शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Maharashtra कामगार नैराश्येत : नोकरी जाण्याची भीती सतावतेय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 22:58 IST

सरकारने मोठ्या घोषणा करून उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका उद्योजक करत आहेत. भविष्य निर्वाह निधीपैकी काही रक्कम केंद्र सरकार भरणार असले तरी त्यासाठी १५ हजार रुपये पगाराची मर्यादा दिली असल्याने अनेक उद्योजकांना

ठळक मुद्देखासगी कंपन्यांमधील कामगारांची व्यथा; ‘ईएसआयसी’मधून कामगारांना मदत

सागर गुजर ।सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे व्यवसाय, उद्योगांचं कंबरडं मोडलंय. अल्प मोबदल्यात दुकानांमध्ये पडेल ते काम करणाऱ्या कामगारांना काम थांबल्याने हातातोंडाचा मेळ घालता येईना. तर नोकरीच्या भरवशावर डोक्यावर कर्ज करून घेतलेल्या खासगी नोकरदारांना तर नोकरी जाण्याच्या भीतीने नैराश्यात लोटले आहे.

सातारा जिल्ह्यात काही मोजक्या मोठ्या कंपन्या सोडल्या तर छोटे उद्योगच मोठ्या प्रमाणावर आहेत. शासनाच्या पॅकेजचा त्यांना फायदा होणार नसल्याच्या तक्रारी आहेत. सातारा औद्योगिक वसाहतीमधील ४०० उद्योग पूर्ववत सुरू झाले आहेत; परंतु त्यामध्ये मोजक्याच कामगारांना कामावर बोलावण्यात आले आहे. बाकीचे कामगार आपल्याला कधी कामावर बोलावणार, या प्रतीक्षेत आहेत.

सरकारने मोठ्या घोषणा करून उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका उद्योजक करत आहेत. भविष्य निर्वाह निधीपैकी काही रक्कम केंद्र सरकार भरणार असले तरी त्यासाठी १५ हजार रुपये पगाराची मर्यादा दिली असल्याने अनेक उद्योजकांना या पॅकेजचा फायदा होणार नाही. इन्कम टॅक्स भरण्यासाठी काही महिने सवलत देण्याऐवजी हा कर यंदाच्या वर्षासाठी माफ करायला हवा होता, अशी उद्योजक मागणी करत आहेत. ‘ईएसआयसी’कडे कामगार आणि कंपन्यांचा मोठा पैसा पडून आहे. सध्याच्या महामारीत सरकारने कामगारांच्या पगारासाठी हा पैसा वापरला नाही. एका बाजूला उद्योग बंद झालेत तर कामगारांचा पगार करणे, ही नैतिक जबाबदारी असल्याचे मनात ठेवून अनेक उद्योजकांनी कामगारांचे पगार केले. मात्र अनेकांनी अर्धे पगार दिले.

ईएसआयसीच्या माध्यमातून नोकरी गमावलेल्या कामगारांना पुढील सहा महिने ८० टक्के पगार देता येतो, आता नोकºया जाण्याच्या राहिलेल्या नाहीत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर ईएसआयसीमधून कामगारांना मदत करण्याची मागणी आहे. दुसरीकडे कापड दुकाने, हार्डवेअर, बुक स्टोअर्स आदी दुकाने बंद असल्याने त्यांचे काम थांबले आहे. तर मोठे भांडवल गुंतवणाºया व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. शासनाने या लोकांना विशेष पॅकेज जाहीर करणे सध्याच्या घडीला अत्यावश्यक आहे.

शासनाने भूमिका बदलल्याने चिंतेत भरखासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना कामगारांना पूर्ण पगार देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते; परंतु हे आदेश आता मागे घेतले गेल्याने कामगारांची असुरक्षितता वाढलेली आहे. ईएसआयसी, भविष्य निर्वाह निधीकडे मोठा निधी पडून आहे. सध्याचा काळ कामगारांच्या कुटुंब वाचविण्याचा काळ आहे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कामगारांना मदत करण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत.

 

कंपनीने दोन महिने निम्मा पगार दिला आहे. या पगारात घरभाडे आणि किराणा साहित्य भागत आहे. कोरोनाचा लॉकडाऊन वाढतच चालला असल्यानं हा पगार तरी मिळेल का? मग घर कसं चालवायचं, ही भीतीवाटत आहे.- संदीप शेलार, औद्योगिक वसाहत, कामगार

 

टॅग्स :jobनोकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस