शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जुनं बिल मिळण्यापूर्वी अंतिम दर ठरविण्याचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:01 IST

वाठार स्टेशन : राज्यातील साखर कारखान्याचा गाळप हंगाम दि. १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु मागील वर्षीच्या गाळप हंगामात तुटून गेलेल्या उसाचा हिशोब अद्याप अपूर्ण असताना या हंगामातील अंतिम दर ठरवण्यासाठी राज्याच्या ऊस नियंत्रण मंडळाने मुंबईला बैठक आयोजित केली आहे. ऊस दरावरून सध्यातरी ‘पुढचं पाठ... मागचं सपाट,’ असं चित्र निर्माण ...

वाठार स्टेशन : राज्यातील साखर कारखान्याचा गाळप हंगाम दि. १ आॅक्टोबरपासून सुरू होत आहे. परंतु मागील वर्षीच्या गाळप हंगामात तुटून गेलेल्या उसाचा हिशोब अद्याप अपूर्ण असताना या हंगामातील अंतिम दर ठरवण्यासाठी राज्याच्या ऊस नियंत्रण मंडळाने मुंबईला बैठक आयोजित केली आहे. ऊस दरावरून सध्यातरी ‘पुढचं पाठ... मागचं सपाट,’ असं चित्र निर्माण झालं असून, राज्य सरकारचं हे नवं नाटक नक्की काय आहे, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.सर्व साखर कारखान्यांनी आपले हिशोब ३१ मार्चनंतर १२० दिवसांत साखर आयुक्त पुणे यांच्याकडे देणे कायद्याने बंधनकारक आहे. असे हिशोब बहुसंख्य कारखान्यांनी अजून साखर आयुक्त कार्यालयाकडे दिलेले नसताना हे मंडळ प्रत्येक कारखान्याचा अंतिम दर कसा काय काढू शकते? हा मुख्य प्रश्न आहे. चालू हंगामात सातारा जिल्ह्यातील अजूनही जवळपास पाच कारखान्यांनीआपली एफआरपी रक्कम पूर्ण केली नाही.असे असताना या कारखान्यांना चालू हंगामात कोणत्याही परिस्थितीत साखर आयुक्तांनी ही थकीत एफआरपी पूर्ण केल्याशिवाय गाळप परवाना देऊ नये, अन्यथा या कारखान्याचे धुरांडे पेरून देणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे नेते शंकर गोडसे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.यावर्षी साखरेला मिळालेला सरासरी दर पाहिल्यास तो ३ हजार ३०० रुपये आहे. त्याचप्रमाणे उपपदार्थ बग्यास, मळी व प्रेसमढ यांचा बाजारभाव बघितला तर १२.५० रिकव्हरी असणाऱ्या कारखान्याचे महसुली उत्पन्न प्रतिटन ५ हजार२०० होते. यामधून शेतकºयांचे ७० प्रमाणे ३ हजार ६४० होतातत्यातून तोडणी वाहतूक ५५० रुपये वजा जाता ३ हजार ३० रुपयेकायद्याने शेतकºयांना अंतिम दर द्यावा लागतो.तसेच मागील वर्षी थकीत एफआरपीवर १५ टक्के व्याज धरून निघणारी रक्कम कारखान्यांना द्यावी लागणार आहे. कारखाने अजून मागची बिले देणे बाकी असताना काही मंडळी येणºया हंगामात किती दर मिळावा, याची चर्चा करत आहेत. मागील वर्षी यांनीच एफआरपी अधिक २०० असा तोडगा काढून कारखाने सुरू केले होते. त्यामुळे किमान चालू वर्षी तरी साखर आयुक्त व राज्य शासनाने याबाबत काही धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.