शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

उत्सव दिव्यांचा अन् विद्युत रोषणाईचा!

By admin | Updated: November 13, 2015 23:43 IST

जयहिंद गणेशोत्सव मंडळ : दीड हजार पणत्यांतून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश; गोंदवले, वडूथमध्येही दीपोत्सव

सातारा : आपला देश विविधतेने नटला आहे. वेगवेगळ्या जाती-धर्मांचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात काही समाजकंटक धार्मिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा येथील तेलीखड्डा परिसरातील जयहिंद ग्रुपतर्फे पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत दीपोत्सव साजरा केला.जयहिंद गणेशोत्सव मंडळाचे हे नववे वर्ष आहे. या मंडळाने आजवर त्या-त्या वर्षातील सामाजिक घटनांवर आधारित संदेश देणारे दीपोत्सव साजरा केला. हीच परंपरा या मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे. जयहिंद गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा साताऱ्यातील मानाचा पहिला गणपती मानला जातो. गणेशोत्सव काळातही मंडळ सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे.तेलीखड्डा परिसरात हिंदू, मुस्लिम, बौद्ध धर्माचे लोक एकत्र येऊन सर्व सणवार साजरे करत असतात. यंदा राष्ट्रीय एकात्मता जपणारा दीपोत्सव साजरा करण्यात आला. चाळीस बाय चाळीस फूट जागेत रांगोळी काढण्यात आली होती. एका गोल वर्तुळात चार हात एकत्र येऊन एकमेकांचे मनगट पकडून मजबूत पकड या रांगोळीतून साकारली होती. त्याखाली ‘हिंद देश के निवासी, सभीजण एक हंै...’ असा संदेश दिला होता.या दीपोत्सवासाठी दीड हजार पणत्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, मंडळाने यासाठी कोणताही खर्च केला नाही. मंडळांनी तारीख व वेळ जाहीर केली होती. त्यांनी डिझाईन तयार करून दिली होती. मात्र, परंपरेनुसार गल्लीतील सर्व घरातील महिलांनी घरातूनच पणत्या, वाती, तेल आणले होते, अशी मािहती जयहिंद ग्रुपचे अध्यक्ष बिपीन दलाल, नीलेश पंडित यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जयहिंद मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक विषयावर दिपोत्सव साजरा केला जात असल्याने तो पाहण्यासाठी सातारा शहरातील नागरिकांनी रात्री गर्दी केली होती. (प्रतिनिधी)आठ वर्षे जपली सामाजिक बांधिलकीजयहिंद मंडळाचे हे आठवे वर्ष असून, आजवर मंडळाने सामाजिक संदेश देणारे दीपोत्सव साजरे केले आहेत. यामध्ये फटाके टाळू निसर्ग सांभाळू (२००७), जोती जोतीने सूर्य बनवूया! (२००८), ग्लोबल वॉर्मिंग (२००९), पुष्पपठार (कास )वाचवा (२०१०), लेक वाचवा (२०११), भ्रष्टाचाराचे ग्रहण (२०१२), व्यर्थ न हो बलिदान - शहीद नरेंद्र दाभोलकर (२०१३), चला अमंगळातून मंगळाकडे - भारताची मंगळ यान मोहीम (२०१४) यासारखे विषय हाताळले आहेत.या वर्षीच्या दीपोत्सवातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. जयहिंद मंडळातील सर्व लहान मोठ्या कार्यकर्ते व महिलांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. ‘महावितरण’ला तीस लाखांचा ‘बोनस’सातारा : अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजेच दिवाळी. वसुबारसपासून सुरू झालेल्या दिवाळीला संपूर्ण शहर उजळून गेला आहे. शाहूनगरीला उजळून दिसण्यासाठी शहराला भर दिवसा अतिरिक्त दोन मेगावॅटचा विजेचा अधिक वापर लागला आहे. त्यातून महावितरणला लाखोंचा नफा होणार आहे. त्यामुळे वीज कंपनीला सातारकरांनी २५ ते ३० लाखांचा बोनसच आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील वसाहती, घरे, दुकानांवर विद्युत रोषणाई केली आहे. विशेष म्हणजे, इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात रात्री उशिरापर्यंत विद्युत माळा लावून ठेवलेल्या आहेत. सातारा शहराची दररोजची दिवसा सरासरी सात मेगावॅट विजेची मागणी असते. दिवाळीत ही मागणी वाढली असून, ती दोन मेगावॅटने वाढून नऊवर पोहोचली आहे. त्यामुळे या पाच दिवसांत सरासरी दहा मेगाव्हॅट विजेचा वापर झाला आहे. यातून सरासरी २५ ते ३० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.दिवाळी सणात सातारकरांच्या आनंदावर विरजन पडू नये म्हणून वीजवितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांच्या नेतृत्त्वाखाली वीजवितरण कंपनीचे कर्मचारी अहोरात्र झटत होते. त्यामुळे अखंड विद्युत पुरवठा मिळाला. (प्रतिनिधी)औद्योगिक वसाहतीतून पुरवठादिवाळीत शक्यतो औद्योगिक वसाहतीस सुटी असते. याचा फायदा घेऊन शहराची गरज भागविण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठा शहराकडे वळविण्यात आला होता. त्यामुळे शहरातील वीज वापराचा अतिरिक्त ताण वाढलेला नाही, अशी माहिती वीजवितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.