शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

उत्सव दिव्यांचा अन् विद्युत रोषणाईचा!

By admin | Updated: November 13, 2015 23:43 IST

जयहिंद गणेशोत्सव मंडळ : दीड हजार पणत्यांतून दिला राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश; गोंदवले, वडूथमध्येही दीपोत्सव

सातारा : आपला देश विविधतेने नटला आहे. वेगवेगळ्या जाती-धर्मांचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत. मात्र, अलीकडच्या काळात काही समाजकंटक धार्मिक तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा येथील तेलीखड्डा परिसरातील जयहिंद ग्रुपतर्फे पाडव्याच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत दीपोत्सव साजरा केला.जयहिंद गणेशोत्सव मंडळाचे हे नववे वर्ष आहे. या मंडळाने आजवर त्या-त्या वर्षातील सामाजिक घटनांवर आधारित संदेश देणारे दीपोत्सव साजरा केला. हीच परंपरा या मंडळाने यंदाही कायम ठेवली आहे. जयहिंद गणेशोत्सव मंडळाचा गणपती हा साताऱ्यातील मानाचा पहिला गणपती मानला जातो. गणेशोत्सव काळातही मंडळ सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे.तेलीखड्डा परिसरात हिंदू, मुस्लिम, बौद्ध धर्माचे लोक एकत्र येऊन सर्व सणवार साजरे करत असतात. यंदा राष्ट्रीय एकात्मता जपणारा दीपोत्सव साजरा करण्यात आला. चाळीस बाय चाळीस फूट जागेत रांगोळी काढण्यात आली होती. एका गोल वर्तुळात चार हात एकत्र येऊन एकमेकांचे मनगट पकडून मजबूत पकड या रांगोळीतून साकारली होती. त्याखाली ‘हिंद देश के निवासी, सभीजण एक हंै...’ असा संदेश दिला होता.या दीपोत्सवासाठी दीड हजार पणत्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, मंडळाने यासाठी कोणताही खर्च केला नाही. मंडळांनी तारीख व वेळ जाहीर केली होती. त्यांनी डिझाईन तयार करून दिली होती. मात्र, परंपरेनुसार गल्लीतील सर्व घरातील महिलांनी घरातूनच पणत्या, वाती, तेल आणले होते, अशी मािहती जयहिंद ग्रुपचे अध्यक्ष बिपीन दलाल, नीलेश पंडित यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. जयहिंद मंडळातर्फे दरवर्षी सामाजिक विषयावर दिपोत्सव साजरा केला जात असल्याने तो पाहण्यासाठी सातारा शहरातील नागरिकांनी रात्री गर्दी केली होती. (प्रतिनिधी)आठ वर्षे जपली सामाजिक बांधिलकीजयहिंद मंडळाचे हे आठवे वर्ष असून, आजवर मंडळाने सामाजिक संदेश देणारे दीपोत्सव साजरे केले आहेत. यामध्ये फटाके टाळू निसर्ग सांभाळू (२००७), जोती जोतीने सूर्य बनवूया! (२००८), ग्लोबल वॉर्मिंग (२००९), पुष्पपठार (कास )वाचवा (२०१०), लेक वाचवा (२०११), भ्रष्टाचाराचे ग्रहण (२०१२), व्यर्थ न हो बलिदान - शहीद नरेंद्र दाभोलकर (२०१३), चला अमंगळातून मंगळाकडे - भारताची मंगळ यान मोहीम (२०१४) यासारखे विषय हाताळले आहेत.या वर्षीच्या दीपोत्सवातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. जयहिंद मंडळातील सर्व लहान मोठ्या कार्यकर्ते व महिलांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. ‘महावितरण’ला तीस लाखांचा ‘बोनस’सातारा : अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजेच दिवाळी. वसुबारसपासून सुरू झालेल्या दिवाळीला संपूर्ण शहर उजळून गेला आहे. शाहूनगरीला उजळून दिसण्यासाठी शहराला भर दिवसा अतिरिक्त दोन मेगावॅटचा विजेचा अधिक वापर लागला आहे. त्यातून महावितरणला लाखोंचा नफा होणार आहे. त्यामुळे वीज कंपनीला सातारकरांनी २५ ते ३० लाखांचा बोनसच आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरातील वसाहती, घरे, दुकानांवर विद्युत रोषणाई केली आहे. विशेष म्हणजे, इलेक्ट्रॉनिकच्या दुकानात रात्री उशिरापर्यंत विद्युत माळा लावून ठेवलेल्या आहेत. सातारा शहराची दररोजची दिवसा सरासरी सात मेगावॅट विजेची मागणी असते. दिवाळीत ही मागणी वाढली असून, ती दोन मेगावॅटने वाढून नऊवर पोहोचली आहे. त्यामुळे या पाच दिवसांत सरासरी दहा मेगाव्हॅट विजेचा वापर झाला आहे. यातून सरासरी २५ ते ३० लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.दिवाळी सणात सातारकरांच्या आनंदावर विरजन पडू नये म्हणून वीजवितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांच्या नेतृत्त्वाखाली वीजवितरण कंपनीचे कर्मचारी अहोरात्र झटत होते. त्यामुळे अखंड विद्युत पुरवठा मिळाला. (प्रतिनिधी)औद्योगिक वसाहतीतून पुरवठादिवाळीत शक्यतो औद्योगिक वसाहतीस सुटी असते. याचा फायदा घेऊन शहराची गरज भागविण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील वीजपुरवठा शहराकडे वळविण्यात आला होता. त्यामुळे शहरातील वीज वापराचा अतिरिक्त ताण वाढलेला नाही, अशी माहिती वीजवितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.