शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

पन्नाशीतील महिलांकडून दहावीचा ‘सेकंड चान्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:50 IST

सातारा : जिल्ह्यातील १०४ महिलांनी ‘सेकंड चान्स’ घेतल्याचे वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या भुवया साहजिकच उंचावल्या असतील; पण खरंय, परिस्थितीमुळं शिक्षण थांबवावे लागलेल्या महिलांनी लग्न, मुलं, नातवंडं झाल्यानंतर दहावी पूर्ण

ठळक मुद्देघरकाम सांभाळून १०४ महिला परीक्षेला : इच्छा असतानाही परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावे लागले; घरी बसून टॅबवरून अभ्यास

जगदीश कोष्टी ।सातारा : जिल्ह्यातील १०४ महिलांनी ‘सेकंड चान्स’ घेतल्याचे वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या भुवया साहजिकच उंचावल्या असतील; पण खरंय, परिस्थितीमुळं शिक्षण थांबवावे लागलेल्या महिलांनी लग्न, मुलं, नातवंडं झाल्यानंतर दहावी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत त्या परीक्षा देत आहेत.

‘मुली शिकून काय करणार?’ असा विचार करून काहींच्या आई-वडिलांनी त्यांना घरी बसवलेलं होतं. तर काहींच्या बाबतीत पालकांचे छत्र हरपलेलं भावंडांची जबाबदारी अंगावर आली. त्यामुळे काम करण्यासाठी त्यांना शाळा सोडावी लागली. त्यामुळे इच्छा असूनही अनेकींना शाळा मधूनच सोडावी लागले. अशाच महिलांसाठी प्रथम शिक्षण संस्थेने शिक्षणाची पुन्हा संधी उपलब्ध करून दिली. प्रथम शिक्षण संस्थेची साताºयात शाखा आहे. या संस्थेंतर्गत ‘सेकंड चान्स प्रोग्राम’ हा उपक्रम राबविला जातो.

सातारा जिल्ह्यात सात वर्षांपासून सुरू असलेल्या या केंद्रात १६ ते ४८ वयोगटातील १०४ महिलांनी यंदा प्रवेश घेतला आहे. या संस्थेचा ९२ टक्के निकाल लागला आहे. प्रथम येणारी महिला सरासरी पन्नास ते साठ टक्के गुण मिळवत आहे.त्यांच्यातील काहीजणी गृहिणी आहेत. कोण धुणी-भांडी करत्यात तर कोण मजुरी करून संसार करत आहेत. काहींना नातवंडे झाले आहेत; पण शिक्षणाच्या ओढीने त्यांनी पुन्हा शिकण्याचा निर्णय घेतला.

सर्वसाधारणपणे पाचवीच्या पुढे शिक्षण सोडलेल्या असल्यास त्यांना थेट दहावीला प्रवेश दिला जातो. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा सतरा नंबरचा फॉर्म भरला जातो अन् दहावीच्या परीक्षेला बसविले जाते. दहावीची परीक्षापास होऊन काहीजणी एखाद्या व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत.

‘शाळा सोडून अनेक वर्षे झाली असल्याने त्यांना शिकवणे तितकेच गरजेचे आहे. हे ओळखून त्यांच्यासाठी संस्थेतर्फे दररोज शाळा भरविली जाते. गोडोलीत ही शाळा आहे. या ठिकाणी सर्वसाधारण मुलांप्रमाणेच वर्ग, बाकडे अन् फळा असतो. सर्व विषय शिकविले जातात. तज्ज्ञांकडून दहावीनंतर पुढे काय? या विषयावर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे,’ अशी माहिती केंद्रप्रमुख सोमनाथ गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.उशिरा आल्या तरीही सवलत...सर्वसाधारण शाळेत उशिरा आल्यास विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षा केल्या जातात. दहावीचं वर्ष महत्त्वाचे असल्याने मुलांना उशीर होऊ नये म्हणून पालकच विशेष काळजी घेतात. येथे येणाºया विद्यार्थिनीही या आई, आजी आहेत. त्यांच्यावर संसाराची जबाबदारी असते. ती सांभाळून येत असताना अनेकींना उशीर होतो; पण सवलतही दिली जाते.भांडणं कमी.. समजूतदारपणाच जास्तदहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये नोट्स देण्यावरून किंवा कोणत्याही किरकोळ कारणावरून भांडणं नेहमीच होतात. अनेकदा मुख्याध्यापकांपर्यंत तक्रार जाते. पालकांना बोलवावे लागते; पण येथे येणाºया विद्यार्थिनींमध्ये कमालीचा समजूतदारपणा जाणवतो. कोणी आजारी असतील तर एकमेकींना नोट्स देतात. गृहपाठ पूर्ण करून देतात.

प्रथम शिक्षण संस्थेने साताºयात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संस्थेंतर्गत ‘सेकंड चान्स प्रोग्राम’ हा उपक्रम राबविला जात आहे. 

प्रथम शिक्षण संस्थेच्या सेकंड चान्स उपक्रमात येणाºया महिलांसाठी पारंपरिक पद्धतीने शिकवले जात असले तरी पाच-सहा जणींचा गट करून टॅब घरी दिले आहेत. त्या घरी बसून टॅबवरून अभ्यास करतात.- कांचन नलावडे, शिक्षिका