शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

सेंद्रिय उत्पादनांच्या वाढीला मिळतेय खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : कोरोना काळात अन्न, आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढलेली आहे. या आजाराशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खंडाळा : कोरोना काळात अन्न, आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढलेली आहे. या आजाराशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षात सकस आहार घेण्याला लोकांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरोना काळात सेंद्रिय उत्पादनांच्या वाढीला खतपाणी मिळत आहे.

कोरोनासारख्या महामारीने अवघ्या जगाला हादरवले आहे. कोरोना आजाराला बळी पडण्यापेक्षा तब्बेत चांगली राखण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. त्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा, चौरस आहार, व्यायाम, प्राणायाम या गोष्टींकडे प्रत्येकाने लक्ष दिले आहे. चौकस आहार घेताना भाजीपाला, फळभाज्या, फळे निवडताना सेंद्रिय पध्दतीने उत्पादित केलेल्या पिकांची आवर्जून निवड केली जात आहे. त्यामुळे बाजारातील सेंद्रिय व्यापारी वृत्तीला खतपाणी मिळाले आहे.

अचानक वाढलेल्या मागणीमुळे सेंद्रिय शेती क्षेत्रात व निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात आरोग्याबाबत जशी जागरूकता निर्माण झाली आहे, तशीच ती सर्व स्तरावर झाली आहे. यात पोषक अन्न घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सेंद्रिय अन्नपदार्थांना मागणी वाढली आहे. विशेषतः शहरी भागासह ग्रामीण भागातही सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांच्या उलाढालीत वाढ झाली आहे. कृषी व प्रक्रियायुक्त उत्पादने वाढल्याने सेंद्रिय उत्पादनांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

(चौकट)

भाजीपाल्याकडे लक्ष

आहारात मेथी, गवार, वांगी, बटाटा, शेपू, पालक, तांदुळजा, डेसा, मिरची यासह अन्य भाजीपाला कोणतेही रासायनिक खते व औषधे यांचा वापर न करता पिकवून तो वापरणे किंवा सेंद्रिय शेती फार्मवर जाऊन विकत घेणे, याकडे सर्वांचा कल वाढला आहे. याशिवाय केळी, पपई, पेरू, आंबा ही फळे सेंद्रिय पध्दतीने पिकवली असल्यास त्याला जादा दर देऊन विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आहारात दूध व दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत.

(कोट)

जिल्ह्यातील एकूण शेती क्षेत्राचा विचार केल्यास सेंद्रिय शेतीचे प्रमाण कमी आहे. त्यात वृद्धी झाल्यास सेंद्रिय उत्पादनांच्या बाजारात त्याचा दबदबा निर्माण होऊ शकतो. वाढते ग्राहक ही सकारात्मक बाब आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पिकांच्या उत्पादनावर भर दिला पाहिजे. त्यातून कमी जागेत व अल्प खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते.

- दत्तात्रय कचरे, कृषी अधिकारी