शहरं
Join us  
Trending Stories
1
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
2
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
3
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
4
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
5
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
6
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
7
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
8
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
9
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
10
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
11
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
12
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
13
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
14
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
15
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
16
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
17
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
18
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
19
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
20
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश

पंधरा दिवसांनंतरही दरडीचा धोका!

By admin | Updated: September 6, 2016 23:44 IST

महाबळेश्वरात माळीणची छाया : डोंगरमाथ्यावरील गावांमध्ये भीती; सांगा दरड हटविणार कधी?, संतप्त ग्रामस्थांचा सवाल

अजित जाधव-- महाबळेश्वर --अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांसह पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळा आला की नागरिकांना पाऊसपाण्यापेक्षा दरडी कोसळण्याचीच भीती अधिक असते. तालुक्यातील माचूतर गावाजवळ पंधरा दिवसांपूर्वी कोसळलेली महाकाय दरड अजून जैसे थेच आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शनिवारी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर-मेढा-सातारा मार्गावर माचूतर हे गाव आहे. हे गाव दोन भागांत वसले आहे. गावातील काही भाग रस्त्याच्या कडेला तर बराचसा भाग डोंगर उतारावर वसलेला आहे. डोंगराच्या कुशीत असलेल्या गावावर माळीण गावाप्रमाणे डोंगरकडे कोसळण्याची भीती गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिक व्यक्त करीत आहेत. दि. २२ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे व ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे डोंगरकड्याचा काही भाग रस्त्यावरच कोसळला. परिणामी गावाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला. या रस्त्याने होणारे सर्व दळणवळणही बंद पडले. सुदैवाने गावापासून काही मीटर अंतरावर ही दरड कोसळली त्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. या दरडीच्या कक्षेत गावातील काही घरे येत होती; परंतु सुदैवाने गडगडत येणाऱ्या दरडीमधील मोठमोठे दगड घरांपासून काही अंतरावर थांबल्याने मोठा अनर्थ टळला. गावाच्या माथ्यावर असलेला कडा जर कोसळला तर या कड्याखाली संपूर्ण गाव गाडले गेले असते. येथील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. माचूतर गावाजवळ दरड कोसळण्याच्या घटनेला तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला असून, प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणत्याही दरड हटविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. दरम्यान, शनिवारी प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नंदकुमार घाडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, पंचायत समितीचे माजी सभापती धोंडिराम बापू जाधव, नगरसेवक संतोष शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत घाडगे, अतुल सलागरे यांच्या समवेत घटनास्थळी भेट देऊन दरडीची पाहणी केली. यावेळी माचूतरचे सरपंच नारायण शिंदे व ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. पुनर्वसनाबाबत पाठपुरावा करू : बानुगडे‘ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे गावावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी चुकीची म्हणता येणार नाही. आपण हे निवेदन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यापर्यंत पोहोचवून ग्रामस्थांच्या भावना त्यांना कळवू व पुनर्वसना संदर्भात योग्य तो निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात येईल,’ असे आश्वासन प्रा. बानुगडे-पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.ग्रामस्थांची रात्र जागून माचूतर येथे दरड कोसळून आठवडा झाला तरी ती दरड हटविण्याची तसदी संबंधित खात्याने घेतली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्याने ग्रामस्थांना सतत दरडी कोसळण्याची भीती वाटत आहे. या भीतीपोटी गावातील लोक रात्रभर जागे राहत आहेत. कोणत्याही क्षणी दरड कोसळेल या भीतीने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.