शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पितृ पंधरवड्यामुळे भाजीच्या वाकुल्या!

By admin | Updated: October 1, 2015 00:34 IST

भाज्यांचा दर वधारला : एका पेंडीला मोजावे लागतायत वीस रुपये

सातारा : पितृ पंधरवडा सुरू झाल्यामुळे सध्या भाजीमंडईतील दर चांगलेच कडाडले आहेत. इतरवेळी दहा रूपये किलो मिळणाऱ्या भाज्या आत्या वीस रूपये पावशेर दराने घरी घेऊन जाण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.अनंत चतुर्थीनंतर लगेच सुरू झालेल्या पितृ पंधरवड्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाज्यांची मागणी असते. यातही भोपळा, भेंडी, गवारी, कारले, बटाटा, मेथी, ढेसा, या भाज्यांचा मान मोठा असतो. त्यामुळे दर काहीही असला तरीही या भाज्या करून त्याचा नैवैद्य दाखवणे ही प्रथा सर्वांकडेच रूढ आहे. पितृ पंधरवड्यामुळे भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या या भाज्यांची चढ्या दराने विक्री सुरू झाली आहे. आळूच्या पानांची दहा रूपयांना जुडी मिळत होती. आता दहा रूपयांत निम्मी जुडी मिळत असल्यामुळे नैवेद्यापुरतीही वडी करताना सामान्यांच्या जिवावर येवू लागले आहे. सातारा भाजी मंडईत सध्या टोमॅटो, पावटा, मुळा, बिन, दोडका यांच्या किंंमती वीस ते पंचवीस रूपये किलो अशा स्थिर आहेत. त्यामुळे अनेक घरांमध्ये सध्या कडधान्य आणि या भाज्यांचा वावर दिसत आहे. आहे. (प्रतिनिधी)ग्राहकच नाहीत..! --पितृ पंधरवडा सुरू झाला असला तरीही अजूनही ग्राहकांनी मंडईकडे पाठ फिरविल्याचे विक्रेते सांगत आहेत. शेतकऱ्यांकडून भाजी घेऊन आम्ही विकतो. दिवसभर उन्हात बसून भाजीविक्री करताना किलोमागे पाच दहा रूपये मिळतात; पण अलीकडे ग्राहकही हुशार झाले आहेत. या प्रथांमध्ये ‘शॉर्टकट’ काढून वर्षानुवर्षांची पध्दत पुढे नेण्याचा प्रयत्न दिसतो. पुढील काही काळात यापैकी प्रथाच शिल्लक राहणार नाहीत, असेही एका विक्रेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डाळींच्या दरांमध्येही वाढ!पितृ पंधरवडा सुरू झाल्यामुळे सध्या उडीद आणि मूग डाळीचे दरही एका किलोमागे दहा ते पंधरा रूपयांनी वाढले आहेत. पितृपंधरवड्यात या दोन्ही डाळींचे वडे केले जातात. त्यांना विशेष मान आहे. त्यामुळे या डाळींचेही दर कडाडल्याचे व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.