शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सेंद्रिय उत्पादनांच्या वाढीला मिळतेय खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : कोरोना काळात अन्न, आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढलेली आहे. या आजाराशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खंडाळा : कोरोना काळात अन्न, आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढलेली आहे. या आजाराशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षात सकस आहार घेण्याला लोकांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरोना काळात सेंद्रिय उत्पादनांच्या वाढीला खतपाणी मिळत आहे.

कोरोनासारख्या महामारीने अवघ्या जगाला हादरवले आहे. कोरोना आजाराला बळी पडण्यापेक्षा तब्बेत चांगली राखण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. त्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा, चौरस आहार, व्यायाम, प्राणायाम या गोष्टींकडे प्रत्येकाने लक्ष दिले आहे. चौकस आहार घेताना भाजीपाला, फळभाज्या, फळे निवडताना सेंद्रिय पध्दतीने उत्पादित केलेल्या पिकांची आवर्जून निवड केली जात आहे. त्यामुळे बाजारातील सेंद्रिय व्यापारी वृत्तीला खतपाणी मिळाले आहे.

अचानक वाढलेल्या मागणीमुळे सेंद्रिय शेती क्षेत्रात व निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात आरोग्याबाबत जशी जागरूकता निर्माण झाली आहे, तशीच ती सर्व स्तरावर झाली आहे. यात पोषक अन्न घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सेंद्रिय अन्नपदार्थांना मागणी वाढली आहे. विशेषतः शहरी भागासह ग्रामीण भागातही सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांच्या उलाढालीत वाढ झाली आहे. कृषी व प्रक्रियायुक्त उत्पादने वाढल्याने सेंद्रिय उत्पादनांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

(चौकट)

भाजीपाल्याकडे लक्ष

आहारात मेथी, गवार, वांगी, बटाटा, शेपू, पालक, तांदुळजा, डेसा, मिरची यासह अन्य भाजीपाला कोणतेही रासायनिक खते व औषधे यांचा वापर न करता पिकवून तो वापरणे किंवा सेंद्रिय शेती फार्मवर जाऊन विकत घेणे, याकडे सर्वांचा कल वाढला आहे. याशिवाय केळी, पपई, पेरू, आंबा ही फळे सेंद्रिय पध्दतीने पिकवली असल्यास त्याला जादा दर देऊन विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आहारात दूध व दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत.

(कोट)

जिल्ह्यातील एकूण शेती क्षेत्राचा विचार केल्यास सेंद्रिय शेतीचे प्रमाण कमी आहे. त्यात वृद्धी झाल्यास सेंद्रिय उत्पादनांच्या बाजारात त्याचा दबदबा निर्माण होऊ शकतो. वाढते ग्राहक ही सकारात्मक बाब आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पिकांच्या उत्पादनावर भर दिला पाहिजे. त्यातून कमी जागेत व अल्प खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते.

- दत्तात्रय कचरे, कृषी अधिकारी