शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

सेंद्रिय उत्पादनांच्या वाढीला मिळतेय खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : कोरोना काळात अन्न, आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढलेली आहे. या आजाराशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खंडाळा : कोरोना काळात अन्न, आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढलेली आहे. या आजाराशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षात सकस आहार घेण्याला लोकांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरोना काळात सेंद्रिय उत्पादनांच्या वाढीला खतपाणी मिळत आहे.

कोरोनासारख्या महामारीने अवघ्या जगाला हादरवले आहे. कोरोना आजाराला बळी पडण्यापेक्षा तब्बेत चांगली राखण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. त्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा, चौरस आहार, व्यायाम, प्राणायाम या गोष्टींकडे प्रत्येकाने लक्ष दिले आहे. चौकस आहार घेताना भाजीपाला, फळभाज्या, फळे निवडताना सेंद्रिय पध्दतीने उत्पादित केलेल्या पिकांची आवर्जून निवड केली जात आहे. त्यामुळे बाजारातील सेंद्रिय व्यापारी वृत्तीला खतपाणी मिळाले आहे.

अचानक वाढलेल्या मागणीमुळे सेंद्रिय शेती क्षेत्रात व निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात आरोग्याबाबत जशी जागरूकता निर्माण झाली आहे, तशीच ती सर्व स्तरावर झाली आहे. यात पोषक अन्न घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सेंद्रिय अन्नपदार्थांना मागणी वाढली आहे. विशेषतः शहरी भागासह ग्रामीण भागातही सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांच्या उलाढालीत वाढ झाली आहे. कृषी व प्रक्रियायुक्त उत्पादने वाढल्याने सेंद्रिय उत्पादनांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

(चौकट)

भाजीपाल्याकडे लक्ष

आहारात मेथी, गवार, वांगी, बटाटा, शेपू, पालक, तांदुळजा, डेसा, मिरची यासह अन्य भाजीपाला कोणतेही रासायनिक खते व औषधे यांचा वापर न करता पिकवून तो वापरणे किंवा सेंद्रिय शेती फार्मवर जाऊन विकत घेणे, याकडे सर्वांचा कल वाढला आहे. याशिवाय केळी, पपई, पेरू, आंबा ही फळे सेंद्रिय पध्दतीने पिकवली असल्यास त्याला जादा दर देऊन विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आहारात दूध व दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत.

(कोट)

जिल्ह्यातील एकूण शेती क्षेत्राचा विचार केल्यास सेंद्रिय शेतीचे प्रमाण कमी आहे. त्यात वृद्धी झाल्यास सेंद्रिय उत्पादनांच्या बाजारात त्याचा दबदबा निर्माण होऊ शकतो. वाढते ग्राहक ही सकारात्मक बाब आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पिकांच्या उत्पादनावर भर दिला पाहिजे. त्यातून कमी जागेत व अल्प खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते.

- दत्तात्रय कचरे, कृषी अधिकारी