शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

फटाके स्टॉलधारकांनी जाणली स्वच्छतेची शिस्त

By admin | Updated: October 26, 2014 23:26 IST

मैदान सोडताना दिसली स्वच्छता : आठ दिवसांत झाली कोट्यवधी रुपयांची उलाढाल

सातारा : सैनिकी शिस्त म्हणजे नेमके काय असते, याचा अनुभव सातारा शहर आणि परिसरातील फटाके स्टॉलवाल्यांनी यावर्षी घेतला. कधी नव्हे ते त्यांनी लष्करी शिस्तीचा अनुभव घेतल्यामुळे मैदान सोडताना त्यांना स्वच्छतेला प्राधान्य देऊनच मैदान सोडावे लागले. दीपावलीत सातारा शहरात दरवर्षी शंभर ते दीडशेच्या आसपास फटाका स्टॉल लागतात. काही वर्षांपूर्वी हे स्टॉल राजपथावर लावले जायचे. मात्र, पाच वर्षांपूर्वी येथे शॉर्टसर्किटने आग लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर येथे स्टॉल उभारणीस परवानगी द्यावी की नको, यावरही चर्चा रंगली. पालिका आणि स्टॉलधारकांमध्ये शाब्दिक वादावादीचे प्रसंगही उद्भवले. यानंतर राजपथावर स्टॉल उभारणीस मनाई करण्यात आली. यानंतर फटाके स्टॉल जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभारणीस प्रारंभ झाला. काही वर्षे येथे फटाके स्टॉल उभारणी करण्यात येत होती. मात्र, येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कागदी कचरा मोठ्या प्रमाणात साचू लागला. फटाके स्टॉलवालेही तसेच कचरा टाकून जाऊ लागल्याने आणि जिल्हा परिषदेनेही मैदान सफाईकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही दिवस कचरा तसाच पडून राहू लागला. यावर काही सामाजिक संस्थांनी आवाज उठविल्यानंतर कचरा बाजूला केला आणि यापुढील काळात मैदान फटाके स्टॉलवाल्यांना न देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला.  मात्र, जवळपास सव्वाशे ते दीडशे फटाके स्टॉल लागत असल्यामुळे येथे कागदी कचराही मोठ्या प्रमाणात जाणवतो. मात्र, यावेळी फटाका स्टॉल सैनिक स्कूलच्या मैदानावर असल्यामुळे सर्व प्रक्रिया शिस्तीत पार पडली आहे.रविवारी फटाका स्टॉल काढण्याचे काम वेगाने सुरू होते. यावेळी कोठेही कचरा दिसून आला नाही. (प्रतिनिधी)फटाका कचऱ्याची समस्या मोठीसातारा शहरात सुरुवातीच्या काळात फटाके स्टॉलची उभारणी राजवाड्यावरील गांधी मैदानावर व्हायची. मात्र, स्टॉलधारकांची संख्या वाढू लागल्यामुळे स्टॉल उभारणी तालीम संघाच्या मैदानावरही केली जायची. मात्र, दीपावली संपल्यानंतर आणि स्टॉल काढून घेतल्यानंतर येथे कचरा साचला जायचा. त्याचा त्रास पैलवान तसेच नागरिकांना होऊ लागल्यामुळे त्यांनीही विरोध केला. यानंतर हेच स्टॉल राजपथावर आले. मात्र, येथेही स्टॉलधारकांचा पिछा न सुटल्यामुळे त्यांना जिल्हा परिषद आणि त्यानंतर आता सैनिक स्कूलच्या मैदानावर फटाके स्टॉलची उभारणी केली जाऊ लागली.वर्षभराचे उत्पन्न आठच दिवसांतसातारा शहरात जवळपास दीडशेच्या आसपास स्टॉल लावले जातात. यामध्ये व्यापारी तर असतातच त्याचबरोबर काही युवक मंडळी एकत्रित येऊन स्टॉल उभारणी करतात. यातून चांगले उत्पन्न मिळते. सातारा शहरातील अनेक मंडळींचा फटाके स्टॉल उभारणीकडे कल वाढू लागला आहे. कारण आठ दिवसांत वर्षभराचे उत्पन्न मिळत असल्यामुळे अनेकजण फटाके स्टॉल उभारणीला प्राधान्य देतात. यासाठी आवश्यक असणारे परवाने काढण्यासाठीही चढाओढ असते. आठ दिवसांत वर्षभर पुरेल इतके उत्पन्न मिळत असल्यामुळे फटाके स्टॉल उभारणीला प्राधान्य देण्यात ही मंडळी आघाडीवर असते.