शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

महाबळेश्वरात फौजफाटा दाखल

By admin | Updated: December 25, 2015 23:54 IST

प्रशासनाला जाग : पोलीस प्रशासनाची शहरात कारवाई सुरू

अजित जाधव -- महाबळेश्वर -‘हंगामी नको बारमाही तोडगा हवा’ या ‘लोकमत’च्या वृत्तामुळे महाबळेश्वर पोलीस व प्रशासन खडबडून जागे झाले. शहरात मोठ्या संख्येने साताराहून पोलीस फौजफाटा शहरात दाखल झाला आहे. २५ कर्मचारी व १० होमगार्ड आले आहेत, यामुळे सकाळपासून प्रवेश बंद, नो पार्किंग, अशा वाहनांना या पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे.क्षेत्र महाबळेश्वर येथील वृद्धाच्या मृत्यूने महाबळेश्वर पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर येताच सकाळपासून वेण्णा लेक, माखरिया गार्डन, शिवाजी चौक, सुभाष चौक व बाळासाहेब ठाकरे चौकांमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी उभे होते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २५ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली, तर नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेली वाहने क्रेनच्या साह्याने उचलून नेण्यात आली. वेण्णा लेक येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, यासाठी वायरलेस सिस्टीम बसविण्यात आली. चार जामर व अनेक दिवसांपासून बंद असलेली शहरातील वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. पोलीस प्रशासनाला जाग आली पण ‘क’ वर्गातील श्रीमंत असणाऱ्या महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेला केव्हा जाग येणार? असा प्रश्न पर्यटकांना पडत आहे. पर्यटकांना पॉइंटच्या रस्त्याबाबत माहिती नसते व शहरातील वाहतुकीबाबत कोणत्या ठिकाणी वाहनतळ आहे व नो पार्किंग ऐकेरी वाहतूक, दुहेरी वाहतूक असे फलक बसविले गेले पाहिजेत, या फलकाची लांबी व रुंदी मोठी ठेवली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना वाहनतळ व पॉइंटच्या रस्त्याची माहिती मिळू शकेल. याबाबत पालिका कारवाई करण्यास गेली असता नगरसेवकाचा मुख्याधिकाऱ्यांना फोन येतो की, ती व्यक्ती आपल्या वार्डमधील आहे, त्याचा हातगाडा हलवू नका. यामुळे सुभाष व शिवाजी चौकांमधील अनधिकृत हातगाडे हटत नाहीत. अतिक्रमणे हटणार केव्हा?महाबळेश्वर नगरपालिकेकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी पॉइंटबाबतचे फलक अतिशय लहान असल्यामुळे पर्यटकांना हे फलक दिसून येत नाहीत व वाहनतळ, ऐकेरी वाहतूक प्रवेश बंद अशा फलकांची गरज आहे व शहराच्या मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौक, सुभाष चौक येथील हातगाडे, घोडेवाले वाहतुकीला होणारे अतिक्रमण कधी काढणार, याबाबत पालिकेला केव्हा जाग येणार, असा प्रश्न जनतेस पडला आहे.