि नाईक या पदावरील जवानांचा समावेश आहे. अद्यापही जिल्ह्यातील जवानांची संख्या वाढत गेली.सर्वाधिक शहीद सातारा तालुक्यातील...सातारा जिल्ह्यात सर्वाधिक शहीद सातारा तालुक्यातील आहेत. यातही मिलिटरी अपशिंगे येथील शहिदांची संख्या मोठी आहे. सातारा तालुक्यात ९२, कोरेगाव तालुक्यात ३०, वाई तालुक्यात ९, पाटण तालुक्यात १७, खटाव तालुक्यात ३९, कºहाड तालुक्यात २३, फलटण तालुक्यात ६, माण तालुक्यात ११, खंडाळा तालुक्यात ९ तर जावळी तालुक्यात २ जवान शहीद झाले आहेत. शहीद होणाºयांमध्ये शिपाई पदावरील जवानांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात माजी सैनिकांची संख्या २६ हजारांच्या घरात आहे. तर सेवेत कार्यरत असणाºया जवानांची संख्या अर्ध्या लाखाच्या सुमारास आहे. यातही मिलिटरी अपशिंगे आघाडीवर आहे.जिलेबी वाटून आंनदोत्सवसातारा जिल्ह्यात स्वातंत्र्यदिनी मोठ्या प्रमाणावर जिलेबीची खरेदी केली जाते. परस्परांना भेटून जिलेबी वाटण्याचा कार्यक्रम सर्वत्र जोरकसपणे सुरू असतो. देश स्वतंत्र झाला म्हणून अनेकांनी साताºयातील मुख्य चौकात मोफत जिलेबी वाटून हा आनंद साजरा केला. त्यानंतर गेली ७० वर्षे सातारकर परस्परांना जिलेबी देतात.