शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पिके वाया जाण्याची शेतक-यांमध्ये भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:15 IST

कऱ्हाड : तालुक्यात पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके वाया जाण्याची भीती शेतक-यांतून व्यक्त केली जात आहे. यावर्षी ...

कऱ्हाड : तालुक्यात पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके वाया जाण्याची भीती शेतक-यांतून व्यक्त केली जात आहे. यावर्षी पावसामुळे पेरण्या आगाप झालेल्या आहेत. मध्यंतरी पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. उसासारख्या पिकांना पाणी देता आले. मात्र सोयाबीन, भात, भुईमूग अशा पिकांना पाणी देता आले नाही. मात्र, आता अचानक पाऊस सुरू झाला आणि शेतात पाणी साचून राहिले. वा-यामुळे ऊसही भुईसपाट झाला आहे. त्यामुळे पिके वाया जातात की काय, अशी भीती शेतक-यांतून व्यक्त केली जात आहे. सोयाबीन, भुईमूग व माळव्याची पिके पाणी साचल्यामुळे कुजून जाण्याची शक्यता असून शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे.

कोल्हापूर नाक्याकडे जाणा-या रस्त्याची दुर्दशा

कऱ्हाड : शहरातील दैत्यनिवारिणी मंदिर ते जलशुद्धीकरण केंद्रापासून कोल्हापूर नाक्याकडे जाणा-या मार्गावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे अंदाज न आल्याने वाहने खड्ड्यात आदळून नुकसान होत आहे. किरकोळ अपघातही घडत आहेत. त्यामध्ये काहीजण जखमीही झाले आहेत. संबंधित विभागाने तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.

अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी

कऱ्हाड : येथील राष्ट्रीय महामार्गालगत असणा-या उपमार्गावर वाहनधारकांकडून अस्ताव्यस्तपणे वाहने पार्किंग केले जात आहे. त्यामुळे या परिसरात वाहतूककोंडी निर्माण होऊन वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. ढेबेवाडी फाट्यापासून कोल्हापूर नाक्याकडे येणा-या सर्व्हिस रस्त्यावर दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहनांचे अस्ताव्यस्तपणे पार्किंग केले जात आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

कऱ्हाडात वाहनधारक खड्ड्यांमुळे त्रस्त

कऱ्हाड : शहरातील दत्तचौक, पोपटभाई पेट्रोलपंप चौक तसेच कोल्हापूर नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मुख्य चौकासह अंतर्गत भागातही पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी व वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोपटभाई पेट्रोलपंपापासून भेदा चौकाकडे जाणा-या तसेच भेदा चौकातून पंचायत समितीकडे जाणा-या रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत. त्यामुळे वाहने आदळून नुकसान होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीची गरज आहे.