शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

Coronavirus in Maharashtra कामगार नैराश्येत : नोकरी जाण्याची भीती सतावतेय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 22:58 IST

सरकारने मोठ्या घोषणा करून उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका उद्योजक करत आहेत. भविष्य निर्वाह निधीपैकी काही रक्कम केंद्र सरकार भरणार असले तरी त्यासाठी १५ हजार रुपये पगाराची मर्यादा दिली असल्याने अनेक उद्योजकांना

ठळक मुद्देखासगी कंपन्यांमधील कामगारांची व्यथा; ‘ईएसआयसी’मधून कामगारांना मदत

सागर गुजर ।सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे व्यवसाय, उद्योगांचं कंबरडं मोडलंय. अल्प मोबदल्यात दुकानांमध्ये पडेल ते काम करणाऱ्या कामगारांना काम थांबल्याने हातातोंडाचा मेळ घालता येईना. तर नोकरीच्या भरवशावर डोक्यावर कर्ज करून घेतलेल्या खासगी नोकरदारांना तर नोकरी जाण्याच्या भीतीने नैराश्यात लोटले आहे.

सातारा जिल्ह्यात काही मोजक्या मोठ्या कंपन्या सोडल्या तर छोटे उद्योगच मोठ्या प्रमाणावर आहेत. शासनाच्या पॅकेजचा त्यांना फायदा होणार नसल्याच्या तक्रारी आहेत. सातारा औद्योगिक वसाहतीमधील ४०० उद्योग पूर्ववत सुरू झाले आहेत; परंतु त्यामध्ये मोजक्याच कामगारांना कामावर बोलावण्यात आले आहे. बाकीचे कामगार आपल्याला कधी कामावर बोलावणार, या प्रतीक्षेत आहेत.

सरकारने मोठ्या घोषणा करून उद्योजकांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका उद्योजक करत आहेत. भविष्य निर्वाह निधीपैकी काही रक्कम केंद्र सरकार भरणार असले तरी त्यासाठी १५ हजार रुपये पगाराची मर्यादा दिली असल्याने अनेक उद्योजकांना या पॅकेजचा फायदा होणार नाही. इन्कम टॅक्स भरण्यासाठी काही महिने सवलत देण्याऐवजी हा कर यंदाच्या वर्षासाठी माफ करायला हवा होता, अशी उद्योजक मागणी करत आहेत. ‘ईएसआयसी’कडे कामगार आणि कंपन्यांचा मोठा पैसा पडून आहे. सध्याच्या महामारीत सरकारने कामगारांच्या पगारासाठी हा पैसा वापरला नाही. एका बाजूला उद्योग बंद झालेत तर कामगारांचा पगार करणे, ही नैतिक जबाबदारी असल्याचे मनात ठेवून अनेक उद्योजकांनी कामगारांचे पगार केले. मात्र अनेकांनी अर्धे पगार दिले.

ईएसआयसीच्या माध्यमातून नोकरी गमावलेल्या कामगारांना पुढील सहा महिने ८० टक्के पगार देता येतो, आता नोकºया जाण्याच्या राहिलेल्या नाहीत, त्यामुळे सरकारने लवकरात लवकर ईएसआयसीमधून कामगारांना मदत करण्याची मागणी आहे. दुसरीकडे कापड दुकाने, हार्डवेअर, बुक स्टोअर्स आदी दुकाने बंद असल्याने त्यांचे काम थांबले आहे. तर मोठे भांडवल गुंतवणाºया व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहेत. शासनाने या लोकांना विशेष पॅकेज जाहीर करणे सध्याच्या घडीला अत्यावश्यक आहे.

शासनाने भूमिका बदलल्याने चिंतेत भरखासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना कामगारांना पूर्ण पगार देण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते; परंतु हे आदेश आता मागे घेतले गेल्याने कामगारांची असुरक्षितता वाढलेली आहे. ईएसआयसी, भविष्य निर्वाह निधीकडे मोठा निधी पडून आहे. सध्याचा काळ कामगारांच्या कुटुंब वाचविण्याचा काळ आहे. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून कामगारांना मदत करण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवेत.

 

कंपनीने दोन महिने निम्मा पगार दिला आहे. या पगारात घरभाडे आणि किराणा साहित्य भागत आहे. कोरोनाचा लॉकडाऊन वाढतच चालला असल्यानं हा पगार तरी मिळेल का? मग घर कसं चालवायचं, ही भीतीवाटत आहे.- संदीप शेलार, औद्योगिक वसाहत, कामगार

 

टॅग्स :jobनोकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस