शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

फटाके स्टॉलधारकांनी जाणली स्वच्छतेची शिस्त

By admin | Updated: October 26, 2014 23:26 IST

मैदान सोडताना दिसली स्वच्छता : आठ दिवसांत झाली कोट्यवधी रुपयांची उलाढाल

सातारा : सैनिकी शिस्त म्हणजे नेमके काय असते, याचा अनुभव सातारा शहर आणि परिसरातील फटाके स्टॉलवाल्यांनी यावर्षी घेतला. कधी नव्हे ते त्यांनी लष्करी शिस्तीचा अनुभव घेतल्यामुळे मैदान सोडताना त्यांना स्वच्छतेला प्राधान्य देऊनच मैदान सोडावे लागले. दीपावलीत सातारा शहरात दरवर्षी शंभर ते दीडशेच्या आसपास फटाका स्टॉल लागतात. काही वर्षांपूर्वी हे स्टॉल राजपथावर लावले जायचे. मात्र, पाच वर्षांपूर्वी येथे शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर येथे स्टॉल उभारणीस परवानगी द्यावी की नको, यावरही चर्चा रंगली. पालिका आणि स्टॉलधारकांमध्ये शाब्दिक वादावादीचे प्रसंगही उद्भवले. यानंतर राजपथावर स्टॉल उभारणीस मनाई करण्यात आली. यानंतर फटाके स्टॉल जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभारणीस प्रारंभ झाला. काही वर्षे येथे फटाके स्टॉल उभारणी करण्यात येत होती. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कागदी कचरा मोठ्या प्रमाणात साचू लागला. फटाके स्टॉलवालेही तसेच कचरा टाकून जाऊ लागल्याने आणि जिल्हा परिषदेनेही मैदान सफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही दिवस कचरा तसाच पडून राहू लागला. यावर काही सामाजिक संस्थांनी आवाज उठविल्यानंतर कचरा बाजूला केला आणि यापुढील काळात मैदान फटाके स्टॉलवाल्यांना न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला.  मात्र, जवळपास सव्वाशे ते दीडशे फटाके स्टॉल लागत असल्यामुळे येथे कागदी कचराही मोठ्या प्रमाणात जाणवतो. मात्र, यावेळी फटाका स्टॉल सैनिक स्कूलच्या मैदानावर असल्यामुळे सर्व प्रक्रिया शिस्तीत पार पडली आहे.रविवारी फटाका स्टॉल काढण्याचे काम वेगाने सुरू होते. यावेळी कोठेही कचरा दिसून आला नाही. (प्रतिनिधी)फटाका कचऱ्याची समस्या मोठीसातारा शहरात सुरुवातीच्या काळात फटाके स्टॉलची उभारणी राजवाड्यावरील गांधी मैदानावर व्हायची. मात्र, स्टॉलधारकांची संख्या वाढू लागल्यामुळे स्टॉल उभारणी तालीम संघाच्या मैदानावरही केली जायची. मात्र, दीपावली संपल्यानंतर आणि स्टॉल काढून घेतल्यानंतर येथे कचरा साचला जायचा. त्याचा त्रास पैलवान तसेच नागरिकांना होऊ लागल्यामुळे त्यांनीही विरोध केला. यानंतर हेच स्टॉल राजपथावर आले. मात्र, येथेही स्टॉलधारकांचा पिछा न सुटल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद आणि त्यानंतर आता सैनिक स्कूलच्या मैदानावर फटाके स्टॉलची उभारणी केली जाऊ लागली.वर्षभराचे उत्पन्न आठच दिवसांतसातारा शहरात जवळपास दीडशेच्या आसपास स्टॉल लावले जातात. यामध्ये व्यापारी तर असतातच त्याचबरोबर काही युवक मंडळी एकत्रित येऊन स्टॉल उभारणी करतात. यातून चांगले उत्पन्न मिळते. सातारा शहरातील अनेक मंडळींचा फटाके स्टॉल उभारणीकडे कल वाढू लागला आहे. कारण आठ दिवसांत वर्षभराचे उत्पन्न मिळत असल्यामुळे अनेकजण फटाके स्टॉल उभारणीला प्राधान्य देतात. यासाठी आवश्यक असणारे परवाने काढण्यासाठीही चढाओढ असते. आठ दिवसांत वर्षभर पुरेल इतके उत्पन्न मिळत असल्यामुळे फटाके स्टॉल उभारणीला प्राधान्य देण्यात ही मंडळी आघाडीवर असते.