शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

संताप.. दोन घोट अन् जीवनाचा खेळ खल्लास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:47 IST

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कुटुंबातील विसंवाद, अपेक्षाभंग अन् वाढत चाललेल्या बेकारीमुळे गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६४ जणांनी स्वत:च्या जीवनाला कंटाळून विष घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विष प्राशन केलेल्यामध्ये बळीचे प्रमाण १४ असले तरी दिवसेंदिवस विष प्राशन करणाºयांचे प्रमाण वाढल्याने समाजासाठी हे घातक ठरत आहे.आत्महत्या करणेही ...

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कुटुंबातील विसंवाद, अपेक्षाभंग अन् वाढत चाललेल्या बेकारीमुळे गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६४ जणांनी स्वत:च्या जीवनाला कंटाळून विष घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विष प्राशन केलेल्यामध्ये बळीचे प्रमाण १४ असले तरी दिवसेंदिवस विष प्राशन करणाºयांचे प्रमाण वाढल्याने समाजासाठी हे घातक ठरत आहे.आत्महत्या करणेही गुन्हा समजला जातो. मात्र, अगोदरच मानसिक संतुलन बिघडून जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याने पोलिस अशा व्यक्तींचा सहानुभूतीने विचार करतात. पुन्हा गुन्हा दाखल करून त्याला समस्येच्या गर्तेत टाकण्यापेक्षा त्याचे समुपदेशन केलेले बरे. असे समजून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तींवर गांभीर्याने गुन्हा दाखल केला जात नाही. मात्र, तरीही याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांची नोंदवही पाहिल्यानंतर समाजातील विदारक चित्र डोळ्यासमोर येते. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ६४ जणांनी विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील काहीजणांनी मृत्यूवर मात केली तर १४ जणांना मृत्यूनेकवटाळले.विषारी औषध प्राशन केल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले जाते. या ठिकाणी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीचा जबाब घेतला जातो. मात्र, या जबाबामध्ये खरे कारण पुढे येत नाही, हे पोलिसांनाही माहित असते. मात्र, जो रुग्ण सांगेल तो जबाब पोलिसांना घ्यावा लागतो. यातील बरेच जण चुकून तर काहीजण घरातल्यांना भीती दाखविण्यासाठी विषारी औषध घेतले असल्याचे सांगतात. तर काहीजण नोकरी आणि कौटुंबिक कलहातून जीवनाला कंटाळलेले असतात. अलीकडच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हेप्रमाण वाढले असल्याचे पोलिसांच्या डायरीतून नोंदीवरून दिसून येतआहे.किटकनाशक किंवा झोपेच्या गोळ्याशेतात फवारण्यासाठी आणि घरात झुरळांसाठी आणलेले किटकनाशक आत्महत्या करण्यासाठी प्राशन केले जाते. तसेच झोपेच्या जादा गोळ्याही घेतल्या जातात. मात्र, विषाचे प्रमाण जास्त झाल्यानंतरच मृत्यू होतो. रुग्णालयात तातडीने रुग्णाला आणल्यास यातून जीव वाचलेल्यांचे प्रमाणजास्त आहे.