शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा दिवसांनंतरही दरडीचा धोका!

By admin | Updated: September 6, 2016 23:44 IST

महाबळेश्वरात माळीणची छाया : डोंगरमाथ्यावरील गावांमध्ये भीती; सांगा दरड हटविणार कधी?, संतप्त ग्रामस्थांचा सवाल

अजित जाधव-- महाबळेश्वर --अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांसह पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. पावसाळा आला की नागरिकांना पाऊसपाण्यापेक्षा दरडी कोसळण्याचीच भीती अधिक असते. तालुक्यातील माचूतर गावाजवळ पंधरा दिवसांपूर्वी कोसळलेली महाकाय दरड अजून जैसे थेच आहे. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, शनिवारी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.महाबळेश्वरपासून सात किलोमीटर अंतरावर महाबळेश्वर-मेढा-सातारा मार्गावर माचूतर हे गाव आहे. हे गाव दोन भागांत वसले आहे. गावातील काही भाग रस्त्याच्या कडेला तर बराचसा भाग डोंगर उतारावर वसलेला आहे. डोंगराच्या कुशीत असलेल्या गावावर माळीण गावाप्रमाणे डोंगरकडे कोसळण्याची भीती गेल्या अनेक वर्षांपासून गावातील नागरिक व्यक्त करीत आहेत. दि. २२ आॅगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे व ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे डोंगरकड्याचा काही भाग रस्त्यावरच कोसळला. परिणामी गावाकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला. या रस्त्याने होणारे सर्व दळणवळणही बंद पडले. सुदैवाने गावापासून काही मीटर अंतरावर ही दरड कोसळली त्यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. या दरडीच्या कक्षेत गावातील काही घरे येत होती; परंतु सुदैवाने गडगडत येणाऱ्या दरडीमधील मोठमोठे दगड घरांपासून काही अंतरावर थांबल्याने मोठा अनर्थ टळला. गावाच्या माथ्यावर असलेला कडा जर कोसळला तर या कड्याखाली संपूर्ण गाव गाडले गेले असते. येथील ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली आहेत. माचूतर गावाजवळ दरड कोसळण्याच्या घटनेला तब्बल १५ दिवसांचा कालावधी उलटून गेला असून, प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणत्याही दरड हटविण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही. दरम्यान, शनिवारी प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नंदकुमार घाडगे, उपजिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे, पंचायत समितीचे माजी सभापती धोंडिराम बापू जाधव, नगरसेवक संतोष शिंदे, शिवसेनेचे तालुका प्रमुख यशवंत घाडगे, अतुल सलागरे यांच्या समवेत घटनास्थळी भेट देऊन दरडीची पाहणी केली. यावेळी माचूतरचे सरपंच नारायण शिंदे व ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन सादर केले. पुनर्वसनाबाबत पाठपुरावा करू : बानुगडे‘ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या भीतीप्रमाणे गावावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा स्थितीत गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी चुकीची म्हणता येणार नाही. आपण हे निवेदन पालकमंत्री विजय शिवतारे यांच्यापर्यंत पोहोचवून ग्रामस्थांच्या भावना त्यांना कळवू व पुनर्वसना संदर्भात योग्य तो निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात येईल,’ असे आश्वासन प्रा. बानुगडे-पाटील यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.ग्रामस्थांची रात्र जागून माचूतर येथे दरड कोसळून आठवडा झाला तरी ती दरड हटविण्याची तसदी संबंधित खात्याने घेतली नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे. कधी ऊन तर कधी पाऊस पडत असल्याने ग्रामस्थांना सतत दरडी कोसळण्याची भीती वाटत आहे. या भीतीपोटी गावातील लोक रात्रभर जागे राहत आहेत. कोणत्याही क्षणी दरड कोसळेल या भीतीने ग्रामस्थांची झोप उडाली आहे.