शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पन्नाशीतील महिलांकडून दहावीचा ‘सेकंड चान्स’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:50 IST

सातारा : जिल्ह्यातील १०४ महिलांनी ‘सेकंड चान्स’ घेतल्याचे वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या भुवया साहजिकच उंचावल्या असतील; पण खरंय, परिस्थितीमुळं शिक्षण थांबवावे लागलेल्या महिलांनी लग्न, मुलं, नातवंडं झाल्यानंतर दहावी पूर्ण

ठळक मुद्देघरकाम सांभाळून १०४ महिला परीक्षेला : इच्छा असतानाही परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावे लागले; घरी बसून टॅबवरून अभ्यास

जगदीश कोष्टी ।सातारा : जिल्ह्यातील १०४ महिलांनी ‘सेकंड चान्स’ घेतल्याचे वाचल्यानंतर आपल्या सर्वांच्या भुवया साहजिकच उंचावल्या असतील; पण खरंय, परिस्थितीमुळं शिक्षण थांबवावे लागलेल्या महिलांनी लग्न, मुलं, नातवंडं झाल्यानंतर दहावी पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. सध्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत त्या परीक्षा देत आहेत.

‘मुली शिकून काय करणार?’ असा विचार करून काहींच्या आई-वडिलांनी त्यांना घरी बसवलेलं होतं. तर काहींच्या बाबतीत पालकांचे छत्र हरपलेलं भावंडांची जबाबदारी अंगावर आली. त्यामुळे काम करण्यासाठी त्यांना शाळा सोडावी लागली. त्यामुळे इच्छा असूनही अनेकींना शाळा मधूनच सोडावी लागले. अशाच महिलांसाठी प्रथम शिक्षण संस्थेने शिक्षणाची पुन्हा संधी उपलब्ध करून दिली. प्रथम शिक्षण संस्थेची साताºयात शाखा आहे. या संस्थेंतर्गत ‘सेकंड चान्स प्रोग्राम’ हा उपक्रम राबविला जातो.

सातारा जिल्ह्यात सात वर्षांपासून सुरू असलेल्या या केंद्रात १६ ते ४८ वयोगटातील १०४ महिलांनी यंदा प्रवेश घेतला आहे. या संस्थेचा ९२ टक्के निकाल लागला आहे. प्रथम येणारी महिला सरासरी पन्नास ते साठ टक्के गुण मिळवत आहे.त्यांच्यातील काहीजणी गृहिणी आहेत. कोण धुणी-भांडी करत्यात तर कोण मजुरी करून संसार करत आहेत. काहींना नातवंडे झाले आहेत; पण शिक्षणाच्या ओढीने त्यांनी पुन्हा शिकण्याचा निर्णय घेतला.

सर्वसाधारणपणे पाचवीच्या पुढे शिक्षण सोडलेल्या असल्यास त्यांना थेट दहावीला प्रवेश दिला जातो. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा सतरा नंबरचा फॉर्म भरला जातो अन् दहावीच्या परीक्षेला बसविले जाते. दहावीची परीक्षापास होऊन काहीजणी एखाद्या व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत.

‘शाळा सोडून अनेक वर्षे झाली असल्याने त्यांना शिकवणे तितकेच गरजेचे आहे. हे ओळखून त्यांच्यासाठी संस्थेतर्फे दररोज शाळा भरविली जाते. गोडोलीत ही शाळा आहे. या ठिकाणी सर्वसाधारण मुलांप्रमाणेच वर्ग, बाकडे अन् फळा असतो. सर्व विषय शिकविले जातात. तज्ज्ञांकडून दहावीनंतर पुढे काय? या विषयावर मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे,’ अशी माहिती केंद्रप्रमुख सोमनाथ गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.उशिरा आल्या तरीही सवलत...सर्वसाधारण शाळेत उशिरा आल्यास विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या शिक्षा केल्या जातात. दहावीचं वर्ष महत्त्वाचे असल्याने मुलांना उशीर होऊ नये म्हणून पालकच विशेष काळजी घेतात. येथे येणाºया विद्यार्थिनीही या आई, आजी आहेत. त्यांच्यावर संसाराची जबाबदारी असते. ती सांभाळून येत असताना अनेकींना उशीर होतो; पण सवलतही दिली जाते.भांडणं कमी.. समजूतदारपणाच जास्तदहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये नोट्स देण्यावरून किंवा कोणत्याही किरकोळ कारणावरून भांडणं नेहमीच होतात. अनेकदा मुख्याध्यापकांपर्यंत तक्रार जाते. पालकांना बोलवावे लागते; पण येथे येणाºया विद्यार्थिनींमध्ये कमालीचा समजूतदारपणा जाणवतो. कोणी आजारी असतील तर एकमेकींना नोट्स देतात. गृहपाठ पूर्ण करून देतात.

प्रथम शिक्षण संस्थेने साताºयात शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या संस्थेंतर्गत ‘सेकंड चान्स प्रोग्राम’ हा उपक्रम राबविला जात आहे. 

प्रथम शिक्षण संस्थेच्या सेकंड चान्स उपक्रमात येणाºया महिलांसाठी पारंपरिक पद्धतीने शिकवले जात असले तरी पाच-सहा जणींचा गट करून टॅब घरी दिले आहेत. त्या घरी बसून टॅबवरून अभ्यास करतात.- कांचन नलावडे, शिक्षिका