शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

जुनं बिल मिळण्यापूर्वी अंतिम दर ठरविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:01 IST

वाठार स्टेशन : राज्यातील साखर कारखान्याचा गाळप हंगाम दि. १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु मागील वर्षीच्या गाळप हंगामात तुटून गेलेल्या उसाचा हिशोब अद्याप अपूर्ण असताना या हंगामातील अंतिम दर ठरवण्यासाठी राज्याच्या ऊस नियंत्रण मंडळाने मुंबईला बैठक आयोजित केली आहे. ऊस दरावरून सध्यातरी ‘पुढचं पाठ... मागचं सपाट,’ असं चित्र निर्माण ...

वाठार स्टेशन : राज्यातील साखर कारखान्याचा गाळप हंगाम दि. १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु मागील वर्षीच्या गाळप हंगामात तुटून गेलेल्या उसाचा हिशोब अद्याप अपूर्ण असताना या हंगामातील अंतिम दर ठरवण्यासाठी राज्याच्या ऊस नियंत्रण मंडळाने मुंबईला बैठक आयोजित केली आहे. ऊस दरावरून सध्यातरी ‘पुढचं पाठ... मागचं सपाट,’ असं चित्र निर्माण झालं असून, राज्य सरकारचं हे नवं नाटक नक्की काय आहे, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.सर्व साखर कारखान्यांनी आपले हिशोब ३१ मार्चनंतर १२० दिवसांत साखर आयुक्त पुणे यांच्याकडे देणे कायद्याने बंधनकारक आहे. असे हिशोब बहुसंख्य कारखान्यांनी अजून साखर आयुक्त कार्यालयाकडे दिलेले नसताना हे मंडळ प्रत्येक कारखान्याचा अंतिम दर कसा काय काढू शकते? हा मुख्य प्रश्न आहे. चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील अजूनही जवळपास पाच कारखान्यांनीआपली एफआरपी रक्कम पूर्ण केली नाही.असे असताना या कारखान्यांना चालू हंगामात कोणत्याही परिस्थितीत साखर आयुक्तांनी ही थकीत एफआरपी पूर्ण केल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये, अन्यथा या कारखान्याचे धुरांडे पेरून देणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे नेते शंकर गोडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.यावर्षी साखरेला मिळालेला सरासरी दर पाहिल्यास तो ३ हजार ३०० रुपये आहे. त्याचप्रमाणे उपपदार्थ बग्यास, मळी व प्रेसमढ यांचा बाजारभाव बघितला तर १२.५० रिकव्हरी असणाऱ्या कारखान्याचे महसुली उत्पन्न प्रतिटन ५ हजार२०० होते. यामधून शेतकºयांचे ७० प्रमाणे ३ हजार ६४० होतातत्यातून तोडणी वाहतूक ५५० रुपये वजा जाता ३ हजार ३० रुपयेकायद्याने शेतकºयांना अंतिम दर द्यावा लागतो.तसेच मागील वर्षी थकीत एफआरपीवर १५ टक्के व्याज धरून निघणारी रक्कम कारखान्यांना द्यावी लागणार आहे. कारखाने अजून मागची बिले देणे बाकी असताना काही मंडळी येणºया हंगामात किती दर मिळावा, याची चर्चा करत आहेत. मागील वर्षी यांनीच एफआरपी अधिक २०० असा तोडगा काढून कारखाने सुरू केले होते. त्यामुळे किमान चालू वर्षी तरी साखर आयुक्त व राज्य शासनाने याबाबत काही धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.