शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

सर्वप्रथम महर्षी वेद व्यास यांच्याकडून विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

विसर्जनाचा अर्थ असा सांगितला की, हे जग एका चक्राच्या रूपात चालते. जो आला आहे त्याला जावेच लागणार आणि पुन्हा ...

विसर्जनाचा अर्थ असा सांगितला की, हे जग एका चक्राच्या रूपात चालते. जो आला आहे त्याला जावेच लागणार आणि पुन्हा तो परतून येणार. गणपती विसर्जनाशी निगडित अनेक गोष्टी आहेत. त्यापैकी एक म्हणजेच गणपतीला जलतत्त्वांचा अधिपती मानलं जातं. त्यांच्या विसर्जनाचे मुख्य कारण तर हेच आहे की, अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीची पूजा-अर्चा करून त्यांना पुन्हा पाण्यात विसर्जित केले जाते. म्हणजेच ते ज्याचे अधिपती आहेत तिथे त्यांना पोहोचवलं जातं.

गणेश मूर्तीचे विसर्जन कसे करावे, याबाबत धर्मशास्त्रात काही दाखले मिळतात. त्यानुसार अनंत चतुर्दशीदिवशी मोदक, शिरा जे काही गोड पदार्थ उपलब्ध असेल असा गोडाचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर त्याचे पूजन करून विसर्जनाच्या अक्षता बाप्पांच्या चरणावर अर्पण कराव्यात. त्यानंतर मूर्ती उत्तरेकडे हलवायची. यामुळे मूर्तीचे विसर्जन झाले असे मानले जाते.

गणेश मूर्तीचे विसर्जन कोठे करावे, याबाबत अनेक मतप्रवाह येत असले तरी अमुक पाण्यातच विसर्जन करावे, असे नाही. शक्यतो वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. मात्र, ज्या भागात नदी नाही. ओढ्याला पाणी नाही, अशा ठिकाणी गणेश मूर्ती ही शेततळं, विहिरीत विसर्जित केली तरी चालते.

- जगदीश कोष्टी

चौकट

निर्माल्य झाडांना घालावे

गणेशोत्सव काळात दररोज दोन वेळा पूजा केल्यानंतर तयार होणारे निर्माल्य शेत, झाडांना किंवा बागेत घालावे. यामुळे माणसांना त्रास न होता निसर्गाला फायदा होईल, याची काळजी घ्यावी.

कोट

विसर्जन हे पार्थिव म्हणजे मातीच्या मूर्तीचे केले जाते. यांतू देवगणा सर्वे पूजामादाय पार्थविम्ब, इष्ट कामना प्रसिध्यर्थम पुनर्रआगमानायच हा मंत्र म्हणून विसर्जन करावी. धातूच्या मूर्ती असल्यास विसर्जनाच्या अक्षता पायावर अर्पण करून मूर्ती उत्तरेकडे हलविली तरी विसर्जन झाले, असे मानले जाते.

- महेश जंगम, सातारा.