शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बहिणींसमोरच पवनवर गोळीबार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 23:45 IST

कºहाड : रस्त्यावरील गोंधळ ऐकून टीव्ही पाहत असलेला पवन घराबाहेर आला. मात्र, त्याला पाहताच हल्लेखोरांनी पिस्तूल रोखले. अंदाधुंद गोळीबार ...

कºहाड : रस्त्यावरील गोंधळ ऐकून टीव्ही पाहत असलेला पवन घराबाहेर आला. मात्र, त्याला पाहताच हल्लेखोरांनी पिस्तूल रोखले. अंदाधुंद गोळीबार करीतच ते त्याच्या दिशेने धावले. या गोळीबारात तब्बल अकरा गोळ्या पवनला लागल्या आणि क्षणार्धात रक्ताच्या थारोळ्यात तो खाली कोसळला. हा सगळा प्रकार त्याच्या दोन बहिणींसमोरच झाला. भावाची अवस्था, प्रचंड गोळीबार आणि उडालेल्या गोंधळामुळे त्या दोघीही मुर्छित झाल्या.कºहाडातील महात्मा फुले नगरमध्ये येताच संशयित शिवराज इंगवले याने त्याच्या हातातील रिव्हॉल्व्हरने हवेत गोळी झाडली. तसेच पवनचे नाव घेऊन सर्व संशयित मोठ-मोठ्याने ओरडत होते. हा गोंधळ ऐकून घरात टीव्ही पाहत बसलेला पवन घराबाहेर आला. त्याला पाहताच संशयित जुनेद शेख, समीर मुजावर, मजहर मुजावर, शिवराज इंगवले, हैदर मुल्ला त्याच्या दिशेने धावले. त्यावेळी पवनने नजीकच असलेल्या तांबोळी पोहा मिलच्या पायरीवरून उडी मारून तेथून पळून जाण्याचा प्रयत्नकेला. मात्र, संशयितांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला.पवन घरातून बाहेर धावल्याने त्याच्या पाठोपाठ त्याच्या दोन्ही बहिणी पूजा व काजलही बाहेर धावत आल्या. काय घडतंय, हे समजण्यापूर्वीच त्यांच्या डोळ्यासमोरच संशयितांनी पवनवर गोळ्या झाडल्या. त्यापैकी अनेक गोळ्या पवनला लागल्या आणि तो खाली कोसळला. पूजा व काजल मोठ्याने ओरडल्या. मात्र, त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करीत संशयितांनी गोळीबार करून कार व दुचाकीवरून तेथून पळ काढला.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पवनला पाहिल्यानंतर पूजा व काजल बेशुद्ध झाल्या. तसेच गोळीबार सुरू असताना चौकात उभे असलेले उदय सातपुते आणि महेश दुबळे हेही घाबरले. गोळीबार सुरू असताना ते तेथून काही अंतरावर गेले. तसेच संशयित निघून गेल्यानंतर ते पवनकडे धावले. त्यांनी त्याला त्वरित कृष्णा भोसले यांच्या रिक्षातून सह्याद्री रुग्णालयात हलविले. मात्र, तोपर्यंत पवनचा मृत्यू झाला होता. त्यानंतर घटना समजल्यानंतर शहरातील दुकाने बंद ठेवलीसंशयिताच्या घरावर दगडफेकमृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर संतप्त जमाव मंगळवार पेठमार्गे बुधवार पेठेकडे जात होता. यावेळी कडक पोलीस बंदोबस्तही तैनात होता. मात्र, तरीही संतप्त जमावाने एका संशयिताच्या घरावर दगडफेक करून घराच्या काचा फोडल्या. तसेच मंगळवार पेठ परिसरातील काही दुकाने व वाहनांवरही यावेळी दगडफेक करण्यात आली.दुचाकी, रिक्षा पेटवली...पवनचा मृत्यू झाल्याची माहिती शहरात पसरल्यानंतर पहाटेच्या सुमारास शेकडो युवक बुधवार पेठेत जमा झाले. त्याठिकाणी जमावाने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच काही युवक प्रभात थिएटरपासून चालत बापूजी साळुंखे पुतळ्यानजीक गेले. चर्चसमोर उभी असलेली दुचाकी व एक रिक्षा युवकांनी जाळली.