शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

७६१ शाळांसाठी कुंपणभिंत; २६१ खोल्यांची दुरुस्ती..

By admin | Updated: November 25, 2015 23:59 IST

माणिकराव सोनवलकर : ‘प्राथमिक’साठी साडेबावन्न कोटी हवेत.

फलटण : ‘सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांसाठी ४१९ जादा वर्ग खोल्या, ७६१ शाळांसाठी कुंपणभिंत आणि २६१ वर्ग खोल्यांची दुरुस्ती यासाठी ५२ कोटी ६७ लाख ५० हजारांची आवश्यकता असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. शासनाने त्यासाठी पुरेशी तरतूद करावी,’ अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी केली. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांकडे २७९१ प्राथमिक शाळा असून, त्यापैकी ५९ शाळांना इमारती नाहीत. उर्वरित सर्व शाळांसाठी मिळून ८८९० वर्ग खोल्या उपलब्ध आहेत. ४१९ वर्ग खोल्या कमी असल्याने त्यांच्या बांधकामासाठी प्रत्येकी ६ लाख ५० हजार याप्रमाणे २७ कोटी २३ लाख ५० हजारांची आवश्यकता आहे.जावळी ७२, कऱ्हाड ११७, खंडाळा २१, खटाव १४, कोरेगाव १०, महाबळेश्वर ११, माण ३६, पाटण ५०, फलटण ३४, सातारा ३९ आणि वाई १५ याप्रमाणे ४१९ वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे जावळी १९, कऱ्हाड १७, खंडाळा ३, खटाव ६, कोरेगाव ५, महाबळेश्वर ३४, माण ८, पाटण ३१, फलटण १३, सातारा १५ आणि वाई १ याप्रमाणे १५२ प्राथमिक शाळांमधील २६१ शाळा खोल्यांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे २ कोटी ६१ लाखांची आवश्यकता असल्याचे सोनवलकर यांनी निदर्शनास आणून दिले.जावळी ६२, कऱ्हाड ३९, खंडाळा ११, खटाव ९१, कोरेगाव २९, महाबळेश्वर ३३, माण १४०, पाटण १२३, फलटण १७३, सातारा ५८, वाई २ याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील ७६१ प्राथमिक शाळांना कुंपणभिंतींची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला ५० मीटर कुंपणभिंत आवश्यक असल्याचे गृहित धरले तर प्रत्येक मीटरसाठी ६ हजार रुपये याप्रमाणे या सर्व ७६१ प्राथमिक शाळांना कुंपणभिंत बांधण्यासाठी २२ कोटी ८३ लाखांची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी) केंद्राकडून निधी उपलब्ध होत नाही...जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून प्राथमिक शाळा खोल्यांची दुरुस्ती आणि प्राथमिक शाळांना कुंपणभिंत घालण्यासाठी यापूर्वी ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सेसमधून २३ लाख २१ हजार रुपये उपलब्ध झाल्याचे निदर्शनास आणून देतानाच प्राथमिक शिक्षणासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून निधी सध्या उपलब्ध होत नाही. तथापि, प्राथमिक शाळा वर्ग खोल्यांची दुरुस्ती व धोकादायक शाळा खोल्यांच्या जागी नवीन इमारती तातडीने उभारणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने यासाठी पुरेशी तरतूद करावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी केली आहे.