शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

डोक्यावर भीतीचा दगड

By admin | Updated: July 5, 2016 00:29 IST

घराच्या भिंतीला भगदाड : अजिंक्यतारा किल्ल्यावरून कोसळतायत दगडी-- आॅन दि स्पॉट रिपोर्ट

सचिन काकडे -- सातारा --अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर सध्या नैसर्गिक संकट ओढावले आहे. डोंगरावर असलेली कैक टन वजनाची दगडी खाली कोसळू लागली आहे. याचा प्रत्यय येथील नागरिकांनी आता येऊ लागला आहे. रविवारी सायंकाळी सुमारे एक ते दीड टन वजनाचा भला मोठा दगड किल्ल्यावरून थेट एका घराच्या भिंतीवर येऊन आदळला. ही धडक एवढी मोठी होती की, भिंतीला मोठे भगदाड पडले तर घरालाही भेगा पडल्या.अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक वसाहती वसल्या आहेत. गेल्या २० ते २५ वर्षांपासून याठिकाणी नागरिकांचे वास्तव्य आहे. या डोंगरावर गेल्या अनेक वर्षांपासून कैक टन वजनाची दगडी कोसळण्याच्या स्थितीत आहेत. पावसाळा आला की नागरिकांना पाऊस-पाण्यापेक्षा दगडी कोसळण्याचीच अधिक भीती असते. रविवारी सायंकाळच्या सुमारास येथे राहणाऱ्या रमेश गुजाबा शेंडे यांच्या घरावर अचानक सुमारे दीड टन वजनाचा भला मोठा दगड येऊन कोसळला. सुदैवाने घरात कोणीही नसल्याचे मोठा अनर्थ टळला. मात्र, शेंडे यांच्या घराच्या भिंतीला भले मोठे भगदाड पडले. तसेच घराला भेगाही पडल्या. यामध्ये शेंडे यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. ही घटना समोर येताच परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाळी. घराच्या भिंतीवर आदळलेला दगड पाहून लहान मुलांसह अनेकांचे चेहरे भीतीने भेदरले. किल्ल्यावरील दगडांची नागरिकांच्या मनात किती भीती आहे, हे प्रत्येकाचे चेहरे सांगत होते. भयभित अवस्थेत अनेकांनी रात्र जागून काढली. भिंत बांधा.. अथवा दगडी तरी फोडा !पावसाळा सुरू झाला की पाण्यामुळे दगडाखाली असलेल्या मातीचे वहन होते. यामुळे छोटी-मोठी दगडी किल्ल्यावरून खाली कोसळतात. उतारामुळे कोसळलेल्या दगडाचा वेगही वाढतो. झाडांमुळे हा वेग काही प्रमाणात मंदावत असला तरी धोका मात्र टळत नाही. आजपर्यंत अनेकदा या ठिकाणी अशा प्रकारच्या लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत. हा धोका टाळण्यासाठी वसाहतींच्या वरील बाजूस संरक्षक भिंत बांधावी, अथवा मोठ-मोठाली दगडी जागेवरच फोडण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.नशीब बलवत्तर म्हणून..ज्यावेळी घरावर दगड कोसळला त्यावेळी रमेश शेंडे यांच्या घरात कोणीही नव्हते. घरातील सर्व सदस्य दरे या गावी राहतात. दगडाची धडक इतकी जोरदार होती की, भींतीला मोठे भगदाड पडल्याने घरात सर्वत्र विटा विखुरल्या गेल्या. तसेच घराच्या भिंतीलाही भेगा पडल्या. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. सुमारे दोनशे फुटांवरून घराच्या भिंतीवर कोसळलेल्या दगडाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठेकाच चुकला. पावसामुळे वीज कोसळली की काय, असा काही नागरिकांचा समज झाला. मात्र, घरातून बाहेर आल्यानंतर त्यांना वेगळेच चित्र दिसले.