शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

खंडाळ्यात मास्क न वापरणाऱ्यांकडून पाऊण लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

खंडाळा : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी गावोगावी प्रशासनाकडून पुन्हा खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा ...

खंडाळा : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी गावोगावी प्रशासनाकडून पुन्हा खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा प्रसार पुन्हा हळूहळू वाढत आहे. नागरिकांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी खंडाळा शहरात भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. या भरारी पथकाच्या माध्यमातून चार दिवसांत सुमारे पाऊण लाखाची वसुली केली आहे.

कोरोनाच्या भीषण वास्तवाशी सामना करताना ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी व गावात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी लोकांवर नजर ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने भरारी पथकांची निर्मिती केली आहे. खंडाळा शहरात नगरपंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिक व वाहनचालकांवर कडक कारवाई केली जात आहे.

खंडाळा शहरात पोलीस निरीक्षक महेश इंगळे व मुख्याधिकारी योगेश डोके यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक लोकांवर नजर ठेवून विनामास्क फिरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे.

चौकट :

गर्दी टाळण्याचे आवाहन

खंडाळा शहरात बाजारपेठेत आसपासच्या गावातील नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यांनी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घ्यावी तसेच विनाकारण शहरात फिरू नये, जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने दिलेल्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.