शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

७६१ शाळांसाठी कुंपणभिंत; २६१ खोल्यांची दुरुस्ती..

By admin | Updated: November 25, 2015 23:59 IST

माणिकराव सोनवलकर : ‘प्राथमिक’साठी साडेबावन्न कोटी हवेत.

फलटण : ‘सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळांसाठी ४१९ जादा वर्ग खोल्या, ७६१ शाळांसाठी कुंपणभिंत आणि २६१ वर्ग खोल्यांची दुरुस्ती यासाठी ५२ कोटी ६७ लाख ५० हजारांची आवश्यकता असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे. शासनाने त्यासाठी पुरेशी तरतूद करावी,’ अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी केली. सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांकडे २७९१ प्राथमिक शाळा असून, त्यापैकी ५९ शाळांना इमारती नाहीत. उर्वरित सर्व शाळांसाठी मिळून ८८९० वर्ग खोल्या उपलब्ध आहेत. ४१९ वर्ग खोल्या कमी असल्याने त्यांच्या बांधकामासाठी प्रत्येकी ६ लाख ५० हजार याप्रमाणे २७ कोटी २३ लाख ५० हजारांची आवश्यकता आहे.जावळी ७२, कऱ्हाड ११७, खंडाळा २१, खटाव १४, कोरेगाव १०, महाबळेश्वर ११, माण ३६, पाटण ५०, फलटण ३४, सातारा ३९ आणि वाई १५ याप्रमाणे ४१९ वर्ग खोल्यांची आवश्यकता आहे. त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे जावळी १९, कऱ्हाड १७, खंडाळा ३, खटाव ६, कोरेगाव ५, महाबळेश्वर ३४, माण ८, पाटण ३१, फलटण १३, सातारा १५ आणि वाई १ याप्रमाणे १५२ प्राथमिक शाळांमधील २६१ शाळा खोल्यांची मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकी १ लाख रुपयांप्रमाणे २ कोटी ६१ लाखांची आवश्यकता असल्याचे सोनवलकर यांनी निदर्शनास आणून दिले.जावळी ६२, कऱ्हाड ३९, खंडाळा ११, खटाव ९१, कोरेगाव २९, महाबळेश्वर ३३, माण १४०, पाटण १२३, फलटण १७३, सातारा ५८, वाई २ याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील ७६१ प्राथमिक शाळांना कुंपणभिंतींची आवश्यकता आहे. त्यासाठी प्रत्येक शाळेला ५० मीटर कुंपणभिंत आवश्यक असल्याचे गृहित धरले तर प्रत्येक मीटरसाठी ६ हजार रुपये याप्रमाणे या सर्व ७६१ प्राथमिक शाळांना कुंपणभिंत बांधण्यासाठी २२ कोटी ८३ लाखांची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी) केंद्राकडून निधी उपलब्ध होत नाही...जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून प्राथमिक शाळा खोल्यांची दुरुस्ती आणि प्राथमिक शाळांना कुंपणभिंत घालण्यासाठी यापूर्वी ३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा परिषद सेसमधून २३ लाख २१ हजार रुपये उपलब्ध झाल्याचे निदर्शनास आणून देतानाच प्राथमिक शिक्षणासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत केंद्र शासनाकडून निधी सध्या उपलब्ध होत नाही. तथापि, प्राथमिक शाळा वर्ग खोल्यांची दुरुस्ती व धोकादायक शाळा खोल्यांच्या जागी नवीन इमारती तातडीने उभारणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने यासाठी पुरेशी तरतूद करावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी केली आहे.