शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

संवर्धनात्मकतेवर भर देणारी अनुभूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 04:38 IST

महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित दुसरे अखिल भारतीय व ३२वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन क-हाड येथे २३ व २४ नोव्हेंबरला उत्साहात पार पडले.

- संजय करकरे ।महाराष्ट्र पक्षीमित्र संयोजित दुसरे अखिल भारतीय व ३२वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन क-हाड येथे २३ व २४ नोव्हेंबरला उत्साहात पार पडले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पक्षीप्रेमींची ही मांदियाळी येथून खूप काही माहितीचा संग्रह करून आपापल्या प्रांतात परत गेली. केवळ संशोधनात्मक अनुभव सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती संवर्धनात्मकेवर अधिक भर देण्याची एक अनुभूती या संमेलनात जाणवली, ही पक्षीप्रेमींबरोबरच निसर्गप्रेमींसाठी मोठी अभिमानाची बाब म्हणता येईल.कोणतेही संमेलन, मेळावा म्हटला की, मोठी तयारी, थाटमाट, संयोजन हे आलेच. हे तर राज्यभरातील पक्षीप्रेमींना एकत्र करणारे, विचारांचे, अनुभवांचे आदानप्रदान करणारे संमेलन होते. काही अपवाद वगळता सतत ३२ वर्षे हे संमेलन आयोजित होत आहे. १९८२ साली सुरू झालेला हा यज्ञ आजही मोठ्या तेजाने सुरू आहे. ज्येष्ठ पक्षी अभ्यासकांची फौज आता थकली आहे. त्यामुळे हा सर्व पसारा नव्या दमाच्या पक्षीप्रेमींकडे आला असल्याचे लक्षात येत आहे. कºहाड येथील संमेलनात याचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. किशोर रिठेंसारख्या नव्या दमाच्या, दीर्घ अनुभवाच्या वन्यजीव अभ्यासकाकडे संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा गेल्यावर तर ते अधिक ठळकपणाने जाणवले. रिठे यांनी पक्षी संवर्धनातील नेमक्या बाबींवर बोट ठेवले. केवळ ढीगभर पक्षी संवर्धनाचे अहवाल प्रसिद्ध करण्यापेक्षा ते अधिक लोकाभिमुख होण्याची गरज त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. संशोधन निबंधामुळे पक्षी प्रजाती वाचतील अथवा त्यांचे संवर्धन होईल, या भ्रमात न राहण्याचा सल्लाही त्यांनी आपल्या भाषणात दिला.पक्षीशास्त्र आता अत्यंत प्रगत होत चालले आहे. केवळ पारंपरिक पक्षीनिरीक्षणापुरते न राहता, ते आता मोबाइल अ‍ॅप, इबर्ड, कॉमन बर्डपासून विविध मॉनिटरिंगपर्यंत विस्तारत चालले आहे. पक्ष्यांना कडी लावणे आता मागे पडून ‘पीटीटी’पर्यंत विस्तारत आहे. शास्त्रीय निरीक्षणांच्या या जोडीलाच संवर्धन, सिटिझन, सायन्सची भक्कम बाजू मिळत आहे. त्यामुळे येणाºया काळात त्याचे महत्त्व अधिक वाढत जाणार आहे.देशात केवळ महाराष्टÑात दरवर्षी नियमितपणे पक्ष्यांची अशी संमेलने भरत आहेत. त्याहून पुढे जाऊन त्यात प्रादेशिक संमेलनांची भर पडत आहे. भाऊ काटदरे, डॉ. जयंत वडतकर, डॉ. राजू कसंबेंसह अनेक जणांचा चमू या प्रादेशिक संमेलनाच्या बाजूने उभा राहत असून, त्या संमेलनांची उंची गाठण्यासाठी प्रयत्नशील आहे. कराड जिमखान्याचे पदाधिकारी सुधीर एकांडे, नाना खामकर, हेमंत केंगळे, रोहन भाटे, पापा पाटील यांच्यासह अनेकांचे संमेलनाच्या उत्तम आयोजनासाठी सहकार्य लाभले.वर्धा येथील ज्येष्ठ पक्षी अभ्यासक प्रा. किशोर वानखडे व दिलीप वरखडे यांनी वर्धा ते कºहाडदरम्यान सायकल रॅली काढून एक नवा पायंडा पाडला. पक्षीमित्रांनी सायकलने भटकंती करून पक्ष्यांच्या अधिवास प्रदूषणमुक्त करावा, यासाठी त्यांनी ही सायकलयात्रा काढली होती.गेल्या काही दिवसांपूर्वी पांढरकवड्यात झालेल्या टी १ या वाघिणीच्या मृत्यूबद्दल या संमेलनात विचार मांडले गेले, ते वनखात्याचे धडाडीचे अधिकारी सुनील लिमये यांच्याकडून. लिमये उद्घाटन सत्रासोबतच दुसºया दिवशीही संमेलनात उपस्थित राहिले. त्यांनी या वेळी खास त्यांच्या शैलीत मनमोकळेपणे या वाघिणीबद्दलची वनविभागाची भूमिका स्पष्ट मांडली. केवळ वाघच नाही, तर माळढोक पक्ष्याबद्दल वनविभागाने काय केले, हेही त्यांनी सांगितले.(सहायक संचालक, बीएनएचएस, नागपूर.)