शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

महाबळेश्वरात फौजफाटा दाखल

By admin | Updated: December 25, 2015 23:54 IST

प्रशासनाला जाग : पोलीस प्रशासनाची शहरात कारवाई सुरू

अजित जाधव -- महाबळेश्वर -‘हंगामी नको बारमाही तोडगा हवा’ या ‘लोकमत’च्या वृत्तामुळे महाबळेश्वर पोलीस व प्रशासन खडबडून जागे झाले. शहरात मोठ्या संख्येने साताराहून पोलीस फौजफाटा शहरात दाखल झाला आहे. २५ कर्मचारी व १० होमगार्ड आले आहेत, यामुळे सकाळपासून प्रवेश बंद, नो पार्किंग, अशा वाहनांना या पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे.क्षेत्र महाबळेश्वर येथील वृद्धाच्या मृत्यूने महाबळेश्वर पोलीस ठाण्याचा कारभार चव्हाट्यावर येताच सकाळपासून वेण्णा लेक, माखरिया गार्डन, शिवाजी चौक, सुभाष चौक व बाळासाहेब ठाकरे चौकांमध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी उभे होते. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या २५ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली, तर नो पार्किंगमध्ये लावण्यात आलेली वाहने क्रेनच्या साह्याने उचलून नेण्यात आली. वेण्णा लेक येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते, यासाठी वायरलेस सिस्टीम बसविण्यात आली. चार जामर व अनेक दिवसांपासून बंद असलेली शहरातील वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. पोलीस प्रशासनाला जाग आली पण ‘क’ वर्गातील श्रीमंत असणाऱ्या महाबळेश्वर गिरिस्थान नगरपालिकेला केव्हा जाग येणार? असा प्रश्न पर्यटकांना पडत आहे. पर्यटकांना पॉइंटच्या रस्त्याबाबत माहिती नसते व शहरातील वाहतुकीबाबत कोणत्या ठिकाणी वाहनतळ आहे व नो पार्किंग ऐकेरी वाहतूक, दुहेरी वाहतूक असे फलक बसविले गेले पाहिजेत, या फलकाची लांबी व रुंदी मोठी ठेवली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना वाहनतळ व पॉइंटच्या रस्त्याची माहिती मिळू शकेल. याबाबत पालिका कारवाई करण्यास गेली असता नगरसेवकाचा मुख्याधिकाऱ्यांना फोन येतो की, ती व्यक्ती आपल्या वार्डमधील आहे, त्याचा हातगाडा हलवू नका. यामुळे सुभाष व शिवाजी चौकांमधील अनधिकृत हातगाडे हटत नाहीत. अतिक्रमणे हटणार केव्हा?महाबळेश्वर नगरपालिकेकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी पॉइंटबाबतचे फलक अतिशय लहान असल्यामुळे पर्यटकांना हे फलक दिसून येत नाहीत व वाहनतळ, ऐकेरी वाहतूक प्रवेश बंद अशा फलकांची गरज आहे व शहराच्या मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौक, सुभाष चौक येथील हातगाडे, घोडेवाले वाहतुकीला होणारे अतिक्रमण कधी काढणार, याबाबत पालिकेला केव्हा जाग येणार, असा प्रश्न जनतेस पडला आहे.