शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय उत्पादनांच्या वाढीला मिळतेय खतपाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : कोरोना काळात अन्न, आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढलेली आहे. या आजाराशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खंडाळा : कोरोना काळात अन्न, आहाराबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढलेली आहे. या आजाराशी सामना करण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षात सकस आहार घेण्याला लोकांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कोरोना काळात सेंद्रिय उत्पादनांच्या वाढीला खतपाणी मिळत आहे.

कोरोनासारख्या महामारीने अवघ्या जगाला हादरवले आहे. कोरोना आजाराला बळी पडण्यापेक्षा तब्बेत चांगली राखण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे. त्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढा, चौरस आहार, व्यायाम, प्राणायाम या गोष्टींकडे प्रत्येकाने लक्ष दिले आहे. चौकस आहार घेताना भाजीपाला, फळभाज्या, फळे निवडताना सेंद्रिय पध्दतीने उत्पादित केलेल्या पिकांची आवर्जून निवड केली जात आहे. त्यामुळे बाजारातील सेंद्रिय व्यापारी वृत्तीला खतपाणी मिळाले आहे.

अचानक वाढलेल्या मागणीमुळे सेंद्रिय शेती क्षेत्रात व निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यात आरोग्याबाबत जशी जागरूकता निर्माण झाली आहे, तशीच ती सर्व स्तरावर झाली आहे. यात पोषक अन्न घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे. त्याचाच परिणाम म्हणून सेंद्रिय अन्नपदार्थांना मागणी वाढली आहे. विशेषतः शहरी भागासह ग्रामीण भागातही सेंद्रिय उत्पादनांना मोठी मागणी आहे. त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांच्या उलाढालीत वाढ झाली आहे. कृषी व प्रक्रियायुक्त उत्पादने वाढल्याने सेंद्रिय उत्पादनांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

(चौकट)

भाजीपाल्याकडे लक्ष

आहारात मेथी, गवार, वांगी, बटाटा, शेपू, पालक, तांदुळजा, डेसा, मिरची यासह अन्य भाजीपाला कोणतेही रासायनिक खते व औषधे यांचा वापर न करता पिकवून तो वापरणे किंवा सेंद्रिय शेती फार्मवर जाऊन विकत घेणे, याकडे सर्वांचा कल वाढला आहे. याशिवाय केळी, पपई, पेरू, आंबा ही फळे सेंद्रिय पध्दतीने पिकवली असल्यास त्याला जादा दर देऊन विकत घेण्याचे प्रमाण वाढले आहे. आहारात दूध व दुधाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत.

(कोट)

जिल्ह्यातील एकूण शेती क्षेत्राचा विचार केल्यास सेंद्रिय शेतीचे प्रमाण कमी आहे. त्यात वृद्धी झाल्यास सेंद्रिय उत्पादनांच्या बाजारात त्याचा दबदबा निर्माण होऊ शकतो. वाढते ग्राहक ही सकारात्मक बाब आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पिकांच्या उत्पादनावर भर दिला पाहिजे. त्यातून कमी जागेत व अल्प खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकते.

- दत्तात्रय कचरे, कृषी अधिकारी