शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

पितृ पंधरवड्यामुळे भाजीच्या वाकुल्या!

By admin | Updated: October 1, 2015 00:34 IST

भाज्यांचा दर वधारला : एका पेंडीला मोजावे लागतायत वीस रुपये

सातारा : पितृ पंधरवडा सुरू झाल्यामुळे सध्या भाजीमंडईतील दर चांगलेच कडाडले आहेत. इतरवेळी दहा रूपये किलो मिळणाऱ्या भाज्या आत्या वीस रूपये पावशेर दराने घरी घेऊन जाण्याची वेळ सामान्यांवर आली आहे.अनंत चतुर्थीनंतर लगेच सुरू झालेल्या पितृ पंधरवड्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाज्यांची मागणी असते. यातही भोपळा, भेंडी, गवारी, कारले, बटाटा, मेथी, ढेसा, या भाज्यांचा मान मोठा असतो. त्यामुळे दर काहीही असला तरीही या भाज्या करून त्याचा नैवैद्य दाखवणे ही प्रथा सर्वांकडेच रूढ आहे. पितृ पंधरवड्यामुळे भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या या भाज्यांची चढ्या दराने विक्री सुरू झाली आहे. आळूच्या पानांची दहा रूपयांना जुडी मिळत होती. आता दहा रूपयांत निम्मी जुडी मिळत असल्यामुळे नैवेद्यापुरतीही वडी करताना सामान्यांच्या जिवावर येवू लागले आहे. सातारा भाजी मंडईत सध्या टोमॅटो, पावटा, मुळा, बिन, दोडका यांच्या किंंमती वीस ते पंचवीस रूपये किलो अशा स्थिर आहेत. त्यामुळे अनेक घरांमध्ये सध्या कडधान्य आणि या भाज्यांचा वावर दिसत आहे. आहे. (प्रतिनिधी)ग्राहकच नाहीत..! --पितृ पंधरवडा सुरू झाला असला तरीही अजूनही ग्राहकांनी मंडईकडे पाठ फिरविल्याचे विक्रेते सांगत आहेत. शेतकऱ्यांकडून भाजी घेऊन आम्ही विकतो. दिवसभर उन्हात बसून भाजीविक्री करताना किलोमागे पाच दहा रूपये मिळतात; पण अलीकडे ग्राहकही हुशार झाले आहेत. या प्रथांमध्ये ‘शॉर्टकट’ काढून वर्षानुवर्षांची पध्दत पुढे नेण्याचा प्रयत्न दिसतो. पुढील काही काळात यापैकी प्रथाच शिल्लक राहणार नाहीत, असेही एका विक्रेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.डाळींच्या दरांमध्येही वाढ!पितृ पंधरवडा सुरू झाल्यामुळे सध्या उडीद आणि मूग डाळीचे दरही एका किलोमागे दहा ते पंधरा रूपयांनी वाढले आहेत. पितृपंधरवड्यात या दोन्ही डाळींचे वडे केले जातात. त्यांना विशेष मान आहे. त्यामुळे या डाळींचेही दर कडाडल्याचे व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.