शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

डोक्यावर भीतीचा दगड

By admin | Updated: July 5, 2016 00:29 IST

घराच्या भिंतीला भगदाड : अजिंक्यतारा किल्ल्यावरून कोसळतायत दगडी-- आॅन दि स्पॉट रिपोर्ट

सचिन काकडे -- सातारा --अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर सध्या नैसर्गिक संकट ओढावले आहे. डोंगरावर असलेली कैक टन वजनाची दगडी खाली कोसळू लागली आहे. याचा प्रत्यय येथील नागरिकांनी आता येऊ लागला आहे. रविवारी सायंकाळी सुमारे एक ते दीड टन वजनाचा भला मोठा दगड किल्ल्यावरून थेट एका घराच्या भिंतीवर येऊन आदळला. ही धडक एवढी मोठी होती की, भिंतीला मोठे भगदाड पडले तर घरालाही भेगा पडल्या.अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक वसाहती वसल्या आहेत. गेल्या २० ते २५ वर्षांपासून याठिकाणी नागरिकांचे वास्तव्य आहे. या डोंगरावर गेल्या अनेक वर्षांपासून कैक टन वजनाची दगडी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. पावसाळा आला की नागरिकांना पाऊस-पाण्यापेक्षा दगडी कोसळण्याचीच अधिक भीती असते. रविवारी सायंकाळच्या सुमारास येथे राहणाऱ्या रमेश गुजाबा शेंडे यांच्या घरावर अचानक सुमारे दीड टन वजनाचा भला मोठा दगड येऊन कोसळला. सुदैवाने घरात कोणीही नसल्याचे मोठा अनर्थ टळला. मात्र, शेंडे यांच्या घराच्या भिंतीला भले मोठे भगदाड पडले. तसेच घराला भेगाही पडल्या. यामध्ये शेंडे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ही घटना समोर येताच परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाळी. घराच्या भिंतीवर आदळलेला दगड पाहून लहान मुलांसह अनेकांचे चेहरे भीतीने भेदरले. किल्ल्यावरील दगडांची नागरिकांच्या मनात किती भीती आहे, हे प्रत्येकाचे चेहरे सांगत होते. भयभित अवस्थेत अनेकांनी रात्र जागून काढली. भिंत बांधा.. अथवा दगडी तरी फोडा !पावसाळा सुरू झाला की पाण्यामुळे दगडाखाली असलेल्या मातीचे वहन होते. यामुळे छोटी-मोठी दगडी किल्ल्यावरून खाली कोसळतात. उतारामुळे कोसळलेल्या दगडाचा वेगही वाढतो. झाडांमुळे हा वेग काही प्रमाणात मंदावत असला तरी धोका मात्र टळत नाही. आजपर्यंत अनेकदा या ठिकाणी अशा प्रकारच्या लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत. हा धोका टाळण्यासाठी वसाहतींच्या वरील बाजूस संरक्षक भिंत बांधावी, अथवा मोठ-मोठाली दगडी जागेवरच फोडण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.नशीब बलवत्तर म्हणून..ज्यावेळी घरावर दगड कोसळला त्यावेळी रमेश शेंडे यांच्या घरात कोणीही नव्हते. घरातील सर्व सदस्य दरे या गावी राहतात. दगडाची धडक इतकी जोरदार होती की, भींतीला मोठे भगदाड पडल्याने घरात सर्वत्र विटा विखुरल्या गेल्या. तसेच घराच्या भिंतीलाही भेगा पडल्या. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. सुमारे दोनशे फुटांवरून घराच्या भिंतीवर कोसळलेल्या दगडाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठेकाच चुकला. पावसामुळे वीज कोसळली की काय, असा काही नागरिकांचा समज झाला. मात्र, घरातून बाहेर आल्यानंतर त्यांना वेगळेच चित्र दिसले.