शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

संताप.. दोन घोट अन् जीवनाचा खेळ खल्लास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:47 IST

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कुटुंबातील विसंवाद, अपेक्षाभंग अन् वाढत चाललेल्या बेकारीमुळे गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६४ जणांनी स्वत:च्या जीवनाला कंटाळून विष घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विष प्राशन केलेल्यामध्ये बळीचे प्रमाण १४ असले तरी दिवसेंदिवस विष प्राशन करणाºयांचे प्रमाण वाढल्याने समाजासाठी हे घातक ठरत आहे.आत्महत्या करणेही ...

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कुटुंबातील विसंवाद, अपेक्षाभंग अन् वाढत चाललेल्या बेकारीमुळे गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६४ जणांनी स्वत:च्या जीवनाला कंटाळून विष घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विष प्राशन केलेल्यामध्ये बळीचे प्रमाण १४ असले तरी दिवसेंदिवस विष प्राशन करणाºयांचे प्रमाण वाढल्याने समाजासाठी हे घातक ठरत आहे.आत्महत्या करणेही गुन्हा समजला जातो. मात्र, अगोदरच मानसिक संतुलन बिघडून जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याने पोलिस अशा व्यक्तींचा सहानुभूतीने विचार करतात. पुन्हा गुन्हा दाखल करून त्याला समस्येच्या गर्तेत टाकण्यापेक्षा त्याचे समुपदेशन केलेले बरे. असे समजून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तींवर गांभीर्याने गुन्हा दाखल केला जात नाही. मात्र, तरीही याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांची नोंदवही पाहिल्यानंतर समाजातील विदारक चित्र डोळ्यासमोर येते. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ६४ जणांनी विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील काहीजणांनी मृत्यूवर मात केली तर १४ जणांना मृत्यूनेकवटाळले.विषारी औषध प्राशन केल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले जाते. या ठिकाणी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीचा जबाब घेतला जातो. मात्र, या जबाबामध्ये खरे कारण पुढे येत नाही, हे पोलिसांनाही माहित असते. मात्र, जो रुग्ण सांगेल तो जबाब पोलिसांना घ्यावा लागतो. यातील बरेच जण चुकून तर काहीजण घरातल्यांना भीती दाखविण्यासाठी विषारी औषध घेतले असल्याचे सांगतात. तर काहीजण नोकरी आणि कौटुंबिक कलहातून जीवनाला कंटाळलेले असतात. अलीकडच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हेप्रमाण वाढले असल्याचे पोलिसांच्या डायरीतून नोंदीवरून दिसून येतआहे.किटकनाशक किंवा झोपेच्या गोळ्याशेतात फवारण्यासाठी आणि घरात झुरळांसाठी आणलेले किटकनाशक आत्महत्या करण्यासाठी प्राशन केले जाते. तसेच झोपेच्या जादा गोळ्याही घेतल्या जातात. मात्र, विषाचे प्रमाण जास्त झाल्यानंतरच मृत्यू होतो. रुग्णालयात तातडीने रुग्णाला आणल्यास यातून जीव वाचलेल्यांचे प्रमाणजास्त आहे.