शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
5
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
6
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
7
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
8
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
9
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
10
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
11
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
12
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
13
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
15
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
16
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
17
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
18
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
19
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
20
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!

दिवाळीची पहिली पहाट सुमधूर सुरात : सातारकर रसिकांनी मराठी-हिंदी गाण्यावर धरला ठेका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:00 IST

राजवाडा परिसरात गांधी मैदानावर मंगळवारी दिवाळीची पहिली पहाट सुमधूर मराठी व हिंदी गाण्यांनी रंगली.

ठळक मुद्देगांधी मैदानात संगीत मैफील या अभंगानंतर ज्येष्ठ गायक चंद्रकांत शिंदे यांचे ‘स्वरगंगेच्या काठावरती’ हे गीत सादर होऊन पावसाला सुरुवात झाली आणि

सातारा : राजवाडा परिसरात गांधी मैदानावर मंगळवारी दिवाळीची पहिली पहाट सुमधूर मराठी व हिंदी गाण्यांनी रंगली. यावेळी रसिक सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अवीट, सुमधूर व एव्हरग्रीन गाण्यांचा आनंद लुटला.

गेली १३ वर्षे सर्व सातारकरांसाठी ऐन दिवाळीत ही अवीट, सुमधूर व एव्हरग्रीन गाणी ऐकण्यासाठी दरवर्षीच हजारो सातारकर गांधी मैदानात हजर असतात. मंगळवारी भल्या पहाटेच या कार्यक्रमासाठी सातारकर मोठ्या उत्साहात उपस्थित होते. ‘केव्हातरी पहाटे’ या कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्त्या गणेशाला वंदन करणाऱ्या ‘तू बुद्धी दे’ या मराठी गीताने गायिका पौर्णिमा व सहकलाकारांनी करत त्यानंतर गीताने गायलेली ‘माझ्या घरी दिवाळी’ हे दिवाळीगीत सादर होऊन कार्यक्रमाचे शीर्षक गीत असलेल्या ‘केव्हातरी पहाटे’ या गाण्याला पुन्हा गायिका पौर्णिमा भावसारने साज चढवला. साताºयाचे स्थानिक सुप्रसिद्ध गायक राजेंद्र घोणे यांच्या ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’ या अभंगानंतर ज्येष्ठ गायक चंद्रकांत शिंदे यांचे ‘स्वरगंगेच्या काठावरती’ हे गीत सादर होऊन पावसाला सुरुवात झाली आणि हा रंगलेला कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला.

कार्यक्रमामध्ये गायनसाथ पौर्णिमा भावसार, गीता बोधे-भस्मे, राजन घोणे, चंद्र्रकांत शिंदे, मधुराणी मोकल, संतोष वाघ, विवेक जाधव यांची होती तर वादनासाठी सिंथेसायजरवर दीपक सोनावणे, ड्रमसाथ धनंजय कान्हेरे, ढोलकसाथ अनिल खैरनार, तबलासाथ शांताराम दयाळ, गिटारवर चंदू पुट्टा, अ‍ॅटोपॅड साथ रोहन मोकल यांची होती. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळ प्रकाश गवळी, निशांत पाटील, गुरुप्रसाद सारडा, अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, सलीम कच्छी, दिलीप गवळी, नरेंद्र पाटील व सातारकर उपस्थित होते.चालक-वाहकांना अभ्यंगस्नानसातारा मध्यवर्ती बसस्थानकात मंगळवारी बाहेर विभागातून मुक्कामी गाडी घेऊन आलेल्या चालक-वाहकांसाठी अभ्यंगस्रानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये त्यांच्या अंघोळीसाठी गरम पाणी, तेल, उठण, साबन देण्यात आली होती. तसेच फराळाचीही सोय केली होती. चालक-वाहक एकमेकांना अंघोळ घालत होते. आपण कुटुंबापासून दूर असल्याची भावना होऊ नये, यासाठी हा उपक्रम आयोजित केला जातो.