शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

संताप.. दोन घोट अन् जीवनाचा खेळ खल्लास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:47 IST

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कुटुंबातील विसंवाद, अपेक्षाभंग अन् वाढत चाललेल्या बेकारीमुळे गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६४ जणांनी स्वत:च्या जीवनाला कंटाळून विष घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विष प्राशन केलेल्यामध्ये बळीचे प्रमाण १४ असले तरी दिवसेंदिवस विष प्राशन करणाºयांचे प्रमाण वाढल्याने समाजासाठी हे घातक ठरत आहे.आत्महत्या करणेही ...

दत्ता यादव।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : कुटुंबातील विसंवाद, अपेक्षाभंग अन् वाढत चाललेल्या बेकारीमुळे गेल्या सहा महिन्यांत जिल्ह्यात तब्बल ६४ जणांनी स्वत:च्या जीवनाला कंटाळून विष घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या विष प्राशन केलेल्यामध्ये बळीचे प्रमाण १४ असले तरी दिवसेंदिवस विष प्राशन करणाºयांचे प्रमाण वाढल्याने समाजासाठी हे घातक ठरत आहे.आत्महत्या करणेही गुन्हा समजला जातो. मात्र, अगोदरच मानसिक संतुलन बिघडून जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याने पोलिस अशा व्यक्तींचा सहानुभूतीने विचार करतात. पुन्हा गुन्हा दाखल करून त्याला समस्येच्या गर्तेत टाकण्यापेक्षा त्याचे समुपदेशन केलेले बरे. असे समजून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तींवर गांभीर्याने गुन्हा दाखल केला जात नाही. मात्र, तरीही याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांची नोंदवही पाहिल्यानंतर समाजातील विदारक चित्र डोळ्यासमोर येते. गेल्या सहा महिन्यांत तब्बल ६४ जणांनी विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील काहीजणांनी मृत्यूवर मात केली तर १४ जणांना मृत्यूनेकवटाळले.विषारी औषध प्राशन केल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले जाते. या ठिकाणी पोलिसांकडून संबंधित व्यक्तीचा जबाब घेतला जातो. मात्र, या जबाबामध्ये खरे कारण पुढे येत नाही, हे पोलिसांनाही माहित असते. मात्र, जो रुग्ण सांगेल तो जबाब पोलिसांना घ्यावा लागतो. यातील बरेच जण चुकून तर काहीजण घरातल्यांना भीती दाखविण्यासाठी विषारी औषध घेतले असल्याचे सांगतात. तर काहीजण नोकरी आणि कौटुंबिक कलहातून जीवनाला कंटाळलेले असतात. अलीकडच्या धकाधकीच्या जीवनामध्ये हेप्रमाण वाढले असल्याचे पोलिसांच्या डायरीतून नोंदीवरून दिसून येतआहे.किटकनाशक किंवा झोपेच्या गोळ्याशेतात फवारण्यासाठी आणि घरात झुरळांसाठी आणलेले किटकनाशक आत्महत्या करण्यासाठी प्राशन केले जाते. तसेच झोपेच्या जादा गोळ्याही घेतल्या जातात. मात्र, विषाचे प्रमाण जास्त झाल्यानंतरच मृत्यू होतो. रुग्णालयात तातडीने रुग्णाला आणल्यास यातून जीव वाचलेल्यांचे प्रमाणजास्त आहे.