शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

डोक्यावर भीतीचा दगड

By admin | Updated: July 5, 2016 00:29 IST

घराच्या भिंतीला भगदाड : अजिंक्यतारा किल्ल्यावरून कोसळतायत दगडी-- आॅन दि स्पॉट रिपोर्ट

सचिन काकडे -- सातारा --अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर सध्या नैसर्गिक संकट ओढावले आहे. डोंगरावर असलेली कैक टन वजनाची दगडी खाली कोसळू लागली आहे. याचा प्रत्यय येथील नागरिकांनी आता येऊ लागला आहे. रविवारी सायंकाळी सुमारे एक ते दीड टन वजनाचा भला मोठा दगड किल्ल्यावरून थेट एका घराच्या भिंतीवर येऊन आदळला. ही धडक एवढी मोठी होती की, भिंतीला मोठे भगदाड पडले तर घरालाही भेगा पडल्या.अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक वसाहती वसल्या आहेत. गेल्या २० ते २५ वर्षांपासून याठिकाणी नागरिकांचे वास्तव्य आहे. या डोंगरावर गेल्या अनेक वर्षांपासून कैक टन वजनाची दगडी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. पावसाळा आला की नागरिकांना पाऊस-पाण्यापेक्षा दगडी कोसळण्याचीच अधिक भीती असते. रविवारी सायंकाळच्या सुमारास येथे राहणाऱ्या रमेश गुजाबा शेंडे यांच्या घरावर अचानक सुमारे दीड टन वजनाचा भला मोठा दगड येऊन कोसळला. सुदैवाने घरात कोणीही नसल्याचे मोठा अनर्थ टळला. मात्र, शेंडे यांच्या घराच्या भिंतीला भले मोठे भगदाड पडले. तसेच घराला भेगाही पडल्या. यामध्ये शेंडे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ही घटना समोर येताच परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाळी. घराच्या भिंतीवर आदळलेला दगड पाहून लहान मुलांसह अनेकांचे चेहरे भीतीने भेदरले. किल्ल्यावरील दगडांची नागरिकांच्या मनात किती भीती आहे, हे प्रत्येकाचे चेहरे सांगत होते. भयभित अवस्थेत अनेकांनी रात्र जागून काढली. भिंत बांधा.. अथवा दगडी तरी फोडा !पावसाळा सुरू झाला की पाण्यामुळे दगडाखाली असलेल्या मातीचे वहन होते. यामुळे छोटी-मोठी दगडी किल्ल्यावरून खाली कोसळतात. उतारामुळे कोसळलेल्या दगडाचा वेगही वाढतो. झाडांमुळे हा वेग काही प्रमाणात मंदावत असला तरी धोका मात्र टळत नाही. आजपर्यंत अनेकदा या ठिकाणी अशा प्रकारच्या लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत. हा धोका टाळण्यासाठी वसाहतींच्या वरील बाजूस संरक्षक भिंत बांधावी, अथवा मोठ-मोठाली दगडी जागेवरच फोडण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.नशीब बलवत्तर म्हणून..ज्यावेळी घरावर दगड कोसळला त्यावेळी रमेश शेंडे यांच्या घरात कोणीही नव्हते. घरातील सर्व सदस्य दरे या गावी राहतात. दगडाची धडक इतकी जोरदार होती की, भींतीला मोठे भगदाड पडल्याने घरात सर्वत्र विटा विखुरल्या गेल्या. तसेच घराच्या भिंतीलाही भेगा पडल्या. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. सुमारे दोनशे फुटांवरून घराच्या भिंतीवर कोसळलेल्या दगडाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठेकाच चुकला. पावसामुळे वीज कोसळली की काय, असा काही नागरिकांचा समज झाला. मात्र, घरातून बाहेर आल्यानंतर त्यांना वेगळेच चित्र दिसले.